27/02/2025
1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. महाराष्ट्र राज्यामध्ये बहुसंख्य मराठी भाषिक असले तरी मराठी भाषेला राजभाषा होण्यासाठी काही काळ जावा लागला. बर्याच संघर्षानंतर मराठी भाषेला राज्य भाषेचा दर्जा मिळाला.भारतात हिंदी व बंगाली भाषेनंतर, मराठी भाषा बोलणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे.
मराठी भाषेची व्याप्ती मोठी आहे.संत ज्ञानेश्वर महाराज ह्यांनी मराठी भाषेची तुलना अमृताशी केलेली आहे. ' माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके ।
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्रच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक २१ जानेवारी, २०१३ रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कांदबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे.
आपल्या वाचनालयात मराठी भाषेत लहान मुलांसाठी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. तर रीड एंड राइझ लायब्ररी ला नक्की भेट द्या ✨