07/09/2025
https://www.facebook.com/share/p/16Z9YCneZ1/
अतिवृष्टीमुळे राज्यातील तब्बल 14 लाख हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, 29 जिल्ह्यांतील शेतकरी गंभीर संकटात सापडले आहेत.
🌾 सर्वाधिक नुकसानग्रस्त पिके :
मुंग, उडीद, मका, कपाशी, तुर, भाजीपाला, बाजरी, ऊस, कांदा, आलं, ज्वारी आणि हळद.
👉 काही भागांमध्ये शेतीचा वरचा स्तर वाहून गेला असून शेतकरी बांधवांना पुन्हा शेती करणेही कठीण झाले आहे.
🔴 सरकारने प्रत्येक जिल्ह्यात बारकाईने सर्व्हे करून नुकसानाचे अचूक मूल्यमापन करावे.
सततच्या अतिवृष्टीमुळे यंदा पिकं अक्षरशः संपुष्टात आली आहेत. त्यामुळे पिकांच्या उत्पन्नावर आधारित भरघोस आर्थिक मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ द्यावी.
ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी वाहून गेल्या आहेत त्यांच्यासाठी विशेष मदत योजना जाहीर करावी.
आज शेतकरी अतोनात नुकसान सहन करत आहेत. मात्र अजूनही सरकारने स्पष्ट धोरण किंवा ठोस आश्वासन जाहीर केलेले नाही.
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी सरकारने तातडीने निर्णय घ्यावा, हीच अपेक्षा.
ाराष्ट्र
Aam Aadmi Party Prakash Jarwal, MLA Ajit Phatake patil Vijay Kumbhar