25/02/2021
उज्वल प्रबोधिनी संस्था बदलापूर
संचालित
महात्मा गांधी निकेतन, रहाटोली, ता. अंबरनाथ, जि. ठाणे , ही विशेषतः कातकरी, इतर आदिवासी, अनाथ मुले, एकल पालक पाल्य (single parent),दिव्यांग व आजारी पालकांचे पाल्य असे एकूणच गरीब-दुर्बल घटकातील वय वर्षे 1 ते 18 वयोगटाच्या मुला- मुलींसाठी निवासी शाळा व वसतिगृह आहे.
# या प्रकल्पाचा थोडक्यात परिचय -
@निकेतन केवळ कायम व हितचिंतक सभासदांच्या वर्गणी व मदतीवर चालविले जाते.
@निकेतन ही गुरुकुल तत्वावर चालविली जाणारी निवासी शाळा असून मुलांना केवळ पुस्तकी शिक्षण न देता त्यांना माणूस म्हणून सन्मानाने जगता यावे, यासाठी मूल्यशिक्षण, कला, कौशल्ये, खेळ यांची सांगड घालून जिवनशिक्षण देणारे मंदिर बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे.
@विवंचनेत असणाऱ्या प्रत्येक बालकाला निकेतन हा आधारवड वाटावा हा आमचा प्रयत्न आहे.
@या प्रयत्नात ज्यांना सहभागी व्हायचे आहे किंवा आमच्या कार्याला अनुभवायचे आहे,त्यांनी खालील व्हाट्सऍप लिंक वर जाऊन महात्मा गांधी निकेतन या समूहाचे सदस्य व्हावे, ही विनंती.
@सदस्य होण्याचे आवाहन हे मदतीची याचना नसून गरीब -दुर्बल घटकांच्या शिक्षण व संगोपन कामी सबल व सज्जनांची संवेदना वृद्धींगत करावी हा हेतू आहे, धन्यवाद🙏
@संपर्क 9130715170 /9552385111
WhatsApp Group Invite