01/04/2026
📍 *मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर सर यांच्या शुभहस्ते "माझं गाव आरोग्य, संपन्न गांव अभियानाचा" मौजे लाडगाव येथून जिल्हास्तरीय शुभारंभ.....*
🌍 *दिनांक 01 एप्रिल*
*छत्रपती संभाजीनगर :*
♻️ माझं गाव,आरोग्य संपन्न गाव मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अभय धानोरकर यांचे शुभहस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र वरुडकाझी अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत कार्यालया लाडगाव हिवरा येथे ग्रामसभा घेऊन करण्यात आला...
📍याप्रसंगी मा. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नागेश सावरगावकर मा.सरपंच श्रीमती जयश्री बागल मा.उपसरपंच श्रीमती सरला पोफळे ग्रामपंचायत अधिकारी श्री.नानासाहेब चव्हाण,श्री.चंदन गणोरे, समुदाय आरोग्य अधिकारी अश्विनी नागरे ग्रामस्थ मंडळी, आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका, महिला मंडळ, गांव पातळी वरील कर्मचारी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या...
👉ग्रामीण भागातील जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने ‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ हे अत्यंत महत्त्वाकांक्षी अभियान सुरू करण्याचा निर्णय घेतला असून या राज्यव्यापी अभियानाला १ एप्रिलपासून प्रारंभ झाला आहे..
👉मा.जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सदर कार्यक्रमाप्रसंगी सांगितले की, हे अभियान फक्त सरकारी कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता, लोकसहभागाद्वारे त्यातून एक व्यापक आरोग्य चळवळ उभी राहावी, असा सरकारचा मानस आहे.
👉या अभियानांतर्गत प्रत्येक गाव आरोग्यसंपन्न केले जाणार आहे. तसेच या उपक्रमामुळे तळागाळातील लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचविण्यावर भर दिला जाणार आहे. फक्त आजारांवर उपचार करण्यापेक्षा ते होऊ नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन आणि पोषण यासारख्या मूलभूत घटकांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
👉संसर्गजन्य आजारांसोबतच बदलत्या जीवनशैलीमुळे उद्भवणारे असंसर्गजन्य आजार, माता-बाल आरोग्य आणि मानसिक आरोग्य यासारख्या विषयांनाही या मोहिमेत सामावून घेण्यात आले आहे. या अभियानात ग्रामपंचायतीपासून ते जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणा सक्रियपणे सहभागी होणार आहेत.
👉गावागावात स्वच्छतेचा आणि आरोग्याचा जागर करून आरोग्यदायी गाव ही संकल्पना राबवण्याचा सरकारचा प्रयत्न राहणार आहे.
👉या अभियानात चांगली कामगिरी करणाऱ्या गावांना ‘आरोग्यसंपन्न गाव’ म्हणून गौरविण्यात येणार आहे. अशा गावांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख रकमेचा पुरस्कार देऊन प्रोत्साहित केले जाणार आहे. या संपूर्ण अभियानासाठी राज्य सरकारने ८० कोटी ७५ लाख