Jalgaon Index

Jalgaon Index जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी एक अराजकीय व्यासपीठ !

🎙️ स्वरसम्राज्ञी Asha Bhosle यांचे आज (१२ एप्रिल २०२६) वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.भारतीय संगीत क्षेत्रातील त्...
12/04/2026

🎙️ स्वरसम्राज्ञी Asha Bhosle यांचे आज (१२ एप्रिल २०२६) वयाच्या ९२ व्या वर्षी दुःखद निधन झाले.

भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य असून, त्यांच्या आवाजाने अनेक पिढ्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या या महान कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. 🙏

आदरणीय,खा. स्मिता ताई वाघ,जळगाव लोकसभा मतदारसंघसप्रेम नमस्कार..🙏🏻आपण संसदेत जळगाव जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्न प्रभाव...
25/03/2026

आदरणीय,
खा. स्मिता ताई वाघ,
जळगाव लोकसभा मतदारसंघ
सप्रेम नमस्कार..🙏🏻

आपण संसदेत जळगाव जिल्ह्यातील विविध रेल्वे प्रश्न प्रभावीपणे मांडलेत, याबद्दल 'जळगाव इंडेक्स' ग्रुपतर्फे आपणास मनःपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत.💐

'जळगाव इंडेक्स' ग्रुपतर्फे यापूर्वी आपणास सादर करण्यात आलेल्या निवेदनामध्ये जिल्ह्यातील रेल्वे संदर्भातील अनेक महत्त्वाच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या. आपण त्या मागण्यांची दखल घेत, त्या थेट संसदेत मांडून जळगाव जिल्ह्याच्या विकासासाठी आपली बांधिलकी पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

आपल्या या प्रयत्नांमुळे जळगाव जिल्ह्यातील प्रवासी, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांना भविष्यात मोठा दिलासा मिळेल, असा आम्हाला विश्वास आहे.

आज 'जळगाव इंडेक्स' ग्रुपतर्फे आदरणीय खा. स्मिता ताई यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्या कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले तसेच त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.💐

आपण भविष्यातही अशाच पद्धतीने जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहाल, ही अपेक्षा व्यक्त करतो.

ताई, पुन्हा एकदा आपले मनःपूर्वक आभार.🙏🏻

आपला विश्वासू,
जळगाव इंडेक्स ग्रुप.

https://www.loksatta.com/nashik/jalgaon-mp-smita-wagh-meets-railway-minister-ashwini-vaishnaw-udhana-pune-train-demand-rnb-99-5781025/?utm_source=DailyHunt&utm_medium=Referral

🚧 जळगावकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी!गिरणा नदीवरील बांभोरी पुलाच्या नव्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून ₹79.23 कोटींचा ...
20/01/2026

🚧 जळगावकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी!

गिरणा नदीवरील बांभोरी पुलाच्या नव्या बांधकामासाठी केंद्र सरकारकडून ₹79.23 कोटींचा भरीव निधी मंजूर झाला आहे.

🏗️हा पूल सुरत–नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा दुवा असून, वाहतूक कोंडी व अपघातांच्या समस्येतून मोठा दिलासा मिळणार आहे. 🚗➡️🚚

या महत्त्वपूर्ण प्रकल्पासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री मा. श्री. नितीन गडकरी जी यांचे मनःपूर्वक आभार 🙏
तसेच जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या खासदार मा. स्मिता वाघ यांचे विशेष आभार 👏

या पुलाचे बांधकाम अत्याधुनिक प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट गर्डर तंत्रज्ञानाने केले जाणार असून, पूल अधिक मजबूत, सुरक्षित व दीर्घकाळ टिकाऊ राहणार आहे 💪
🔹 नवीन पुलासोबत जुन्या पुलाचे मजबुतीकरण
🔹 कालिंका माता मंदिर–खोटेनगर रस्त्याचे व्हाईट टॉपिंग
🔹 आरसीसी गटारी व पूरक विकासकामे

या सर्व कामांमुळे जळगावची वाहतूक अधिक गतिमान होऊन व्यापार, उद्योग व आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे 📈

तसेच, बांभोरी–निमखेडी दरम्यान सुरू असलेल्या समांतर पुलासाठीही ₹40 कोटींचा निधी मंजूर आहे.

✨ जळगावच्या सर्वांगीण विकासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड!

