16/07/2026
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड करणाऱ्यांनी जबाबदारी स्वीकारलीच पाहिजे!
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, भविष्याचा आणि घटनात्मक हक्कांचा प्रश्न आज गंभीर बनला आहे. विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते, संशोधक आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक शांततामय मार्गाने संघर्ष करत आहेत.
या विषयावर आंबेडकरी युवक अभिजीत दिपके आणि त्यांच्या युवा सहकाऱ्यांनी सुरू केलेली जनजागृती आज देशभरात आवाज बनत आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, संविधानिक हक्कांचा आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा हा लढा आता प्रत्येक जागरूक भारतीयाचा लढा बनला आहे. या तरुणांच्या पुढाकाराचे मनापासून कौतुक आणि त्यांना सलाम!
जे व्यक्तिमत्त्व देशासाठी संशोधन करते, सैन्यदलासाठी काम करते, पर्यावरण आणि शिक्षणासाठी आयुष्य वाहते, त्या व्यक्तीला आपल्या मागण्या मांडण्यासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतो, ही लोकशाहीसाठी चिंतेची बाब आहे.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असेल, तर त्याची नैतिक जबाबदारी शिक्षण मंत्रालयावर येते. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रश्नाची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी आमची स्पष्ट मागणी आहे.
केंद्र सरकारने तातडीने सोनम वांगचुक यांच्याशी चर्चा करून सकारात्मक तोडगा काढावा. लोकशाहीमध्ये संघर्षाचे उत्तर दडपशाही नसून संवाद असतो.
देशातील सर्व प्रसारमाध्यमांनी, सामाजिक संघटनांनी, विद्यार्थी संघटनांनी आणि जागरूक नागरिकांनी या विषयाला प्राधान्य द्यावे. हा कोणत्याही एका व्यक्तीचा प्रश्न नसून देशातील विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे.
India
Maharashtra
Information Bureau (PIB)
माझा Marathi @लोकमत @सकाळ Times Lokmat
– प्रशांत तुळवे
जिल्हा अध्यक्ष
शिव उद्योग सहकार सेना महासंघ
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)