सत्यजीत साळवे

सत्यजीत साळवे आजाद विचारो का आजाद व्यक्ती...

23/08/2026

अनुसूचित जातीला केंद्रात १५% आरक्षण दिलेले असतांना महाराष्ट्रातील बीजेपी सरकार अनुसूचित जातीला १३% च आरक्षण देत आहे... आमच्या हक्काचे २% आरक्षण मनुवाद्यानी कमी केलेले असल्याने त्याची अगोदर पूर्तता करावी... या दोन टक्क्यात महार (बौद्ध), मातंग, चर्मकार यासह सर्वच ५९ जातीचे नुकसान केलेले आहे... या हरामखोरीच्या विरोधात अगोदर अनुसूचित जातीच्या सर्वच जातीच्या लोकांनी जाब विचारावा...!

तसेच अनुसुचित जमातीला केंद्रात ७.५% आरक्षण दिलेले असतांना महाराष्ट्रातील बीजेपी सरकारने त्यांचे सुद्धा ०.५% आरक्षण कमी केलेले आहे... ही हरामखोरी च्या विरोधात अनुसूचित जमातीच्या जाती सुद्धा जाब विचारतील काय...?

यानंतर इतर मागासवर्गीय (ओबीसी) यांना केंद्रात २७% आरक्षण असतांना महाराष्ट्रातील बीजेपी सरकारने फक्त १९% च जागा देऊन त्यांचा ८% जागा कमी करुन अन्याय केलेला असताना ओबीसी आजही अशा सरकारला जाब विचारणे तर सोडा उलट आरक्षण संपविण्यासाठी याच लोकांना मत देऊन निवडून आणत आहेत... अशा लोकांना काय म्हणावे...?

पण आता EWS चे उदाहरण घेतले तर त्यांना केंद्रात १०% आरक्षण जसे दिले आहे त्यांना महाराष्ट्रात सुद्धा १०% आरक्षण दिलेले आहे... यातून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांनी आपल्या हक्काचे आरक्षण हिरावून घेतल्या नंतर हा भामटा मुख्यमंत्री आमच्याच कॅटेगरी मधील जाती जाती मध्ये बांधणे लावण्याचे काम चालू केलेले आहे... या भट कारस्थानाला आमचा समाज बळी पडलेला असून त्याने त्याच्या समाजाला फायदा मिळावा यासाठी काडीमात्र तडजोड करायला तयार नाही... त्यातील हिंदुत्वाची वज्रमूठ आवळणाऱ्या लोकांना त्याच्यातील २% आरक्षण सुद्धा काढून द्यायला तयार नाही... पण अनुसूचित जाती मध्ये उपवर्गीकरण करण्यासाठी मात्र हा तत्पर आहे...

ज्या लोकांनी हिंदुत्वाची वज्रमूठ मजबूत केली आहे अशा लोकांना ब्राह्मण मुख्यमंत्री याने त्यांना स्वतंत्र २% आरक्षण अतिरिक्त द्यावे त्या अगोदर अनुसुचित जातीचे आजपर्यंत न दिलेले २% आरक्षण अगोदर १५% करावे त्यानंतर काय झक मारायची ती मारावी... अशा भाषेत बोलण्याची वेळ ब्राम्हण मुख्यमंत्र्याने स्वतः आणलेली आहे... म्हणून आता आमच्या भावा भावा मध्ये भांडणे लावणाऱ्यांना जबाबदार धरण्यात येणार आहे... त्यातही त्यांनी शिव्या खाण्याची तयारी करावी... उद्या मत मागायला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसी यांच्याकडे याल तर त्यांच्या हक्काचे आरक्षण दिल्यावरच त्यांच्या दारावर यावे... आणि यांच्यासाठी मत मागायला येणाऱ्या दलालांना सुद्धा समाजाने धडा शिकवावा...

#सत्यजीत_साळवे

साहित्य रत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...अण्णाभाऊ तुम्ही कधीच जातीचा अभिमान बाळ...
18/07/2026

साहित्य रत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन...

अण्णाभाऊ तुम्ही कधीच जातीचा अभिमान बाळगला नाही, तुम्ही कधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत गेला नाही, तुम्ही ज्या कम्युनिस्ट चळवळीत अख्खी हयात घालविली त्या कम्युनिस्टांचा देवावर विश्वास नाही... तुमच्या साहित्यात जातीचा अभिमान दिसला नाही... पृथ्वी शेष नागाच्या फण्यावर तळलेली नसून ती कामगारांच्या हातावर तळलेली आहे हा वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही जगाला दिला आणि शेवटी जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव हे तुम्ही तुमच्या जातीला सांगून गेले असताना तुमच्या जातीचे लोकं आज तुम्हाला बदनाम करण्यासाठी तुम्हाला एका जाती पुरते मर्यादित करण्यासाठी मनुवाद्यांच्या वळचणीला जाऊन बसले आहेत...
ते आज पृथ्वी शेषनागाच्या फाण्यावरच तळलेली आहे असे सांगत आहेत... ते तुमचे साहित्य न वाचता तुम्हाला डोळ्यावर घेऊन नाचत आहेत... ते तुम्हाला तुमचे भिमराव यांच्यापेक्षा मोठे समजायला लागले आहेत... ते देवांच्या आणि दैववादच्या नादी लागलेले आहेत... तुमचे साहित्य त्यांना यातून बाहेर काढू शकते पण त्यांना आता फक्त मनुस्मृती वाचायची आहे...

