Revan Kolekar

Revan Kolekar This is a oficial page Revan kolekar

18/03/2023

माणुसकीला वाव देणारी माणसं शोधावी आयुष्यात माणुसकीचा आव आणणारी तर खूप भेटतात.....!😊

I have reached 100 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉
17/02/2023

I have reached 100 followers! Thank you for your continued support. I could not have done it without each of you. 🙏🤗🎉

✍️बसवराज बोम्मई यांचे आभार... एकाच दिवसात जत तालुका महाराष्ट्रत आहे हे सर्व मंत्र्यांना दाखवून दिलं आणि जागृत केलं.. वर्...
24/11/2022

✍️बसवराज बोम्मई यांचे आभार...
एकाच दिवसात जत तालुका महाराष्ट्रत आहे हे सर्व मंत्र्यांना दाखवून दिलं आणि जागृत केलं.. वर्षानुवर्ष सतत दुष्काळाच्या झळा सोसत असलेला जत तालुका प्रशासनाच्या योजना अभावी आणि विकासाच्या दृष्टीने इतरांच्या तुलनेत खूप मागे आहे, राज्यकर्त्यांच्या नाकर्तेपणामुळे व भ्रष्ट नेत्यामुळे अजूनपर्यंत या भागात पाणी पोचलं नाही. प्रत्येक निवडणुका पाणी या प्रश्नावर लढायच्या आणि जिंकायच्या मात्र जत तालुका नेहमी तहानलेलाच असतो....मात्र याच भागात कर्नाटक सरकारने त्यांच्या सीमाभागात पाणी देऊन एकप्रकारची आम्हाला आशा लावली आणि प्रत्येकाला वाटतं आम्ही जर या कर्नाटक भागात असतो तर आम्हाला ही पाणी मिळालं असतं, ही प्रत्येकाची भावना आहे. आत्ता आम्ही आशा गावात राहतो की दोन कि.मी गावापासून अंतर पार केलं की पाण्याचा नुसता खळखळ आवाज येतो...पण आमची गावं पाण्याविना तडफडत आहेत. शासकीय एखाद काम असलं की आम्हाला थेट जत जाण्यासाठी साठ कि.मी अंतर पार करून चक्रा माराव्या लागतात, आणि तिथून म्हणजे आमच्या गावापासून पंधरा कि.मी अंतरावर विजापूर जिल्हा आहे. आता या सीमाभागातील लोकांचा थेट आर्थिक व्यवहार हा जास्त करून कर्नाटक मध्ये येतो परंतु शासकीय कामव्यतिरिक्त महाराष्ट्राची संबंध राहत नाही...हे सरकारने आणि इथल्या स्थानिक आमदार आणि खासदारांनी समजून घ्यावं..आणि सीमा भागातील लोकांचे प्रश्न सोडवण्याचा तात्काळ प्रयत्न करावा, वर्षातून दोन-तीन वेळा तरी कर्नाटक सरकारचा जलसंपदा मंत्री येऊन महाराष्ट्रात भाषण देऊन जातो, परंतु महाराष्ट्राचा जलसंपदा मंत्री या भागात कधी आलेला पाहिला नाही. कर्नाटक सरकारने अनेक प्रकारच्या शासनाच्या सुविधा थेट शेतकऱ्यांना पुरवून शेतकरी समृद्ध केले आहेत. पण महाराष्ट्र सरकार जत तालुक्यावर नेहमी दुजाभाव करत आलेलं आहे... निश्चितचं आम्हाला ज्या मातीत जन्माला आलो त्या मातीविषयी अभिमान आहेच, मराठी असल्याचा गर्व ही तितकाच आहे. पण शेवटी पोटापाण्याचा आणि जगण्या-मरण्याचा प्रश्न आहेच की आणि तोच सतावतोय, जत तालुक्यातील पोटाची खळगी भरण्यासाठी वर्षानुवर्ष ऊस तोडी करणारे कामगार किती दिवस कामगार म्हणून स्थलांतर करत राहणार, स्वतःची शेती असून सुद्धा पाण्याविना पडीक पडलेली शेती आपल्याला पाहायला मिळते, कोणत्याही गावाची कर्नाटकमध्ये जाण्याची ईच्छा नाही परंतू महाराष्ट्र सरकार जर जत तालुक्यावर अन्याय करत असेल तर सीमाभागातील लोकं कठोर निर्णय घेऊ शकतात, त्यामुळे जत तालुक्यातील पाण्याविना जी गावे वंचित आहेत त्यांचा पाण्याच्या प्रश्न मिटवावा... स्वतःच्या कारकिर्दीत जत मध्ये कधी पाऊल न टाकणाऱ्या नेतेमंडळींनी लांबून पोकळ बाता मारून जत चा विकास होत आहे असं खोटंनाट्य करून बोलू नये कारण प्रत्यक्षात खूप विदारक चित्र आहे या जत च्या माळरानाचं....!!
करेवाडी (को.बो) जत