20/01/2026

🚆 प्रवासीहिताचा निर्णय – मध्य रेल्वेचे मनःपूर्वक स्वागत! 🙏

प्रवाशांच्या वाढत्या मागणीचा विचार करून :
🚉 भुसावळ–मिरज अनारक्षित विशेष गाडी (01209/01210)
आणि
🚉 अमरावती–पनवेल अनारक्षित विशेष गाडी (01416/01415)

सुरू केल्याबद्दल मध्य रेल्वे व भुसावळ मंडळ व खा. स्मिता वाघ ह्यांचे मनःपूर्वक स्वागत व आभार..!🙏

📅 भुसावळ → मिरज | गाडी क्र. 01209
🕓 सुटणार : 23 जानेवारी, दुपारी 4.50 वा. (भुसावळ)
🕗 पोहोचणार : 24 जानेवारी, सकाळी 8.50 वा. (मिरज)

📅 मिरज → भुसावळ | गाडी क्र. 01210
🕖 सुटणार : 26 जानेवारी, सायं. 7.00 वा. (मिरज)
🕧 पोहोचणार : 27 जानेवारी, दुपारी 12.30 वा. (भुसावळ)
📍 थांबे : जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली 🚉

📅 अमरावती → पनवेल | गाडी क्र. 01416
🕛 सुटणार : 22 जानेवारी, दुपारी 12.00 वा. (अमरावती)
🕓 पोहोचणार : 23 जानेवारी, पहाटे 4.00 वा. (पनवेल)

📅 पनवेल → अमरावती | गाडी क्र. 01415
🕢 सुटणार : 26 जानेवारी, रात्री 7.50 वा. (पनवेल)
🕛 पोहोचणार : 27 जानेवारी, दुपारी 12.00 वा. (अमरावती)
📍 थांबे : बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्ड लाईन, पुणे, लोणावळा, कर्जत 🚉

🎓 नोकरी | 🧑‍💼 व्यवसाय | 🏥 उपचार | 🛍️ बाजारपेठ | 🧳 दैनंदिन प्रवास करणाऱ्या खान्देश–विदर्भ–पश्चिम महाराष्ट्रातील हजारो प्रवाशांना या गाड्यांचा मोठा लाभ होणार आहे.

🧾 संपूर्ण गाडी अनारक्षित असल्याने तिकीट टंचाईचा ताण कमी होऊन 🚶‍♂️🚶‍♀️ सर्वसामान्य प्रवाशांना सुरक्षित, सोयीस्कर व परवडणारा प्रवास मिळेल.
🎉 सण-उत्सव व गर्दीच्या काळात नियमित गाड्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय निश्चितच प्रवासीहिताचा आहे.

👉 भविष्यातही प्रवाशांच्या गरजेनुसार गाड्या व थांबे वाढवावेत, ही अपेक्षा!

🚆

21/11/2025

सप्रेम नमस्कार..! 🙏🏻

अलायन्स एयर ह्या विमानसेवा देणाऱ्या कंपनीचा इतिहास पाहिला तर विमानसेवा रद्द होण्याचे प्रमाण अत्यंत जास्त आहे.
विशेषतः जळगावकरांसाठी तर ही कंपनी एकप्रकारचे ग्रहणच ठरत आहे.

मुंबई आणि अहमदाबाद मार्गांवरील सेवा सुरू झाल्यापासून विमानसेवा रद्द होणे, विलंब होणे, प्रवाशांना वेळेवर माहिती न देणे हे प्रकार वारंवार होत आहेत.

काल दिनांक २० नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईहून जळगावला येणारे विमान पुन्हा “तांत्रिक कारणांमुळे” रद्द करण्यात आले. या अचानक रद्दगीमुळे ३०–३५ प्रवाशांचे प्रचंड हाल झाले - कोणतीही ठोस माहिती नाही, पर्यायी व्यवस्था नाही, प्रवाशांच्या सोयींची कोणती काळजी नाही.

आमची मागणी:
1️⃣Alliance Air ने जळगाव मार्गावरील वारंवार होणाऱ्या उड्डाण रद्दगीबाबत तपशीलवार अहवाल जाहीर करावा.
2️⃣विमानतळ प्राधिकरण व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने या बाबतीत तातडीने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी.
3️⃣प्रवाशांसाठी स्पष्ट संवाद, योग्य सुविधा आणि पर्यायी उड्डाणांची व्यवस्था बंधनकारक करावी.
4️⃣जळगावसारख्या वाढत्या संभाव्यतेच्या मार्गावर विश्वसनीय एअरलाइनची नियुक्ती करण्याचा विचार करावा.

