24/07/2026
आळंदी व देहू येथून पंढरपूरकडे निघालेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पवित्र पालखी सोहळ्यादरम्यान चित्ररथ, पथनाट्ये व माहितीपत्रकांच्या माध्यमातून विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी अभियान (ग्रामीण) (VB-GRAMG) योजनेबाबत जनजागृती करण्यात येत आहे.
या जनजागृती उपक्रमात मा. मंत्री (रोहयो) श्री. भरत गोगावले यांनी सहभाग घेत वारकरी बांधवांशी संवाद साधला तसेच नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.
#आषाढीवारी2026 #वारी2026 #विकसितभारत #रोजगारहमी
Ministry of Rural Development, Government of India
CMOMaharashtra
Bharatsheth Gogawale - भरतशेठ गोगावले
Maharashtra DGIPR