17/03/2025
काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ दौरा कोकणाला संजीवनी देणारा- युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह काँगेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नुकतेच सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात काही महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात आली कार्यकर्त्यांमध्ये नवसंजीवनी निर्माण व्हावी यासाठी आपण दौरा काढला आहे असे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्षाचे पदाचे सूत्र हाती घेतलेले हर्षवर्धन सपकाळ त्यांच्या पहिले दौरा सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता. काँग्रेस नूतन प्रदेशाध्यक्ष सपकाळ रत्नागिरी दौऱ्यावर त्यांनी काँग्रेसच्या पडझडीचा आढावा घेतला तसेच कार्यकर्त्यांसह प्रमुख नेते दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांना कानमंत्र ही दिले. मात्र 35 वर्षात पक्षाची झालेली वाताहात आणि पडझडीचं तसेच काँग्रेसला गत वैभव मिळवून देण्यासाठी बळ देण्यासाठी नवीन टीम उभी करणार असेही त्यांनी सांगितले
जिल्ह्यात 1972 दरम्यान काँग्रेसच हा सर्वात मोठा पक्ष होता. जवळजवळ सर्व विधानसभा मतदार संघावर काँग्रेसचा पगडा होता. त्यानंतर जनता दल, भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्लाला सुरुंग लावत पोखरायला सुरुवात केले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणच काम समाधानकारक असून युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष साजिद सरगुरोह व त्यांच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. आपण एकत्र येऊन काम करू काँग्रेसची सत्ता कशी येईल यासाठी प्रयत्न करू असे म्हणाले.यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र विधान परिषद व विधानसभेचे सदस्य भाई जगताप, माजी आमदार हुसनाबानू खलिफे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाधीक्षा सोनललक्ष्मी घाग ,रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनीष राऊत, माजी जिल्हाध्यक्ष रमेश कीर, विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष ऋषिकेश शिंदे, रत्नागिरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष इरफान हुडेकर ,काँग्रेस नेते सुरेश काटकर,नवाज नांदगावकर, इमरान खान, उज्जेर घारे, अल्बक्ष गोठे, फहद खान, रियाज शेख आदी उपस्थित होते.