जळगावकरांना विश्वासार्ह हवाई सेवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे -
➡ कामानिमित्त दररोज मुंबईला जाणारे प्रवासी
➡ वैद्यकीय उपचारासाठी जाणारे रुग्ण
➡ विद्यार्थी व व्यावसायिक
➡ जिल्ह्यातील उद्योग व MSME सेक्टर
या सर्वांचे नियोजन वारंवार विस्कळीत होत आहे.

अलायन्स एअरच्या वारंवार रद्द होणाऱ्या व अव्यवस्थित सेवेने जळगावकरांचा संयम संपत चालला आहे.😡
कृपया हा विषय तातडीने लक्षात घेऊन प्रवाशांच्या हितासाठी आवश्यक ती कडक आणि ठोस कारवाई करावी, ही नम्र विनंती. 🙏🏻

If you look at the history of the airline company Alliance Air, the rate of flight cancellations is very high. Especially for the people of Jalgaon, this company is becoming a kind of eclipse.

Since the commencement of services on Mumbai and Ahmedabad routes, flight cancellations, delays, non-timely information to passengers have been frequent occurrences.

Yesterday the flight from Mumbai to Jalgaon on 20 November 2025 was again canceled due to “technical reasons”. Due to this sudden cancellation, 30-35 passengers suffered a lot. No concrete information, no alternative arrangements, no concern for passenger comfort. 👎

📢Our Demand :
1️⃣Alliance Air should release a detailed report on frequent flight cancellations on Jalgaon route.
2️⃣The Airport Authority and the Ministry of Civil Aviation should immediately investigate the matter and take action against those responsible.
3️⃣Clear communication, proper facilities and arrangement of alternative flights should be mandatory for passengers.
4️⃣Consider hiring a reliable airline on a route of increasing potential like Jalgaon.

It is the right of Jalgaon citizens to have reliable air services.
➡Development of the district, industry, students, patients, MSME businesses — planning of all depends on this flight.

'Jalgaonkars' are running out of patience with Alliance Air's frequently canceled and unorganized service. It is a humble request that , , - भारतीय विमानतळ प्राधिकरण you please consider this matter urgently and take necessary strict and concrete action for the benefit of the passengers.

Thank You,
Jalgaon Index Team.

दिल्ली - लाल किल्ला येथील अत्यंत दुःखद घटना..!आज (१० नोव्हेंबर २०२५) दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ (सायं...
10/11/2025

दिल्ली - लाल किल्ला येथील अत्यंत दुःखद घटना..!

आज (१० नोव्हेंबर २०२५) दिल्लीतील लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनजवळ (सायंकाळ ७ वा.) भीषण स्फोट झाला असून ह्या स्फोटात जवळपास ११ नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. मृत झालेल्या व्यक्तींच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना करतो आहोत. 💐🙏🏻

मृत्युमुखी झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ह्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ताकद देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 🙏🏻

तसेच या घटनेत बरेच नागरिक जखमी देखील झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केलेले आहे. जखमी झालेले नागरिक लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना.. 🙏🏻

आदरणीय,श्री. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वेमुंबई DRM, मध्य रेल्वे,भुसावळ DRM, मध्य रेल्वे,DRM, मध्य रेल्वे,सप्रेम नमस्कार 🙏🏻...
20/10/2025

आदरणीय,
श्री. महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे
मुंबई DRM, मध्य रेल्वे,
भुसावळ DRM, मध्य रेल्वे,
DRM, मध्य रेल्वे,
सप्रेम नमस्कार 🙏🏻

रेल्वेने, 01045/46 मुंबई CSMT - गाझीपूर सिटी विशेष व 01453/54 हडपसर - गाझीपूर सिटी विशेष गाड्यांना “चाळीसगाव” येथे थांबा दिल्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार व धन्यवाद..! 💐

1. 🚊01045/46 मुंबई CSMT-गाझीपूर सिटी (४ फेरे)
थांबे - चाळीसगाव, जळगाव

2. 🚊01453/54 हडपसर (पुणे) - गाझीपूर सिटी (४ फेरे)
थांबे - चाळीसगाव

सर्व खानदेशातील प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ह्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा..! 🙏🏻

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांना जिल्ह्याच्या विकासातील त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्द...
07/10/2025

जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्री. आयुष प्रसाद (भा.प्र.से.) यांना जिल्ह्याच्या विकासातील त्यांच्या बहुमूल्य योगदानाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा.

