Karvir Riyasat

Karvir Riyasat शिवरायांचा विचार व वारसा जपणाऱ्या शिवछत्रपतींच्या वंशजांची कोल्हापूर गादी... करवीर रियासत While the states of Baroda, Gwalior, Indore etc.

Kolhapur was conquered by Chhatrapati Shivaji Maharaj (Founder of Maratha Empire) from Adilshah of Vijapur in 1674. Later, in 1707, Maharani Tarabai, daughter-in-law to Chhatrapati Shivaji Maharaj established "Kolhapur" as the capital of Maratha Kingdom which later came to known as Kolhapur State or Karvir Riyasat. Kolhapur is the last trace of the founding father of Maratha Empire, Chhatrapati Sh

ivaji Maharaj. of Maratha Empire and the rulers of these states were actually the military chiefs of the Chhatrapati and not crowned kings or the founder of the states (they became "Maharajas" in British Rule with the help of East India Company); The Chhatraptis of Kolhapur are the direct descendants of Chhatrapati Shivaji Maharaj and as this, they were Emperors of The Maratha Empire and fully sovereign kings until 1st March, 1949. Even in British Rule, The Chhatrapati of Kolhapur had full powers to rule the country and the maratha rulers with 21 Gun Salutes had to bow before Chhatrapati. The present Chhatrapti of Kolhapur or Karvir Riyasat is "Shrimant Kshatriyakulawantas Shahu Chhatrapati Maharaj" and he is 12th direct descendant of Chhatrapati Shivaji Maharaj and the 14th Chhatrapati of Maratha Empire.

…आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी तथाकथित सरकार मंडळींचा माज उतरवला !धामधुमीच्या काळात अनेक सरदार घराण्यांनी तलवार हा...
28/09/2025

…आणि लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी तथाकथित सरकार मंडळींचा माज उतरवला !

धामधुमीच्या काळात अनेक सरदार घराण्यांनी तलवार हाती धरून राज्याची सेवा केली. युद्धकाळ संपला आणि राज्ये स्थिर झाली तेव्हा सरदार गेले आणि कोल्हापूर राज्यात “सरकार” म्हणवून घेणारा नवीनच प्रकार उदयास आला. या तथाकथित सरकार मंडळींनी राजर्षी शाहू छत्रपती महाराजांना राज्यकारभारात व सामाजिक चळवळीत अतोनात त्रास दिल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भ आढळतात. खुद्द छत्रपतींनाच त्रास देणारे आणि सदासर्वकाळ दरबारी तोऱ्यात फिरणारे हे लोक सामान्य जनतेची किती पिळवणूक करत असतील, याला काही अंदाजच नाही.

राजर्षी शाहू महाराज छत्रपतींच्या गादीवर येण्यापूर्वीचे अर्धे शतक कोल्हापूर राज्यास अल्पवयीन व अल्पायुषी छत्रपती राहिल्याने छत्रपतींचा अंमल कमी होऊन या सरकार मंडळींनी आपले प्रस्थ बरेच वाढविले होते. छत्रपतींच्या दरबाराप्रती यांची बेपर्वाई वाढलेली होती. यापैकी कित्येकजण दरबारावर शक्य असेल त्या मार्गाने कुरघोडी करण्यास झटत होते. दरबाराच्या मार्गातील हे काटे राज्यकारभाराच्या कामी जरी येत नसले तरी ते जाचक होऊ नयेत, याकडे महाराजांनी लक्ष दिले. या सरकार मंडळींची मिजासी व चढेलपणामुळे यांना राज्यकारभारातून दूर ठेवून सर्वसामान्य मराठा व इतर समाजांतील शिक्षित तरुणांना अधिकारी पदांवर घेऊन शाहू महाराजांनी राज्य चालविले होते. तसेच, महाराष्ट्रातील ग्राम व्यवस्थेत पाटील हा अनुवंशिक पुढारी गणला जायचा. पाटील हा खेड्यातील मुख्य अधिकारी असून, त्या गावातील शेतकरी वर्गापैकीच तो एक असल्याने त्यांचा स्वाभाविक पुढारी असतो. गावकीचा कारभार पाहण्यासाठी व या कथित सरकार मंडळींना बाजूला सारून पाटलांना पुढे आणण्यासाठी महाराजांनी बळ दिले. कोल्हापूरातील विद्यार्थी वसतीगृहांमध्ये तरुण पाटलांना त्यांच्या कर्तव्याचे ज्ञान करून देण्यासाठी व पाटीलकीचे प्रशिक्षण देण्यासाठी विशेष वर्ग सुरू केले होते. पुढे याच वर्गाचे रूपांतर महाराजांनी “दिल्ली दरबार पाटील स्कूल” मध्ये केले. मुंबई येथे भव्य पाटील परिषद देखील महाराजांनी आयोजित केलेली होती.

