12/04/2026
अभी न जाओ छोडकर...
के दिल अभी भरा नहीं!
आपल्या स्वरांनी जगाला मोहिनी घालणाऱ्या प्रख्यात अष्टपैलू गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतसृष्टीतील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.
नऊ दशकांहून अधिक काळ प्रदीर्घ कारकिर्दीत आशाताईंनी शास्त्रीय संगीतापासून ते पॉप गाण्यांपर्यंत प्रत्येक प्रकारात आपला वेगळा ठसा उमटवला. तब्बल २० हून अधिक भाषांमध्ये हजारो गाणी गाण्याचा विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे. त्यांनी गायलेली प्रत्येक रचना आजही तितकीच टवटवीत आणि उत्साहवर्धक वाटते. स्वतःची एक स्वतंत्र शैली निर्माण करून त्यांनी संगीतात आपले अढळ स्थान निर्माण केले होते.
त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही! जरी त्या आज आपल्यात नसल्या, तरी त्यांनी मागे ठेवलेला सुरांचा अनमोल ठेवा अनंतकाळ आपल्याला साथ देत राहील.
आशाताईंच्या आत्म्यास सद्गती लाभो. त्यांचे कुटुंबीय आणि चाहत्यांच्या दुःखात भाजपा महाराष्ट्र परिवार सामील असून त्यांना या दुःखातून सावरण्याचे बळ लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!