27/05/2016
बाभळगावसारख्या लहान खेड्याचा सरपंच ते केंद्रीय
मंत्री व्हाया राज्याचा आठ वर्ष मुख्यमंत्री, अशी
दिमाखदार राजकीय कारकिर्द घडवणारे नेते म्हणून
विलासराव देशमुख साहेब परिचित आहेत. वसंतराव
नाईक यांच्यानंतर राज्याचा सर्वाधिक काळ
मुख्यमंत्री राहिलेला हरहुन्नरी चेहरा म्हणजे
विलासराव देशमुख. आपल्या राजकीय
मुत्सद्दीपणाच्या बळावर विलासराव 1999 मध्ये
सर्वसंमतीने काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे पहिले
मुख्यमंत्री बनले. त्यानंतर 2009 च्या निवडणुकांमध्ये
पुन्हा आघाडीची सत्ता आल्यावर दुसर्यांदा
विलासराव देशमुखांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाच
ी माळ पडली. 26/11 हल्यामुळे बळी गेला. पण नंतर
आधी राज्यसभेवर आणि त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळात
विलासराव साहेबांनी वर्णी लावून घेत दमदार
कमबॅक केलं.
विलासराव दगडोजीराव देशमुख साहेब यांची
कारकिर्द
जन्म- 26 मे 1945
ठिकाण- बाभळगाव (लातूर)
शिक्षण- बी. एस्सी., बी. ए. एलएलबी
(गरवारे महाविद्यालय आणि आयएलएस विधी
महाविद्यालयात शिक्षण)
राजकीय कारकिर्द- बाभळगावचा सरपंच ते केंद्रीय
मंत्री व्हाया मुख्यमंत्री
1972 - काँग्रेस कार्यकर्ता म्हणून कारकिर्दीला
सुरुवात
1974 ते 1976 - बाभळगावचे सरपंच
1975 ते 1978 - उस्मानबाद जिल्हा युवक काँग्रेस
अध्यक्ष
1976 - लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक
1976 ते 1979 - लातूर पंचायत समितीचे सदस्य
1979 - उस्मानाबाद जिल्हा बँक आणि राज्य
सहकारी बँकेवर संचालक
1980 - लातूरचे आमदार म्हणून निवड
1982 ते 1985 - ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून
निवड , त्यानंतर त्यांनी गृह, सामान्य प्रशासन, कृषी,
परिवहन, शिक्षण, तंत्र-शिक्षण, क्रिडा आणि युवक
कल्याण या खात्यांचे राज्यमंत्री म्हणून काम.
1986 ते 1995 - कॅबिनेट मंत्री म्हणून ग्रामविकास,
कृषी, सहकार, दुग्ध-विकास आणि पशसंवर्धन,
सार्वजनि��
, सहकार, दुग्ध-विकास आणि पशसंवर्धन, सार्वजनिक
बांधकाम, उद्योग, शिक्षण, तंत्र व उच्च शिक्षण,
क्रिडा व युवक कल्याण, परिवहन, संसदीय कामकाज,
सांस्कृतिक कार्य आदी खाती सांभाळली.
1995- विधानसभा निवडणुकीत पराभूत.
(35 हजार मतांच्या फरकानं पराभूत)
1995-1999 - राजकीय विजनवासात.
1999- पुन्हा विधानसभेवर निवड.
(91 हजार मतांच्या फरकानं दणदणीत विजय)
18 ऑक्टोबर 1999- मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा
वर्णी.
18 जानेवारी 2003- मुख्यमंत्री पदावरून पायउतार.
11 नोव्हेंबर 2004- दुसर्यांदा मुख्यमंत्रीपदावर
विराजमान.
7 डिसेंबर 2008- मुख्यमंत्री पदाचा राजीनामा (मुंबई
हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पद सोडावे
लागले)
ऑगस्ट 2009- राज्यसभेवर निवड.
मे 2009 ते जानेवारी 2011- केंद्रीय अवजड
उद्योगमंत्री.
जानेवारी 2011 ते जुलै 2011- केंद्रीय
ग्रामविकासमंत्री.
जुलै 2011 पासून - केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञानमंत्र
ी.
राजकारणाबरोबरच विविध क्षेत्रांमध्ये विलासराव
साहेबांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला.
त्यांनी व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि क्रिकेटची
आवड जपली. विशेष म्हणजे आपलं राजकीय कौशल्य
वापरत त्यांनी मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या
अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली.
समाजकारणातही विलासराव साहेबांनी भरीव
योगदान केले. मांजरा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून
त्यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात काम
करणार्या अनेक संस्थांची उभारणी केली.तसेच अनेक
साखर कारखाने उभारून शेतकर्याना आर्थिक द्रष्ट्या
बळकट करण्याची उत्कृष्ट कामगिरी केली.....आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!!!👏👏👏
मी साहेब समर्थक....!!!