स्वतःचे असे काहीएक कर्तृत्व नसताना केवळ पूर्वपुण्याईवर मोठेपणा मिरवणाऱ्या व सर्वसामान्यांवर अंमल गाजवण्याची खुमखुमी असणाऱ्या दोन कथित सरकार मंडळींचा शाहू महाराजांनी चांगलाच माज उतरवल्याची एक आठवण भाई माधवराव बागल यांनी लिहिलेली आहे. ती अशी,

एके दिवशी शाहू महाराज त्यांचेकडील एक साधी फोर्ड मोटार घेऊन शहरात निघाले. महाराज स्वतः गाडी चालवत होते तर गाडीमध्ये बांधकामावरील डाकवे मिस्त्री, महाराजांचे हुजरे, पागेवरील कामगार, पापा परदेशी, आबालाल रेहमान व खंडेराव बागल यांना अगदी दाटीवाटीनेच बसवले होते. गाडीमध्ये आता लहान मुल बसण्याइतकीही जागा नव्हती. अशी ही गाडी घेऊन महाराज थेट एका मोठ्या सरकाराच्या बंगल्यावर गेले. स्वतःच त्याला हाक मारली. म्हणाले, चल बरोबर. त्याला गाडीत कुठे बसावे कळेना ! महाराजांनी गाडी सुरुही केली. गडबडीत हा सरकार तसाच गाडीच्या दरवाजाला लटकला. तशीच गाडी घेऊन महाराज दुसऱ्या सरकारच्या बंगल्यावर गेले. त्यालाही चल म्हणाले. पहिल्या सरकारला पाहून तोही तसाच दुसऱ्या दाराला लटकला. गाडीला लोंबकळणारे हे सरकार घेऊन गाडी शहरात गेली. शाही पोषाखातील हे मिजासखोर सरकार गाडीला लोंबकळत उभे राहिलेत आणि फाटकातुटका पोशाख केलेली, साधी गरीब माणसं माणसं मात्र गाडीत बसलेत. गंमत म्हणजे अशा या गाडीची मिरवणूक साऱ्या गावभर काढून, लटकलेल्या सरकारांना नुसतंच फिरवून तसंच बंगल्यावर सोडून दिलं. गावभर या सरकार जमातीची चांगलीच शोभा झाली. जनतेला ऐरीगैरी समजणाऱ्या या बढाईखोर सरकारांचा माज उतरवला. जनता कमी दर्जाची नाही, मी तुमच्यापेक्षा त्यांना जास्त मानतो, हे छत्रपतींनी कृतीतून दाखवून दिले.

राजर्षी शाहू महाराजांचे नातू मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांनी अशाच एका प्रसंगी या सरकार मंडळींना मांड्या घालून जमिनीवर बसायला लावले होते आणि सर्वसामान्य लोकांना महाराजांनी खुर्च्यांवर बसवले होते, अशी आठवण कोल्हापुरातील जुनी मंडळी सांगतात.

