Zilla Parishad Chandrapur

Zilla Parishad Chandrapur Zilla Parishad Chandrapur

२४ मार्च- जागतिक क्षयरोग दिननका बाळगू लाज-भिती, वेळेवर करा टीबीची तपासणीटीबीला प्रतिबंध करणे आहे शक्य, म्हणून नका करू त्...
24/03/2026

२४ मार्च- जागतिक क्षयरोग दिन
नका बाळगू लाज-भिती, वेळेवर करा टीबीची तपासणी
टीबीला प्रतिबंध करणे आहे शक्य, म्हणून नका करू त्याकडे दुर्लक्ष

24/03/2026
आरटीई प्रवेशासाठी असलेली 1 कि.मी. ची अट रद्दØ अर्ज भरण्यास 25 मार्च पर्यंत मुदतवाढबालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक...
24/03/2026

आरटीई प्रवेशासाठी असलेली 1 कि.मी. ची अट रद्द
Ø अर्ज भरण्यास 25 मार्च पर्यंत मुदतवाढ

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मधील कलम 12 (1) (सी) नुसार आर्थिकदृष्या दुर्बल आणि वंचित घटकांतील मुलांसाठी खाजगी विनाअनुदानित शाळांमध्ये 25 टक्के मोफत शिक्षणांची तरतूद आहे. आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेशासाठी 1 कि.मी. पर्यंतच्या अंतरावरील शाळा निवडण्याचे स्वातंत्र्य पालकांना देण्यात आलेले होते. तथापि उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपूर येथे दाखल याचिकेवर न्यायालयाने नोंदविलेल्या निरिक्षणानुसार आरटीई अंतर्गत 25 टक्के प्रवेश जर 1 कि. मी. अंतरावर शाळा उपलब्ध नसेल, तर मुलांना त्यापेक्षा जास्त अंतरावरील शाळेमध्ये प्रवेश घेण्यापासून रोखता येणार नाही. त्यानुसार 25 टक्के प्रवेशासाठी अर्ज भरण्यासाठी असलेली 1 कि.मी. अट रद्द करण्यात आली आहे.

ज्या पालकांनी 1 कि.मी. च्या आत असलेल्या शाळांची निवड करून अर्ज भरलेला आहे, तसेच ज्या पालकांनी आरटीई 25 टक्के प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. त्यांना आता 1 कि. मी., 1 ते 3 कि.मी. तसेच 3 कि.मी. पेक्षा अधिक अंतरावरील शाळा उपलब्ध झालेल्या आहेत. तरी संबंधितांना आरटीई पोर्टलवर आपला आरटीई 25 टक्केचा अर्ज unconfirm करून देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित पालकांना याबाबत आरटीई 25 टक्के पोर्टलवरून आवश्यक ती माहिती भरून सुधारित अर्ज करता येईल. तसेच आरटीई 25 टक्के प्रवेशासाठीचे अर्ज भरण्यास 25 मार्च 2026 पर्यंत मुद्दतवाढ देण्यात आल्याचे पुणे येथील शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी कळविले आहे.
००००००

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसाह्य खरेदी योजना
24/03/2026

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा अर्थसाह्य खरेदी योजना

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजीजिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे राबविण्यात येणाऱ्या “चां...
21/03/2026

चांदा ज्योती सुपर 100 उपक्रमांतर्गत अंतिम चाळणी परीक्षा 23 मार्च रोजी

जिल्हा परिषद चंद्रपूरतर्फे राबविण्यात येणाऱ्या “चांदा ज्योती सुपर 100” या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत सन 2025-26 मध्ये इयत्ता 10 वीमध्ये शिकणाऱ्या अनुसूचित जाती व जमातीतील विद्यार्थ्यांना IIT/JEE/NEET या स्पर्धा परीक्षांसाठी दोन वर्षे मोफत मार्गदर्शन देण्यात येणार आहे.

या माध्यमातून सामाजिकदृष्ट्या मागास ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे. या उपक्रमांतर्गत प्रथम चाळणी परीक्षा दि. 31 जानेवारी 2026 रोजी घेण्यात आली होती. सदर परीक्षेचा निकाल जिल्हा परिषद चंद्रपूरच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

प्रथम चाळणी परीक्षेत 40 टक्के व त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम निवड परीक्षा दि. 23 मार्च 2026 रोजी दुपारी 12.00 ते 2.30 या वेळेत भवानजीभाई चव्हाण हायस्कूल, मुल रोड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली आहे.

सदर परीक्षेची प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी या दोन्ही माध्यमांत उपलब्ध राहणार असून प्रश्न इयत्ता 10 वीच्या बीजगणित (Algebra), भूमिती (Geometry) आणि विज्ञान (Science) या विषयांच्या अभ्यासक्रमावर आधारित असतील.