असो तरी आपण साहित्य रत्न, आणि लोकशाहीर म्हणून सदैव आमच्यासाठी प्रेरणादायक रहाल...

आपल्या लेखनीस विनम्र अभिवादन...

#सत्यजीत_साळवे

09/07/2026

इथेनॉल का कमाल...

पेट्रोल मध्ये इथेनॉल टाकून आमच्या गाड्या देशोधडीला लावणारे सरकार पैसे आमच्याकडून पेट्रोल साठी घेतले आणि इथेनॉल च्या नावाखाली फक्त पाणी देण्यात येत आहे... इथेनॉल आमच्यासाठी फक्त पाणीच आहे... म्हणून या सरकारचा मी जाहीर निषेध करतो...

या सरकारला मतदान करणारे सुद्धा याच पद्धतीने लुटल्या जात आहेत... याची बीजेपीला आणि त्याच्या सहकारी पक्षांना मतदान करणाऱ्यांनी समजून घ्यावे... तुमच्या मुळे हे दिवस सर्व जनतेला बघायला मिळत आहेत... तुम्ही ३०% असाल पण बाकीचे ७०% लोकांना तुमच्यामुळे हे दिवस बघायला मिळत आहेत... उद्या बीजेपी समर्थक आहे म्हणून शेजाऱ्यांनी बदडून काढले तर वाईट वाटून घेऊ नका...

#सत्यजीत_आजाद

Starting New Journey...!
07/07/2026

Starting New Journey...!

मत म्हणजे नेमके काय…?मत म्हणजे विचार…!मत दान म्हणजे मताचे (विचारांचे) दान…!मत अधिकार म्हणजे (विचारांचा) अधिकार…!मत विकणे...
07/07/2026

मत म्हणजे नेमके काय…?

मत म्हणजे विचार…!
मत दान म्हणजे मताचे (विचारांचे) दान…!
मत अधिकार म्हणजे (विचारांचा) अधिकार…!

मत विकणे म्हणजे आपले विचार विकणे होय…
विचार दोन प्रकारचे आहेत एक चांगला आणि दुसरा वाईट… मानवतावादी आणि विषमतावादी अशा दोन विचारधारा आहेत… ज्या चांगल्या आणि वाईट विचारांना प्रचारित करतात… मानवतावादी लोकं चांगले विचारांचा प्रचार आणि प्रसार करतात…
चांगले लोकं मानवतावादी असतात तर वाईट लोकं विषमतावादी…
चांगले लोकं चांगल्या चांगल्या विचारांचे असतात तर वाईट लोकं वाईट विचारांचे असतात…

वरील विचार आपणास पटले असतील तर…?

वाईट लोकं चांगल्या लोकांचे मत (विचार) विकत घेतात आणि त्यांचे विचार वाईट बनवितात… चांगले लोकं आपले मत (विचार) विकत नाहीत… जे मत विकतात ते चांगले नसतात असा माझा ठाम विश्वास झालेला आहे… चांगले लोकं फक्त चांगले विचार देतात ते विचार विकत घेत नाहीत… पण वाईट लोकं मत (विकत) घेतात आणि वाईट च करतात…

आता सांगा आपण चांगले की वाईट…? मत विकणे चांगले की वाईट…? चांगले असणे चांगले की वाईट…?

प्रश्न खुप महत्वाचा आणि गोंधळाचा आहे पण ज्यांना हा गुंता समजला ते धन्य… म्हणून मत देतांना खुप विचारपूर्वक द्यावे… आपलेआत चागल्या लोकांना द्यायचे की वाईट लोकांना ते ठरवा…

#सत्यजीत_साळवे

बुद्ध पद, बुद्ध गुण आणि बुद्ध रुप...!नमो बुद्धाय जयभीम... #सत्यजीत_आजाद
07/07/2026

बुद्ध पद, बुद्ध गुण आणि बुद्ध रुप...!

नमो बुद्धाय जयभीम...

#सत्यजीत_आजाद

07/07/2026

#सहभागी_व्हा

07/07/2026

Address

Main Road Sanjay Nagar Mukundwadi
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when सत्यजीत साळवे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category