आजच्या काळातही अशी एखादी कृती करण्याची वेळ परत आली आहे की काय, असे वाटते. लोकशाही असल्याने या कथित सरकारांचे अस्तित्व आता मावळले आहे. मात्र पावसाळ्यात जशी बेडकं वर येतात, तसे पारंपारिक कार्यक्रमांत हे सरकार लोक अचानक प्रकट होतात. एरवी बिळात असणाऱ्या या बेडकांची कोल्हापुरातील पारंपारिक धार्मिक कार्यक्रमांत भाविकांवर व छत्रपती प्रेमींवर डराव डराव पाहायला मिळते. आता भारतात लोकशाही आहे, कोल्हापूरचे छत्रपती हे लोकराजे आहेत आणि कोल्हापूरचे पारंपारिक धार्मिक कार्यक्रम हे लोकोत्सव आहेत. या लोकोत्सवातून लोकांनाच दूर ढकलणाऱ्या ढकलकरी बेडकांना लोकांनीच जागा दाखवली असती, मात्र छत्रपतींकडे पाहून लोक संयम ठेवतात, त्याचा हे अतीच गैरफायदा घेताना दिसतात. कोल्हापूरच्या लोकोत्सवाला बाधा आणणाऱ्या, सर्वसामान्य जनतेला त्यांच्या लाडक्या छत्रपतींपासून व आराध्य दैवतापासून दूर ढकलणाऱ्या या एकदिवसीय तथाकतीत सरकार कुप्रवृत्ती ठेचण्यासाठी आजच्या काळातही लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचीच गरज आहे..!

यामध्येही स्वकर्तृत्व असणारे, जनतेशी नाळ व छत्रपतींशी निष्ठा असणारे सन्माननीय अपवाद देखील निश्चितच आहेत. हे अपवाद वगळले तर बाकीच्यांसाठी राजर्षी शाहू महाराजांचेच एक विधान आजही लागू पडते, “ही सरकार मंडळी केवळ दरबारी शोभेची बाहुली आहेत, याउपर त्यांचा काडीमात्र उपयोग नाही !”

ऐतिहासिक संदर्भ :
श्रीमच्छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र, प्रो. लठ्ठे, पान २१२ ते २१८, पान २८६,२८७

कोल्हापूरचे दत्तक प्रकरण नेमके खरे काय ? विद्यमान शाहू छत्रपती महाराज हे खरे वारसदार आहेत की नाही ?कोल्हापूरचे श्री शाहू...
29/04/2024

कोल्हापूरचे दत्तक प्रकरण नेमके खरे काय ? विद्यमान शाहू छत्रपती महाराज हे खरे वारसदार आहेत की नाही ?

कोल्हापूरचे श्री शाहू छत्रपती महाराज हे लोकसभेच्या रिंगणात उभे राहिल्याने प्रचाराच्या अंतिम टप्प्यात त्यांच्या विरोधकांकडून जवळपास ६५ वर्षांपूर्वी घडलेले दत्तक प्रकरण उकरून काढून विद्यमान छत्रपतींच्या वारसांच्या खरेपणाचा मुद्दा उपस्थित करत आहेत. वास्तवाकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करून केवळ राजकीय फायदा मिळविण्यासाठी विरोधक हे प्रकरण त्यांच्या सोयीने रंगवून सांगत आहेत. मात्र सत्य इतिहास समोर येणे गरजेचे आहे. त्यासाठी हा लेखनप्रपंच...

आपण घटनाक्रम समजून घेऊ. संजय मंडलिक यांनी सर्वप्रथम दावा केला की शाहू छत्रपती महाराज हे दत्तक असल्याने छत्रपतींचे थेट वारसदार नाहीत. त्यानंतर त्यांनी पद्माराजे कदमबांडे यांचे पुत्र राजवर्धन कदमबांडे यांना आता खरे वारसदार म्हणून उभे केले आहे.

राजर्षी शाहू छत्रपती महाराज हे सुद्धा छत्रपतींच्या गादीवर दत्तक आलेले होते. म्हणून ते सुद्धा छत्रपतींचे खरे वारस ठरत नाहीत, असेच मंडलिक यांचे मत असावे. आता राजवर्धन कदमबांडे हे खरे वारसदार असल्याचा दावा करतात, ते कसे हे आपण पाहू. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांना पद्माराजे या कन्या होत्या. त्यांचे पुत्र या नात्याने कदमबांडे हे स्वतःस शाहू महाराजांचे वारसदार म्हणवून घेतात आणि याचाच आधार घेत मंडलिक आणि चंपू विद्यमान शाहू छत्रपती महाराज हे खरे वारसदार नाहीत असा दावा करत आहेत.