जळगाव जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली जिल्ह्याची प्रगती आणि विकास अधिक वेगाने होईल, अशी आम्हाला आशा आहे. त्यांच्या नवीन कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा!

आदरणीय,सप्रेम नमस्कार..! 🙏🏻उत्तर महाराष्ट्राचे हृदय समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्याचा विकास हा केवळ रेल्वे व रस्ते वाहतू...
21/09/2025

आदरणीय,
सप्रेम नमस्कार..! 🙏🏻

उत्तर महाराष्ट्राचे हृदय समजल्या जाणाऱ्या जळगाव जिल्ह्याचा विकास हा केवळ रेल्वे व रस्ते वाहतूक यावर न राहता हवाई सेवांवरही अवलंबून आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योगपती, विद्यार्थी, रुग्ण व भाविक – अशा सर्वांसाठी जळगाव विमानतळ एक जीवनरेषा ठरू शकतो.

मात्र, सध्या विमानतळ अनेक अडचणींनी ग्रस्त आहे :

🔴 विद्यमान समस्या :

1️⃣ रनवे विस्तार अपूर्ण – मोठ्या विमानांसाठी सुविधा नाही.
2️⃣ प्रवासी टर्मिनलचे पुनर्विकास थांबलेले – सुविधा अपुऱ्या.
3️⃣ NH-753 B महामार्गावर प्रकाशयोजना नाही – रात्री प्रवास धोकादायक.
4️⃣ UDAAN यात्री कॅफे सेवा नाही – कॅन्टीनचे दर जास्त.
5️⃣ फ्लाईट्स वारंवार रद्द होणे – अहमदाबाद फ्लाईट दिवाळीपर्यंत रद्द
6️⃣ जळगाव विमानतळ ते शहरापर्यंत कोणतीही सुविधा उपलब्ध नाही - कॅब/टॅक्सी/बस.
7️⃣बेंगळुरू / दिल्ली यांसारख्या रूट्सवर सेवा नाही.
8️⃣नाईट लँडिंग सुविधा असूनही रात्री फ्लाईट्स नाहीत.
9️⃣कार्गो सेवा नाही – शेतकरी व उद्योगाला तोटा.

✈️ एअरलाइन्स [As per RTI] – Fly91 व Alliance Air
🌍 सध्या चालू असलेले रूट्स – गोवा, पुणे, हैदराबाद, मुंबई, अहमदाबाद
एकूण फ्लाईट्स ऑपरेट झाल्या: ३२२६
• आगमन – १६६३
• निर्गमन – १६६३

एकूण प्रवासी संख्या: १,४६,९६६
• आगमन – ७३,४३७
• निर्गमन – ७३,५२९
➡️ हे आकडे दर्शवतात की प्रवाशांची मोठी मागणी असूनही सुविधा व रूट्स मर्यादित आहेत.

🟢 सूचना :
✅ धावपट्टी तातडीने विस्तारावा – मोठ्या विमानांना परवानगी मिळावी, ज्यामुळे दिल्ली, बेंगळुरू यांसारख्या प्रमुख मार्गांवर प्रवास सुलभ होईल.
✅ प्रवासी टर्मिनलचे तत्काळ आधुनिकीकरण करावे – एसी प्रतीक्षा कक्ष, आधुनिक चेक-इन काउंटर, डिजिटल डिस्प्ले, पुरेशी बैठक व्यवस्था आणि वायफाय सुविधा सुरू कराव्यात.
✅ NH 753 J महामार्ग व विमानतळ प्रवेशद्वारावर तत्काळ स्ट्रीट लाईट्स बसवावेत – रात्री प्रवास सुरक्षित व्हावा.
✅ UDAAN यात्री कॅफे सुरू करावा – केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार स्वस्त दरात भोजन मिळावे.
✅ फ्लाईट वेळापत्रक स्थिर करावे – अनावश्यक रद्दबातल थांबवावेत. जर फ्लाईट रद्द झालीच तर प्रवाशांना वेळेत व पारदर्शक माहिती द्यावी.
✅ शहराशी सार्वजनिक वाहतूक सुविधा उपलब्ध करावी – बस किंवा अधिकृत टॅक्सी सेवा सुरू करून प्रवाशांचा खर्च कमी करावा.
✅ नवीन फ्लाईट्स तत्काळ सुरू कराव्यात – जळगाव-बेंगळुरू (IT Hub), जळगाव-दिल्ली (राजधानी व व्यवसाय केंद्र) या रूट्सवर तातडीने सेवा सुरू करावी.
✅ नाईट फ्लाईट्स सुरू कराव्यात – विद्यमान तांत्रिक क्षमता वापरून रात्री किमान एक-दोन फ्लाईट्स सुरू कराव्यात.
✅ कार्गो हँडलिंग तत्काळ सुविधा सुरू करावी – शेतकरी व उद्योग क्षेत्राला थेट मदत मिळेल. कृषी व औद्योगिक उत्पादनांची निर्यात वाढेल.

