20/01/2026
वसई–विरार महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांनी त्यांच्या ग्रॅज्युटी संदर्भातील टेंडरमध्ये झालेल्या बदलामुळे त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत माझ्याकडे तक्रार केली आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून, ती कर्मचाऱ्यांच्या मूलभूत हक्कांशी थेट संबंधित आहे.
ही माहिती मिळताच मी तात्काळ महानगरपालिका आयुक्त मा. मनोज सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून हा प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला. आयुक्तांनी या प्रकरणाची दखल घेत, सफाई कर्मचाऱ्यांच्या ग्रॅज्युटीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, तसेच एका महिन्याच्या आत योग्य कार्यवाही करून अंतिम निर्णय जाहीर केला जाईल, असे स्पष्ट आश्वासन दिले आहे.
सफाई कर्मचाऱ्यांवर होणारा कोणताही अन्याय सहन केला जाणार नाही. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकप्रतिनिधी म्हणून मी ठामपणे उभा असून, जोपर्यंत त्यांना पूर्ण न्याय मिळत नाही, तोपर्यंत या विषयाचा सातत्याने पाठपुरावा केला जाईल.