विद्यमान श्री शाहू छत्रपती महाराज हे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचे सख्खे नातू असणारे कोल्हापूरचे छत्रपती शहाजी महाराज यांच्या कन्या शालिनीराजे यांचे पुत्र आहेत. ज्यापद्धतीने राजर्षी शाहू महाराज हे मुलीकडील नात्याने छत्रपती घराण्यात दत्तक आलेले होते, त्याच प्रमाणे छत्रपती शहाजी महाराजांनी मुलीचा मुलगा या नात्याने विद्यमान छत्रपती शाहू महाराजांना दत्तक घेतले आहे. जन्माच्या व दत्तकाच्या अशा दोन्ही नात्याने विद्यमान शाहू महाराज हे राजर्षी शाहू महाराजांचे "सख्खे" पणतू लागतात.

राजाराम महाराजांच्या मुलीचे पुत्र असणारे कदमबांडे हे मात्र छत्रपतींचे खरे वारसदार पण शहाजी महाराजांच्या मुलीचे पुत्र आणि राजर्षी शाहू महाराजांचे नात्याने सख्खे पणतू असणारे विद्यमान शाहू महाराज हे खरे वारसदार नाहीत, असा बालिश दावा विरोधक करत आहेत. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यशील गादीचा अवमान करत आहोत, याचे भान विरोधक ठेवत नाहीत, हे दुर्दैवी आहे !

17/04/2024

छत्रपती देवस्थान ट्रस्ट च्या वतीने आज प्रभू श्री राम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला.

स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची राजमुद्रा lशिवपुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे पुत्र, हिंदवी स्...
14/01/2023

स्वराज्याच्या चौथ्या छत्रपतींची राजमुद्रा l

शिवपुत्र श्री छत्रपती राजाराम महाराज व महाराणी ताराबाई यांचे पुत्र, हिंदवी स्वराज्याचे चौथे छत्रपती क्षत्रियकुलावतंस श्री शिवछत्रपति महाराज यांची मुद्रा.

" श्री l प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता ll रामसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते "

श्री छत्रपती राजाराम महाराजांच्या निर्वाणानंतर महाराणी ताराबाईंनी आपले पुत्र शिवाजीराजे यांस गादीवर बसवून सात वर्षे स्वराज्याचा कारभार पाहिला. या काळात सर्व पत्रव्यवहार छत्रपती शिवाजीराजे यांच्या नावाने व राजमुद्रेने केला जायचा. राजाराम महाराजांनंतर गादीवर येणारे ते स्वराज्याचे चौथे छत्रपती होते.

श्री सूर्यकुलवंशी धर्मरक्षक श्री शिवाजी महाराज मराठा राज्य संस्थापक"करवीर छत्रपती घराण्याचे हे ऐतिहासिक राजचिन्ह असून या...
13/01/2023

श्री सूर्यकुलवंशी धर्मरक्षक श्री शिवाजी महाराज मराठा राज्य संस्थापक"

करवीर छत्रपती घराण्याचे हे ऐतिहासिक राजचिन्ह असून या राजचिन्हामध्ये राज्याचे सार्वभौमत्व व छत्रपतींची राजसत्ता दर्शविणारी छत्री, मोरचेल, चवरी व तलवार हि प्रतीके असून यातील छत्रीवर "कोल्हापूर" तर सर्वात खालील बाजूस "जय भवानी" अशी अक्षरे कोरलेली आहेत. तर मध्यभागी शककर्ते श्री शिवछत्रपती महाराजांची प्रतिमा कोरलेली असून महाराजांचा उल्लेख "श्री सूर्यकुलवंशी धर्मरक्षक श्री शिवाजी महाराज मराठा राज्य संस्थापक" अशा बिरुदावल्यांनी केलेला आहे.

