Bhujal Abhiyan

Bhujal Abhiyan People movement with the aim of creating water literacy and making ground water invisible to visible.

07/04/2026

ब्राम्हणशेवगे येथे सन:2020 पासून तर आजतगायत सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाच्या माध्यमातून वेगवेगळ्या उपक्रमांसाठी मिळत असलेल्या मदतीबाबतचा आढावा भुजल वारकरी सोमनाथ माळी यांनी थोडक्यात मांडला आहे..

07/04/2026

ब्राम्हणशेवगे ता. चाळीसगाव जि. जळगाव येथे सेवा सहयोग फाउंडेशन व ग्रामोदय प्रकल्प (HSDI Green Futures : A Holistic Approach to Climate Resilience) यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या 10 शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अमूल्य सहकार्य मिळाले.
उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन, दर्जेदार रोपे,आवश्यक निविष्ठा,गांडूळ खत,बेड तयार करण्याची सुविधा,ठिबक सिंचन साहित्य तसेच जीवामृत तयार करण्यासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
या सर्व मदतीमुळे आमच्या शेतीला नवी दिशा मिळणार असून उत्पादनक्षमतेत वाढ होण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
सेवा सहयोग फाउंडेशन व ग्रामोदय टीमच्या या मोलाच्या सहकार्याबद्दल आम्ही सर्व शेतकरी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.आपल्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे.असे फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली भावना व्यक्त केल्यात..

07/04/2026

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत छोटू एकनाथ तुपे यांचे शेतात ईनलेट आऊटलेट शेततळे कामांचा शुभारंभ..

07/04/2026

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत फळबाग लागवड केलेल्या 10 शेतकऱ्यांना जीवामृत निर्मिती साठी 300 लिटर पाण्याच्या टाक्या उपलब्ध करून देण्यात आल्यात..

💧 रखरखत्या उन्हातही जीवनदायी ठरतोय वडाळा-वडाळी तलाव! 🌿चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील तलाव आज मुक्या प्राण्यांची ...
02/04/2026

💧 रखरखत्या उन्हातही जीवनदायी ठरतोय वडाळा-वडाळी तलाव! 🌿
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील तलाव आज मुक्या प्राण्यांची तहान भागवत आहे, तर शेतकऱ्यांसाठीही वरदान ठरत आहे. 🐄🌾
👉 2022 व 2023 मध्ये विविध संस्थांच्या सहकार्याने झालेल्या खोलीकरणामुळे तलावाची पाणी साठवण क्षमता तब्बल 4 पट वाढली आहे.
👉 पूर्वी जानेवारीत आटणारा तलाव आज उन्हाळ्यातही पाण्याने भरलेला आहे.
👉 तलावाच्या खालच्या भागातील विहिरी 24 तास सुरू असून, शेती व पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळतोय.
👉 गावातील पाणीपुरवठा देखील या तलावावर अवलंबून आहे.
👉 मच्छी व्यवसायालाही चालना मिळून यंदा चांगला नफा मिळाला आहे. 🐟
🌍 भूगर्भातील अदृश्य पाणीसाठ्यामुळे संपूर्ण परिसर हिरवागार होत आहे.
🙏 या उपक्रमासाठी योगदान देणाऱ्या सर्व संस्था व लोकसहभागाचे मनःपूर्वक आभार!
#जलसंधारण #पाणीअभियान #वडाळावडाळी #शेतकरी #पर्यावरण

🌱💧 भूजलतारा अभियानाला वेग! 💧🌱सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पांतर्गतअभोणे तांडा येथे भूजलतारा कामांना सुरुवात!चाळीसगाव तालुक्...
02/04/2026

🌱💧 भूजलतारा अभियानाला वेग! 💧🌱
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पांतर्गत
अभोणे तांडा येथे भूजलतारा कामांना सुरुवात!
चाळीसगाव तालुक्यात जलसंधारणाची चळवळ जोमात सुरू असून
ब्राम्हणशेवगे, शिवापूर, वडाळा-वडाळी नंतर आता अभोणे तांडा देखील या उपक्रमात सहभागी!
👉 पाणी जिरवा – पाणी वाचवा
👉 भूजल पातळी वाढवा
👉 शेतकऱ्यांना दिलासा द्या
हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी ठरणार मोठे वरदान! 🙏
#जलसंधारण #भूजलतारा #चाळीसगाव

