03/08/2022
मत, मतदार, मतदान
किती मोठं बळ दिले आहे आपल्याला आपल्या महान संविधानाने.परंतु आपण याचा विचार न करता आपले बहुमूल्य मत कोणालाही देऊन मोकळे होतो. लोकशाहीचा हा उत्सव बाकी उत्सवांसारख का नाही सर्व विचार करून साजरा करत.
आपण दिलेल्या मतांवर अगदी ग्रामपंचायतीच्या सदस्या पासून तर अगदी लोकसभेतील खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधी निवडले जातात परंतु मतदान झाल्यावर आपल्या आजूबाजूला निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्यामुळे आपल्या सर्व सामान्य जीवनात काही बदल झाला आहे का? मी रोजचे जीवन जगतो त्यामध्ये काही बदल झाला आहे का ॽ मला ज्या सुधारणा पाहिजे आहेत यासाठी मी हा मतदानाचा अट्टाहास केलेला आहे त्या झाल्या आहेत काॽ इतका साधा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा.
आपल्या रोजच्या जीवनातील अगदी आपण ज्या रस्त्यांवर चालतो ते रस्ते आपल्या घरात जे दूध येते ते दूध जे वर्तमानपत्र येत ते जे आपल्या नळाला पाणी येतं तिथपासून तर अगदी देशातील मोठ्या गोष्टीत पर्यंत काही फरक पडतो आहे का हे आपण नीट तपासायला पाहिजे
इतकं सर्व लिहायचं कारण की आपल्या बाजू बाजूच्या रस्त्यांची दशा तर आपण बघतो आहे. आता तर काय आता नगरपालिकेची इलेक्शन आहेत तर हे परत मतदान मागायसाठी फिरतील परंतु आपल्याला ज्या व्यक्तीमुळे आपल्या सर्वसामान्य जीवनातील गोष्टीत फरक पडला आहे किंवा जो व्यक्ती आपल्या या गोष्टींमध्ये फरक करू शकतो आपल्याला सर्व सुख सोयी देऊ शकतो अशा व्यक्तीची निवड आपण या वेळी करावी.
आपण सर्वांनी आपल्या सतत विवेक बुद्धीला पटेल अशाच व्यक्तीची निवड यावेळेस करू आणि आपला चाळीसगाव शहरातील परिसर खरंच विकासाच्या दिशेने घेऊन जाऊया. कोणत्याही क्षणीक आमिषाला बळी न पडता, संपूर्ण विचारा अंती आपण आपले मत देऊया.
एका मताने काय फरक पडतो असा विचार न करता आपलं एक साधं मतही बदल घडवू शकतो हे लक्षात घेऊन आपण यावेळेस निवडणुकीला समोरे जाऊया.