27/10/2022

धर्माच्या रूढी, परंपरा, चालीरीती संस्कृती, पारंपारिक नृत्य, वेशभूषा, कला, अश्या वेगवेगळ्या अद्भुत कला ह्या 5G सारख्या डिजिटल युगात अविरतपणे टिकवून ठेवण्याचं काम वर्षानुवर्ष.....
#भंडाऱ्याचीउधळण

10/08/2022

स्वतःला योग्य वाटेल असंच जगायचं, लोकांचा विचार अजिबात करायचा नाही.🤗😊😊😊

✍️पाहता पाहता दिवस कसे गेले कळलंच नाही, एका लहानशा रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाल्याचे जेव्हा मी निरीक्षण करून पाहिले तेव...
23/06/2022

✍️पाहता पाहता दिवस कसे गेले कळलंच नाही, एका लहानशा रोपट्याचे वृक्षात रूपांतर झाल्याचे जेव्हा मी निरीक्षण करून पाहिले तेव्हा कुठं उमगलं, हसण्याचे, आनंदाचे, खेळण्याचे, बागडण्याचे स्वतःला एका वेगळ्या दुनियेत हरवून बसलेले दिवस इतके पटकन संपुष्टात येतील असे कधी वाटलेच नाही. आज त्या गोष्टींची जाणीव मला का होते आहे की ज्या गोष्टी घडून गेलेल्यानंतर काही गोष्टी एकटे असताना सातत्याने का आठवतात..यामागे काहीतरी कारण असावेच नक्की. आपण जेव्हा लहान-मोठ्या गोष्टी शिकत असताना ज्या चुका करतो त्या आयुष्यभर स्मरणात लक्षात आठवणीत राहतात त्यातून नवीन अनुभव मिळत असतो हे मात्र नक्की, त्या अनुभवामुळे प्रत्येकाला पुन्हा आपण आपल्या हातून चुका होणार नाहीत याची खात्री असते, आपल्या हातून घडलेली एक छोटेशी चूक जेव्हा सर्वात जास्त दुःख देऊन जाते तेव्हा मात्र जीव कासावीस होतो. मग येणारा प्रत्येक दिवस नकोसा वाटायला लागतो, का ते माहीत नाही एवढा त्रास का होतो. इतक्‍या असह्य वेदना जाणवतात की यातून मार्ग मिळेल का नाही आणि मिळालेल्या मार्गतून सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात की नाही याची शास्वती नसते. आपण आपल्या विश्वात हरवून जातो, परंतु या सर्व प्रश्नांची उत्तरेही आपल्यालाच शोधायला हवी, आपणच शोध घ्यायला हवा नवीन कल्पना काही सुचतील का मी माझ्या काळजावर घातलेला घाव विस्कळीत केलेले माझे आयुष्य मला पुन्हा जुळवता येईल का..?? अशा कोणत्या औषधाचा वापर करायला हवा की जेणेकरून पडलेले घाव भरता येतील. अस म्हणतात ना जिथं हरवलं आहे तिथंच शोधलं तर ते नक्कीच सापडत. परंतु जे तुटलेला आहे त्याचं काय..??
एक तर ते सोडून द्यावं म्हणजे त्रास होणार नाही. नाहीतर जुळवन्याचा प्रयत्न करावा हेच उत्तर कदाचित योग्य असू शकतं...!!

  पृथ्वीतलावर निसर्ग आहे म्हणून मानवी जीवन आहे. कारण संपूर्ण विश्वात एकमेव पृथ्वीतलावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. त्याम...
05/06/2022