🙏 जळगाव व उत्तर महाराष्ट्रातील लाखो प्रवासी, शेतकरी व व्यावसायिकांच्या सोयीसाठी या समस्या तातडीने सोडवून विमानतळाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. हा प्रकल्प फक्त प्रवासासाठी नव्हे तर या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.

धन्यवाद. 🙏

✈️ Jalgaon Airport – A Lifeline for North Maharashtra

Jalgaon district, often regarded as the heart of North Maharashtra, cannot rely only on road and rail connectivity. Air services are equally vital for farmers, traders, entrepreneurs, students, patients, and devotees. Jalgaon Airport has the potential to become a true lifeline for this region.

🔴 Current Challenges
1️⃣ Runway expansion incomplete – unable to handle larger aircraft.
2️⃣ Passenger terminal redevelopment stalled – inadequate facilities.
3️⃣ No streetlights on NH-753 J highway – unsafe night travel.
4️⃣ No UDAAN Yatri Café – canteen rates too high.
5️⃣ Frequent flight cancellations – Ahmedabad flight suspended till Diwali 25.
6️⃣ No transport connectivity from airport to city – no cabs/taxis/buses.
7️⃣ No flights on key routes like Bengaluru or Delhi.
8️⃣ Despite night-landing facility, no flights operate at night.
9️⃣ No cargo services – loss for farmers & industries.

Airlines & Routes [As per RTI] :
Airlines: Fly91, Alliance Air
Active Routes: Goa, Pune, Hyderabad, Mumbai, Ahmedabad

📊 Total Flights Operated: 3,226
• Arrivals – 1,663
• Departures – 1,663
👥 Total Passenger Traffic: 1,46,966
• Arrivals – 73,437
• Departures – 73,529
➡️ These figures highlight strong passenger demand, but limited facilities & routes.

🟢 Immediate Recommendations :
✅ Runway expansion – Allow larger aircraft to operate on Delhi, Bengaluru and other prime routes.
✅ Passenger terminal modernization – AC waiting lounge, modern check-in counters, digital displays, adequate seating & WiFi.
✅ Streetlighting on NH-753 J & airport approach road – ensure safe night travel.
✅ Start UDAN Yatri Café – affordable meals as per Govt. guidelines.
✅ Stabilize flight schedules – stop arbitrary cancellations; ensure timely, transparent updates.
✅ Public transport link to city – start buses or official taxi services for cost-effective travel.
✅ New flights – Begin Jalgaon–Bengaluru (IT hub) & Jalgaon–Delhi (capital & business hub) routes urgently.
✅ Night flights – At least 1–2 scheduled flights using existing night landing capability.
✅ Cargo handling services – To benefit farmers & industries, enabling agri & industrial exports.

Upgradation of Jalgaon Airport is not just about improving travel convenience — it is about boosting the overall development of North Maharashtra. Immediate action is needed to solve these issues and unlock the airport’s true potential for lakhs of passengers, farmers, and businesses in this region.

Thank You. 🙏

Devendra Fadnavis CMOMaharashtra PMO India Ram Mohan Naidu Kinjarapu Nitin Gadkari Murlidhar Mohol Rakshatai khadse Suresh Damu Bhole - Rajumama Smita Uday Wagh Ministry of Civil Aviation, Government of India Collectorate Jalgaon / जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव Jalgaon Airport

Address

Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jalgaon Index posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category