12/07/2026
तहसीलमध्ये आवाज माझा होता,पण वेदना हजारो लोकांच्या होत्या.
आज मी एकटाच बोलत होतो, पण माझ्या आवाजामागे हजारो शेतकरी, कामगार, विधवा माता, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य नागरिकांच्या वर्षानुवर्षे साचलेल्या वेदना उभ्या होत्या.
अनेक नागरिकांच्या तक्रारीनुसार, सरकारी कार्यालयांमध्ये कामासाठी पैशांची मागणी होते, वेळेवर काम होत नाही, आणि एका साध्या कागदासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. माणूस तिथे उपकार मागायला नाही, तर आपल्या हक्काचं काम करून घ्यायला जातो. पण जेव्हा हक्कही संघर्ष करून मिळवावा लागतो, तेव्हा वेदना एका व्यक्तीच्या राहत नाहीत त्या संपूर्ण समाजाच्या होतात.आज उठलेला आवाज कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नव्हता.
तो अन्याय, निष्काळजीपणा आणि चुकीच्या पद्धतींविरुद्ध होता.
"ही लढाई माझी नाही...
ही प्रत्येक त्या नागरिकाची आहे, जो भ्रष्टाचारामुळे त्रस्त आहे"
एक वेदना कायम मनात राहते...
मी दोन निवडणुका हरलो. पण लोकांसाठी धावणं सोडलं नाही. कोणाचं काम अडलं, अन्याय झाला, सरकारी दारात हेलपाटे मारावे लागले की त्यांना माझी आठवण झाली आणि मी कधीच मागे हटलो नाही.
पण मतदानाचा दिवस आला की अनेकदा प्रश्न बदलतात. हक्क, काम आणि संघर्ष मागे पडतो; जात, धर्म, पक्षनिष्ठा किंवा इतर आमिषं पुढे येतात.तरीही माझा राग कोणावर नाही. कारण माझं राजकारण निवडणुकीपुरतं नाही ते त्या सामान्य माणसासाठी आहे
आपला
सचिन भोयर.