15/08/2026
स्वातंत्र्याचा क्रांतिकारी इतिहास..!
हिंदुस्थानाच्या स्वातंत्र्याचा इतिहासातुन भारतीयांचा मनावर पध्दतशीरपणे बिंबवलं गेलंय की भारताला स्वातंत्र्य अहिंसेने मिळाले आहे... वास्तविक भारतीय स्वातंत्र्याची सुरवात ही 1857 च्या रक्तरंजित उठवातून झाली...राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब पेशवे, बहादुरशहा जफर,तात्या टोपे, कुवरसिंह व इतर संस्थानिकांनी उभा केलेल्या सशस्त्र लढ्याने देशात राष्ट्रीय भावना उत्पन्न केली..लढा अयशस्वी ठरला पण हिंदुस्थानी लोकांच्या झुंजार पराक्रमाने बलिदानाच्या इतिहासाला झळाळी दिली..पुढे त्याला लोकमान्य टिळक यांच्या जहाल विचारातून काँग्रेसने स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाली...लोकमान्य टिळकांच्या क्रांतिकारी विचारांमुळे अनेक तरुण क्रांतिकार्यात सहभागी झाले..पुढे रासबिहारी बोस, लाला लजपतराय, बकीनचंद्र पाल, स्वातंत्र्यवीर सावरकर, क्रांतिसिंह नाना पाटील यांनी हा जहाल विचार पुढे चालवला वाढवला...शस्त्रास आता शस्त्राने उत्तर विचारातून देशातील लाखो तरुण क्रांतिकार्यात सहभागी झाले..
खुदिराम बोस यांच्या बलिदानापासून सुरू झालेली शहिदांची क्रांतिकारी चळवळ...चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू,बटूकेश्वर दत्त हे देशाच्या तरुणांच्या गळ्यातील ताईत बनले..चापेकर बंधूंनी केलेली रँडची धाडसी हत्या क्रांतिकारकांसाठी प्रेरणा ठरली...अनंत कण्हेरे यांनी जॅक्सनचा वध करुन असंतोषाला वाट करून दिली..पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सशस्त्र क्रांतीचे राष्ट्रीय नेतृत्व बनले..हजारो सैनिकांची आझाद हिंद फ़ौज उभा करून त्यांनी हिंदुस्थानचा काही भाग काबीज केला..या क्रांतीलढ्यात हजरो तरुण फाशीवर गेले..असंख्य तरुण बंदिवासात खितपत शहिद झाले...
भारतमातेच्या स्वातंत्र्यसाठी हजारो तरुणांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घातला...असंख्य कुटुंब उध्दवस्त झाले..
देशाला स्वातंत्र्य अहिंसेने मिळले तर क्रांतिकारक फाशीवर कुणासाठी गेले??
क्रांतिकारकानी छातीवर गोळ्या कुणासाठी झेलल्या??
स्वातंत्र्याच श्रेय ठराविक लोकांना देणे हा क्रांतिकारकांवर अन्याय नाही का??
यापुढे देशाला स्वातंत्र्य हे अहिंसेने नाही तर बलिदानाने दिले असे अभ्यासक्रमात शिकवावे ही शिवराज्य सेनेची सरकार कडून अपेक्षा🙏🏻
वंदे मातरम... राष्ट्र प्रथम🇮🇳