तरी पात्र विद्यार्थ्यांनी अंतिम निवड परीक्षेला उपस्थित राहावे, असे आवाहन शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी केले आहे.

००००००

पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंधाबाबत मागदर्शनØ जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजनØ शिक्षक, ग्रामसेवक, आरो...
21/03/2026

पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंधाबाबत मागदर्शन
Ø जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या वतीने आयोजन
Ø शिक्षक, ग्रामसेवक, आरोग्य कर्मचारी यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती

जिल्हा महिला व बालविकास कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांच्या वतीने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात बीजीएम कार्मेल अकादमी येथे मंगळवारी पोक्सो कायदा तथा बालविवाह प्रतिबंध आणि महिला बालविकास विभागाच्या योजनांवर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुधीर इंगळे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, शिक्षणाधिकारी अश्विनी सोनवणे, उपशिक्षणाधिकारी गणेश येरणे, बालकल्याण समितीच्या अध्यक्षा क्षमा बारसकर, सदस्या ज्योत्स्ना मोहितकर, वनिता घुमे, बीजीएम कार्मेल अकादमीचे प्राचार्य जेसन जेकब, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आदी उपस्थित होते.

याप्रसंगी पुलकित सिंह म्हणाले, बालक देशाची संपत्ती असून बालकाचे संरक्षण आपली प्रथम जबाबदारी आहे. बालकांच्या संरक्षणासाठी शासन प्रशासन तसेच समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपली भूमिका संवेदनशीलपणे पार पाडावी, असे आवाहन केले. मुख्य न्यायदंडाधिकारी प्रशांत कुलकर्णी, यांनी मार्गदर्शन करतांना, बालकांची सुरक्षितता ही अत्यंत महत्वाची असून सर्वांनी कायद्याला अनुसरून कार्यवाही केलीच पाहिजे. यासाठी जिल्हा महिला व बालविकास कार्यालय व पोलिस यांना सहकार्य करावे. सुधीर इंगळे यांनी बालविवाह व पोक्सो कायदा समजावून सांगितला व बालविवाह प्रतिबंध अधिकारी यांच्या जबाबदारीविषयी मार्गदर्शन केले. तसेच ग्राम/वार्ड बाल संरक्षण समितीची भूमिका विषद केली.

प्रास्ताविकातून मिनाक्षी भस्मे यांनी, बालकांच्या कार्यक्षेत्रात कार्य करणारे अधिकारी/कर्मचारी यांच्यासाठी सदर कार्यशाळा महत्वाची असून सर्व संबंधित यंत्रणेने समन्वयाने कार्य करून चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त तसेच बालस्नेही बनविण्याचा संकल्प करू या असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे संचालन कल्पना राजुरकर यांनी तर आभार अजय साखरकर यांनी मानले. यावेळी विधी अधिकारी अनिल तानले, परिविक्षा अधिकारी अतिशकुमार चव्हाण, अभिषेक मोहुर्ले, शशिकांत मोकाशे, जिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सखी वन स्टॉप सेंटर, रूद्या संस्था आदींनी मोलाची भुमिका बजावली.

००००००

कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री डॉ. अशोक वुईकेØ पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवा...
21/03/2026

कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य – पालकमंत्री डॉ. अशोक वुईके
Ø पाच दिवसीय जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा केली आहे. तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ आता शेतक-यांसोबतच शेतमजुरांनासुध्दा मिळणार आहे. कृषी क्षेत्राच्या विकासाला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून शेतक-यांच्या मागे शासन भक्कमपणे उभे आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले.

चांदा क्लब येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषी विभाग, पशुसंवर्धन विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उमेद आणि माविम यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय कृषी, पशु-पक्षी प्रदर्शन व मिनी सरस हिराई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उद्घाटन करतांना पालकमंत्री डॉ. वुईके बोलत होते.

यावेळी मंचावर चंद्रपूर शहराच्या महापौर संगिता खांडेकर, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अतिरिक्त पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक मंजिरी टकले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, आत्माचे प्रकल्प संचालक अरुण कुसळकर, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुरेश कुंभरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नूतन सावंत, गिरीश धायगुडे, शिक्षणाधिकारी अश्विनी केळकर चंद्रशेखर शेट्टी आदी उपस्थित होते.