पृथ्वीतलावर निसर्ग आहे म्हणून मानवी जीवन आहे. कारण संपूर्ण विश्वात एकमेव पृथ्वीतलावर सजीव सृष्टी अस्तित्वात आहे. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यातलं मानवी जीवनाचं वस्ती स्थान निसर्गाच्या घटकांवरती पूर्णपणे अवलंबून आहे. त्यातलाच महत्वाचा घटक म्हणजे झाडे त्याच्यापासूनच आपल्याला प्राणवायु ऑक्सिजन मिळतो. पण अलीकडच्या काळात विकासाच्या नावावर जंगलांच्या कत्तली केल्या जातात. आणि त्या जागेत सिमेंटाची जंगले उभी केली जातात. यातूनच आज शहर च्या शहर उभी राहीली. विकासाच्या नावावर उभी राहणारी ही मानवनिर्मित सिमेंटाची जंगल अवाढव्य स्वरूपात वाढत आहेत. नक्कीचं यातून मानवाचा जरी विकास झाला असला तरी निसर्गावर त्याचा विपरीत परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो.
साधं उदाहरण घ्यायचं झालं तर आपलं निसर्गाने नटलेलं कोकण' अलीकडच्या काळात अनेक नवीन उद्योगधंद्यामुळे आज तिथली झाडे खूप मोठ्या प्रमाणावर तोडली जातात. त्यामुळे पूर्वीच जे कोकनाचं वैभव होत ते आत्ता कमी कमी होत जाताना दिसतं.
एक झाडं माणसाला त्याच्या आयुष्यात किती उपयोगी पडत हे लहानपणापासून शिकत आलो आहे. मानवाच्या अनेक गरजा भागविण्यासाठी ते झाडं खूप महत्त्वाचं ठरतं त्यामुळे झाडांना खूप महत्त्व आहे. पण ते महत्व जाणून घेऊन झाडं जगवण्यासाठी आपण प्रत्येकानं प्रयत्न केले पाहिजे. झाडांचे आपल्यावर झालेले उपकार त्याची परतफेड म्हणून प्रत्येकाने कृतज्ञतेने वृक्षारोपण करणे काळाची गरज आहे.
संत तुकाराम महाराजांनी वृक्षांचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर असा अभंग मांडला होता. तो अभंग म्हणजे 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे' यातुन त्यांनी वृक्षांविषयी खूप चांगल्या प्रकारे महत्त्व पटवून दिले आहे.
त्यामुळे आज ५ जून पर्यावरण दिवस या निमित्ताने आपण नवीन संकल्प करून प्रत्येकाने झाडे लावूया झाडे जगवूया हा संदेश देऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करूया...!!

30/05/2022

एका ठरावीक वयापर्यंतचं हे नातं शक्यतो निर्मळ आणि पवित्र राहतं..हे नातं असंच पुढं राहील की नाही सांगता येत नाही.
पण बालपणीची मैत्री ही खूप निर्मळ असते...😍

28/05/2022

*आयुष्याच्या प्रवास खुप लांब आहे. त्याला वळणं ही तितकीच आहेत. पण तो प्रवास कधी अनानंदाने सुखावलेला असेल तर कधी दुःखाने कोमजलेला असेल. नेहमीच तो खूप आनंदी आनंद असेल असं काही नाही.. प्रवासात येणारा प्रत्येक व्यक्ती कायम सोबत असेल असंही काही नाही. ज्याला ज्या स्टेशनला उतरायचं आहे तो त्याच्या परीने उतरून जात असतो...शेवटी काय..? आयुष्याचा प्रवास तर आपल्याला एकट्यालाचं करायचा आहे ना....???*

तू कधी देणार पहिल्यासारखा मोकळा श्वास,😝 वाट बघतोय तुझी हा तर माझा काल्पनिक भास,नको नको बरा आहे हा मास्क,😷माणूस म्हणून मा...
22/03/2022

तू कधी देणार पहिल्यासारखा मोकळा श्वास,😝
वाट बघतोय तुझी हा तर माझा काल्पनिक भास,

नको नको बरा आहे हा मास्क,😷
माणूस म्हणून माणसाने पसरवलेल्या दुर्गंधीचा येत नाही वास.....!!☺️😂🤣
#22मार्चLockdouwn

23/02/2022

सत्य
परेशान हो सकता है
लेकीन
पराजित नहीं....👍

06/02/2022

फारच थोडे लोक या पृथ्वीतलावर जन्माला येतात आणि त्यांना अमरत्व प्राप्त होत असत, त्यातल्याच एक लता मंगेशकर आहेत, अनेक चित्रपटातील गाणी असतील, देशभक्तीपर गीते गाऊन तुम्ही देशप्रेमाचा कणखरपणाही अलगद जपायला लावतात. आज तुमचा गळा शांत झाला, पण येणारी प्रत्येक पिढी तुमच्या गाण्याला दाद देत राहील आणि गाणी ऐकून आत्मसुख उपभोगत राहील, समाधानी राहील यात शंका नाही.. तुमचा आवाज नेहमीच आमच्या ओठांवर रेंगाळत राहील. तुम्ही आहात आणि असाल. हे जग आणि विशेषतः आपला देश तुमचा नेहमीच ऋणी असेल...!!
भावपूर्ण श्रद्धांजली..💐💐💐

Address

Sangli

Telephone

+918600972119

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Revan Kolekar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Revan Kolekar:

Share