29/03/2026

*सेवा सहयोग फाउंडेशन चा उपक्रम.पूरग्रस्त धाराशिवमधील शाळकरी मुलींना नवी उभारी!* 🚲🚲🚲🚲

*द क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड* आणि *सेवा सहयोग फाउंडेशन* यांच्या वतीने शाळकरी मुलींना नवीन सायकली भेट देण्यात आल्या. या उपक्रमामुळे त्यांच्या शिक्षणाला चालना मिळून सशक्तीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावर्षी
*भूम – १२५*
*कळंब – १२५*
*परांडा – १५०*
*एकूण वितरित सायकली – ४००*
*लाभार्थी शाळा – ३६*

धाराशिव जिल्ह्याचे सीईओ डॉ. मैनाक घोष तसेच विविध शासकीय अधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांचे मान्यवर यांच्या उपस्थितीत २४ व २५ मार्च २०२६ रोजी कळंब व परांडा येथे कार्यक्रम पार पडला.

*पायाखाली चाकं मिळाल्यामुळे या विद्यार्थिनींची स्वप्ने आता उंच भरारी घेतील, अशी आशा आहे! 😊*

*टीम सेवा सहयोग फाउंडेशन*

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील  #हॅलो_सह्याद्री या कार्यक्रमामध्ये जरूर पहा,अंतर्गतसेवा सहयोग फाउंडेशन 'भूजलवारी अभिय...
21/03/2026

दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील #हॅलो_सह्याद्री या कार्यक्रमामध्ये जरूर पहा,अंतर्गत
सेवा सहयोग फाउंडेशन 'भूजलवारी अभियान' या विषयी गुणवंत सोनवणे यांची मुलाखत.

प्रक्षेपण - सोमवार, दि. २३ मार्च २०२६ रोजी दुपारी १२ वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून.




🌱 जलसंधारणासाठी मोठी पाऊलवाट – गोरखपूर (पिंपरखेड तांडा) येथे नाला खोलीकरण कामास सुरुवातगोरखपूर (पिंपरखेड तांडा) येथे **स...
17/03/2026

🌱 जलसंधारणासाठी मोठी पाऊलवाट – गोरखपूर (पिंपरखेड तांडा) येथे नाला खोलीकरण कामास सुरुवात

गोरखपूर (पिंपरखेड तांडा) येथे **सेवा सहयोग फाउंडेशन, पुणे** यांच्या माध्यमातून दिनांक **६ मार्च २०२६ पासून नाला खोलीकरण तसेच सिमेंट बांधाचे खोलीकरण व रुंदीकरण** या महत्त्वपूर्ण कामास सुरुवात करण्यात आली आहे. गावातील **तीन ठिकाणी एकाच वेळी काम सुरू असून या उपक्रमाचा लाभ ५० पेक्षा अधिक शेतकरी बांधवांना होणार आहे.**

या कामामुळे पावसाळ्यातील पाण्याचा **योग्य साठा होऊन भूजल पातळी वाढण्यास मोठी मदत होणार** आहे. नाल्यातील गाळ व मुरूम शेतकरी स्वतःच्या खर्चाने शेतात टाकून घेत आहेत, त्यामुळे **जमिनीची सुपीकता वाढून उत्पादनक्षमतेत वाढ होणार** असल्याचा विश्वास शेतकरी व्यक्त करत आहेत.