या प्रदर्शनीमध्ये 325 स्टॉलची उभारणी करण्यात आली आहे, असे सांगून पालकमंत्री डॉ. वुईके म्हणाले, प्रदर्शनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांचे सादरीकरण सर्वत्र पोहोचावे. चंद्रपूर जिल्ह्यात महिला बचत गटाचे काम मोठे आहे. कृषी विषयक योजनांचा प्रचार व प्रसार शेवटच्या घटकांपर्यंत पोहचला पाहिजे. 13 मार्च 2026 रोजी किसान सन्मान निधीचा 22 वा हप्ता वाटप करण्यात आला. यात जिल्ह्यातील 2 लक्ष 46 हजार 307 शेतकऱ्यांच्या खात्यात 49 कोटी 26 लाख रुपये जमा झाले आहे. कर्जमाफीचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. ग्रामीण महिला बचत गटासाठी तालुका स्तरावर प्रशिक्षण केंद्र आणि इमारत बांधण्याकरिता निधी देण्यात येईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले. तत्पूर्वी पालकमंत्री यांच्या हस्ते फीत कापून कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन झाल्यानंतर त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली.

खासदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, शेतीमध्ये आगळावेगळा प्रयोग करणे अत्यंत गरजेचे झाले असून केंद्र व राज्याच्या अनेक कृषी विषयक योजना शेवटच्या घटकांपर्यंत अधिकाऱ्यांनी पोहचवाव्यात. बचत गटाच्या उत्पादनासाठी तालुका स्तरावर विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी महापौर संगिता खांडेकर यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांनी केले. संचालन एकता बंडावार यांनी तर आभार शिवकुमार पुजारी यांनी मानले.

कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज : आमदार किशोर जोरगेवार

कृषी आणि संलग्न व्यवसायातून चंद्रपूरची नवी ओळख निर्माण होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चंद्रपूरकडे विशेष लक्ष असून बचत गटाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले आहे. उमेदच्या माध्यमातून लखपती दीदी तयार होत आहे. महिलांना डिजिटल साक्षर होण्याची गरज आहे. बांबूक्षेत्रातही शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यावे. चंद्रपूरला पर्यटनाच्या क्षेत्रातून विकसित करावे. ऍग्रो टुरिझमलाही जिल्ह्यामध्ये चांगली संधी आहे. आज शेतीचा पॅटर्न बदलला असून कृषी उद्योजक निर्माण करण्याची गरज आहे, असे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले.

कृषी आणि पशु प्रदर्शनाचे अतिशय चांगले नियेाजन : आमदार देवराव भोंगळे

जिल्हास्तरीय कृषी महोत्सव हा चंद्रपूरकरांसाठी एक पर्वणी असते. या माध्यमातून जनतेपर्यंत कृषी विषयक व संलग्न योजनांचा प्रचार प्रसार होतो. आज येथे कृषी आणि पशु प्रदर्शनाचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले आहे. पशुंच्या प्रजाती ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचल्या पाहिजे. जिल्हास्तरीय पाच दिवसांच्या कृषी प्रदर्शनीचा जिल्ह्यातील सर्व शेतकरी नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवराव भोंगळे यांनी केले.

समुदाय निधी धनादेश वाटप : 1) मध संकलन केंद्राकरिता लक्ष्मी प्रभाग संघ यांना 50 लक्ष रुपयांचा धनादेश, 2) आजीविका ग्रामीण वाहतूक करिता सक्षम प्रभाग संघ यांना 51 लक्षाचा धनादेश, 3) समूह गुंतवणूक निधी करिता क्षितिज प्रभाग संघ यांना 1 कोटीचा धनादेश, 4) समूह गुंतवणूक निधी म्हणून नारीशक्ती प्रभाग संघ यांना 1 कोटीचा धनादेश, 5) एकात्मिक शेती करिता मातोश्री प्रभाग संघ यांना 30 लक्ष रुपयांचा रुपये धनादेश, 6) समूह गुंतवणूक निधी अंतर्गत अस्मिता प्रभाग संघ यांना 54 लक्षाचा धनादेश मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

कृषी महोत्सवाचे प्रमुख्य वैशिष्टये : 1) शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषी व कृषी संलग्न विभागाच्या योजना / उपक्रमांची माहिती 2) महिला स्वयंसहायता गटांमार्फत उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री 3) कृषी विद्यापिठाने विकसीत केलेल्या तंत्रज्ञानाची माहिती 4) अनुभवी आणि प्रगतशील शेतक-यांचे मार्गदर्शन 5) कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत विविध खाजगी कंपन्यांची अद्यावत तंत्रज्ञानाची कृषी औजारे 6) सुक्ष्म सिंचन - ठिबक / तुषार संचांची प्रात्यक्षिके 7) उत्पादक ते ग्राहक थेट विक्री

०००००

21/03/2026

Address

Chandrapur

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+917172256401

Alerts

Be the first to know and let us send you an email when Zilla Parishad Chandrapur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Zilla Parishad Chandrapur:

Share