Dr. Lakhan Bhogam

Dr. Lakhan Bhogam State Secretary Of Maharashtra Pradesh Youth Congress

03/11/2025

What a win! India’s women’s cricket team has made entire country proud today! The journey of these players will inspire millions of young girls to take up sports with confidence.

This is a proud moment for every Indian who believes in equality through opportunity. Congratulations Team India! 🇮🇳 🎊


Heartly congratulations Team India🇮🇳 🎉✨✌️
03/11/2025

Heartly congratulations Team India🇮🇳 🎉✨✌️



💐💐 भारताचे सक्षमपणे नेतृत्व केलेल्या दिवंगत पंतप्रधान स्व. इंदिरा जी गांधी यांची आज पुण्यतिथी..💐💐  🙏 विनम्र-अभिवादन..🙏  ...
31/10/2025

💐💐 भारताचे सक्षमपणे नेतृत्व केलेल्या दिवंगत पंतप्रधान स्व. इंदिरा जी गांधी यांची आज पुण्यतिथी..💐💐
🙏 विनम्र-अभिवादन..🙏









 #शुभ_दीपावली ✨🪔आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 💐🎉✨🚩तिमिरातून तेजाकडे, अज्ञानातून ज्ञानाकड...
20/10/2025

#शुभ_दीपावली ✨🪔

आपणांस व आपल्या संपूर्ण परिवारास दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा! 💐🎉✨🚩

तिमिरातून तेजाकडे, अज्ञानातून ज्ञानाकडे घेऊन जाणारे हे प्रकाशपर्व आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान आणि आरोग्याची उधळण करो, ही मनःपूर्वक शुभेच्छा!
या शुभ दिवशी नवीन उमेद, उत्साह आणि प्रकाश आपल्या आयुष्यात नवा आनंद घेऊन येवो.💐🌹✨

#शुभ_दीपावली !!!! 🪔


असं म्हणतात कि माणसाने कृतज्ञ असाव पण कृतघ्न नसाव..तत्व आणि विचारधारेला मुठमाती देऊन राजकारण करणे हे अलीकडच्या महाराष्ट्...
15/09/2025

असं म्हणतात कि माणसाने कृतज्ञ असाव पण कृतघ्न नसाव..
तत्व आणि विचारधारेला मुठमाती देऊन राजकारण करणे हे अलीकडच्या महाराष्ट्राच्या राजकारणाचे वैशिष्ट्य बनले आहे.

काँग्रेस पक्षाने चव्हाण कुटुंबाच्या दोन पिढ्याना 4 वेळा मुख्यमंत्री पदाची संधी दिली.
सत्ता, पद आणि प्रतिष्ठा दिली तरीही हे आदर्श नेते काँग्रेस वर टीका करत आहेत.
अशोकरावजी चव्हाण साहेबांचे वडील स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब 1948-49 मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. नांदेडचे नगराध्यक्षपद (1956 ), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्षपद आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालपद अशी विविध पदे त्यांनी भूषविली. 1956 मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे 1960 मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर 1972 पासून फेब्रुवारी 1975 पर्यंत ते कृषिमंत्री होते. 21 फेब्रुवारी 1975 रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
1975 ते 1977 पर्यंत आणि 13 मार्च 1986 ते 26 जून 1988 पर्यंत दोनदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले.

'आदर्श ' मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेबांनी पुढील पदे उपभोगली.👇

1984 : काँग्रेस पक्षात प्रवेश आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस झाले.
मार्च 1987 - नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणुकीतून पहिल्यांदा संसदेत निवडून आले
1989 : लोकसभा निवडणुकीत जनता दलाच्या डॉ. व्यंकटेश काब्दे कडून पराभूत झाले.
1992: शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तसेच उस्मानाबाद आणि बुलढाण्याचे पालकमंत्री झाले.
फेब्रुवारी 1993 : विधानपरिषदेवर नियुक्ती झाली.
ऑक्टोबर 1999 : तत्कालीन मुदखेड विधानसभा मतदार संघातून विजयी.
02 नोव्हेंबर 1999 : विलासरावजी देशमुख साहेब यांच्या मंत्रिमंडळात अशोकरावजी महसूलमंत्री झाले.
सप्टेंबर 2003 : सुशीलकुमार शिंदे यांच्या मंत्रिमंडळात अशोकरावजी परिवहनमंत्री झाले.
ऑक्टोबर 2004 : मुदखेड मतदारसंघातून विजयी होऊन, उद्योग खात्याचे मंत्री म्हणून नियुक्ती झाली.
2008 : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले.
ऑक्टोबर 2009 : भोकर मतदारसंघातून विजयी.
नोव्हेंबर 2009 : अशोकरावजी सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

2010 : आदर्श घोटाळ्याचा आरोप, त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला.
मे 2014 : नांदेड लोकसभा मतदारसंघातून विजयी
जानेवारी 2017 : काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली.
मे 2019 : भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांच्याकडून 42 हजार मतांनी पराभूत झाले. तद्नंतर लगेच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
ऑक्टोबर 2019- भोकरमधून 97,500 मताधिक्याने विजयी झाले.
डिसेंबर 2019 - शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीत सार्वजनिक बांधकाम मंत्री झाले.
जुन 2022 - शिवसेनेत शिंदे गटाने बंडखोरी केली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला, सबब मंत्रिपद गेले.