नाला खोलीकरण व सिमेंट बांध रुंदीकरणामुळे
✔ पावसाचे पाणी अधिक प्रमाणात साठेल
✔ पाण्याचा अपव्यय कमी होईल
✔ शेतीसाठी दीर्घकाळ पाणी उपलब्ध राहील
✔ भूजल पातळी वाढेल
✔ शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल

या उपक्रमामुळे गावात **जलसंधारण, शेती विकास आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन** यासाठी नवे पाऊल टाकले गेले असून गावकऱ्यांकडून या कामाचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात येत आहे.
भविष्यात या कामाचा **शेती, पाणी साठवणूक आणि ग्रामीण विकासावर सकारात्मक परिणाम होईल**, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

*सेवा सहयोग ग्रामोदय*

#सेवा_सहयोग_फाउंडेशन
#जलसंधारण
#नाला_खोलीकरण


RuralDevelopment
GroundWaterRecharge
Maharashtra
शेतकरी
पाणी_अडवा_पाणी_जिरवा
SocialWork
CSR
VillageDevelopment

16/03/2026

सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत जलसंधारणाचा 💧"भूजलतारा"💧 अतिवृष्टी व दुष्काळ परिस्थितीत ठरणार प्रभावी उपाय...
चाळीसगाव तालुक्यातील ग्रामिण भागात
सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाअंतर्गत "भूजलतारा" हे नाविन्यपूर्ण तंत्र शेतकऱ्यांच्या शेतात लोकसहभागातून तयार करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे.

शेतात पावसाचे पाणी ज्या ठिकाणी साचते अशा उताराचे ठिकाणी 5 फुट लांब, 5 फुट रुंद व 5 फुट खोल असा खड्डा खणून तो अडीच फुट सिमेंटच्या रिंगा त्यात मोठे दगड,लहान, दगड,खडी व वाळू तसेच ग्रीन नेटने बंद करून व सिमेंट रिग भोवती मोठी दगड अश्या पद्धतीने भरण्यात येतो.या प्रकल्पाला सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्पाचे माध्यमातून "भूजलतारा" असे समर्पक नाव दिले आहे.या प्रकल्पामुळे भूगर्भातील भूजल पातळी वाढवण्यास उपयुक्त ठरू शकते. यामुळे पावसाचे पाणी जमिनीत सहज पोहोचेल आणि भूजल संवर्धन होईल.
तसेच अतिवृष्टी व जास्तीचे पाणी साचुन होणारे पिकाचे नुकसान टाळता येईल या भूजलतारामुळे जमिनीत पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल व पाणी व‌ हव्याचे प्रमाण समान होऊन वापसा मिळाल्यामुळे पिक जोमदार येऊन उत्पनात वाढ होईल.
भूजलताराचे इतर महत्वाचे फायदे..
भूजल पातळीत वाढ: भूजलतारा मार्गे पावसाचे पाणी जमिनीत जाईल, ज्यामुळे भूजल पातळी वाढेल.
सिंचनासाठी मदत: भूजल पातळीत वाढ झाल्यामुळे, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची टंचाई भासणार नाही.
जलसंवर्धन: पावसाचे पाणी वाचवले जाईल, ज्यामुळे पाण्याची बचत होईल.
मातीच्या गुणवत्तेत सुधारणा: भूजलतारामुळे जास्तीच्या पाण्यामुळे सुपिक माती वाहून न जाता तेथेच थांबणार व शेतीची,मातीची गुणवत्ता सुधारेल.
पिण्याच्या पाण्याची उपलब्धता: भूजल पातळी वाढल्याने पिण्याच्या पाण्याची उपलब्धता देखील वाढेल.
पर्यावरण संतुलन: भूजलतारा पर्यावरण संतुलन राखण्यास देखील मदत करेल, ज्यामुळे निसर्गाचे संवर्धन होईल.
कोरडा दुष्काळ व ओला दुष्काळ (अतिवृष्टी) या दोन्ही संकटात हा भूजलतारा फायदेशीर ठरणार असून कोरड्या दुष्काळात विहिरीला आधार व ओल्या दुष्काळ प्रसंगी अतिरिक्त साठणारे पाणी जमिनीत ओढून घेत जमिनीत वाफसा सुरळीत झाल्याने पिकाचे होणारे नुकसान थांबणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात "भूजलतारा" हा नाविण्यपूर्ण उपक्रम करून घ्यावा असे आवाहन सेवा सहयोग ग्रामोदय प्रकल्प भूजल अभियान टिमने केले आहे.

Address

Chalisgaon
424101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhujal Abhiyan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhujal Abhiyan:

Share