जेलमध्ये जाण्याऐवजी भाजप मध्ये गेलेलं बर हा विचार केलेल्या या महाशयांनी अशा कितीही कथा रंगवून, लोकांना काहीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी लोक वेडी नाहीत हे यांना समजायला हवं 😄

आता तुम्हीच सांगा यांना काँग्रेस पक्षाने अजून काय द्यायला हवं....???




✍️ डॉ. लखन भोगम
9049847575

👑 💐  गांधीवादी विचारांनी प्रेरित असणारे, कष्ट, प्रामाणिकपणा आणि संघर्षातून घडलेले संघर्षवादी नेतृत्व , महाराष्ट्र प्रदेश...
31/08/2025

👑 💐 गांधीवादी विचारांनी प्रेरित असणारे, कष्ट, प्रामाणिकपणा आणि संघर्षातून घडलेले संघर्षवादी नेतृत्व , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांना वाढदिवसाच्या काँग्रेसमय शुभेच्छा...!💐🌹🎂




आमचे नेते, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांनी 35 वर्षांपूर्वी सुरु केलेल्या सद्भभावना दौडमध्ये आज सहभागी झालो.    ...
20/08/2025

आमचे नेते, स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांनी 35 वर्षांपूर्वी सुरु केलेल्या सद्भभावना दौडमध्ये आज सहभागी झालो.
स्वर्गीय राजीवजी गांधी यांचा हा पूर्णकृती पुतळा आमचे नेते स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील साहेब यांनी रविवार 19 ऑक्टोबर 2003 रोजी उभारला. या पुतळ्याचे अनावरण श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या शुभहस्ते झाले.
आज स्वर्गीय पी. एन साहेब हयात नसताना या पुतळ्याशेजारी उभे राहताना मनाला तीव्र वेदना झाल्या.
स्वर्गीय साहेबांनी संपूर्ण जीवनभर एक आचार, एक विचार आणि एक तत्व जोपसले आणि अखंड आयुष्यभर त्या तत्वाशी प्रामाणिक राहिले.

ऑगस्ट महिना आला कि, करवीर मधील साहेबांच्या प्रत्येक कार्यकर्त्याला दौडची ओढ लागायची. 20 ऑगस्टला प्रत्येक गावागावातून कार्यकर्ते सद्भभावना दौड आणि शेतकरी मेळाव्यासाठी रवाना व्हायचे. देशातले आणि राज्यातल्या मोठमोठ्या नेत्यांनी या शेतकरी मेळाव्यांना संबोधित केले आहे.
साहेबांचा कार्यकर्त्यांवर प्रचंड जीव असे. साहेबांचा एकही कार्यकर्ता उपाशीपोटी परत जाऊ नये, याची काळजी साहेबांच्याकडून स्वतः घेतली जायची. त्यासाठी झुणका-भाकरीचा मराठमोळा बेत असायचा.
यासाठी गॅरेजवरून गावागावात गाड्या फिरून जोंधळे, झुणक्याचं पीठ कार्यकर्त्यांच्या घरापर्यंत पोहोचवलं जायचं. २० तारखेच्या सकाळी गावात घराघरातून भाकरी बडवतानाचे आवाज घुमायचे. माता-भगिनींच्या हाताने बनवलेल्या झुणका- भाकरी मोठ्या कपड्यात बांधून सूतगिरणीकडे रवाना व्हायचा. दौड संपल्यावर त्या झुणका-भाकरीवर ताव मारून आम्ही घरी परतायचो… त्या क्षणांचा गोडवा आजही मनात दरवळतो.

स्वर्गीय साहेबांचा आणि काँग्रेस पक्षाचा विचारांचा प्रभाव आमच्या जीवनावर खोलवर झालेला आहे. या राजकीय सामाजिकरणाची सुरवात अगदी शालेय जिवनापासून झाली.
मी हायस्कुलमध्ये शिकत असताना पांढरा शर्ट आणि खाकी चड्डीवर टेम्पोमधून दौडला जात असलेलं आजही आठवतं.
त्यामुळे साहेबांनी केलेले राजकीय संस्कार आणि दिलेला विचार येणाऱ्या काळातही जोपासण्यासाठीचा प्रयत्न आगामी काळातही केला जाईल.

तूर्तास इतकंच...




#निष्ठावंत

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Lakhan Bhogam posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Lakhan Bhogam:

Share