शिवाजी महाराजांच्या करवीर गादीचे वंशज असलेल्या छत्रपतींनी आपल्या राजचिन्हावर अशा पद्धतीने केलेला महाराजांचा उल्लेख फारच उद्'बोधक आहे.

"हिंदूपदपातशहा क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज शाहू छत्रपती"महाराष्ट्राच्या समाजकारणावर, राजकारणावर व समाजमनावर अधिराज्य ...
06/01/2023

"हिंदूपदपातशहा क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराज शाहू छत्रपती"
महाराष्ट्राच्या समाजकारणावर, राजकारणावर व समाजमनावर अधिराज्य गाजवणारे आणि आपल्या कार्यातून अलौकिक ठसा उमटवणारे, १९ व्या शतकातील महान राज्यकर्ते म्हणजे "राजर्षी शाहू छत्रपती" महाराज.
सतराव्या शतकात अन्यायाने पिचलेल्या भूमिपुत्रांत स्वाभिमान जागृत करून प्रस्थापित जुलमी सत्तांच्या विरोधात ज्वाजल्य देशप्रेमाचा हुंकार फुलविणाऱ्या युगपुरूष शककर्ते श्री शिवछत्रपती महाराजांचे ते वंशज. महाराजांनी निर्माण केलेला जनकल्याणाचा वसा आणि वारसा समर्थपणे पेलणारे राजर्षी शाहू छत्रपती महाराजांचेही कार्य पूर्वजांच्या किर्तीला साजेसेच होते.

छत्रपती शाहू महाराज ज्या धर्मात जन्माला आले, त्या हिंदू धर्माविषयी त्यांची मते काय होती. याचा थोडक्यात आढावा घेणे फार आवश्यक आहे. कारण आजच्या परिस्थितीत "शाहू महाराजांचे विचार" म्हणून काही लोक स्वतःचे विचार महाराजांच्या नावाने खपविण्याचा उद्योग करत आहेत. महाराजांचे हिंदू धर्म, संस्कृती, परंपरा याविषयींचे विचार त्यांच्याच भाषणातून, पत्रांतून, आज्ञापत्रातून जाणून घेण्याचा हा छोटासा प्रयत्न...

महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राम्हणेतर वाद फार पूर्वीपासून आहे. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांच्या आयुष्यात वेदोक्त प्रकरण घडले आणि या वादाला मोठी चालना मिळाली. कर्मठ, दुराग्रही व स्वतःला धर्मपंडीत आणि सर्वश्रेष्ठ समजणाऱ्या या लोकांमुळे महाराष्ट्राच्या धर्मकारणालाच वेगळी दिशा मिळाली ; त्याचं निर्विवाद नेतृत्व राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी केलं. त्या घटनेचे पडसाद आजही उमटत असतात.

पण, राजर्षी शाहू छत्रपती महाराजांची नेमकी भूमिका काय होती, याचा अभ्यास न करता अथवा अभ्यास असूनही जाणीपूर्वक काही डाव्या व स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या लोकांनी शाहू महाराजांचा हिंदू परंपरेला, देवदेवतांंना, कर्मकांडाला विरोध होता असे चित्र उभे केले. परंतु महाराजांच्या चरित्राचा तटस्थपणे अभ्यास करताना यातील फोलपणा स्पष्टपणे उघडकीस येतो.

महाराजांनी तत्कालीन सर्व विचारधारांचा उपयोग समाजकारणासाठी आणि राजकारणासाठी केला. परंतु आपल्या घराण्याच्या प्रथा - परंपरा कटाक्षाने पाळल्या. सत्यशोधक समाजाला प्रोत्साहन देत असतानाच राजर्षी शाहू महाराजांनी आर्य समाजाला आपलंसं केलं होतं. वेदोक्त प्रकरण घडले म्हणून राजर्षी शाहू महाराजांनी वेद नाकारले नाहीत ; तर सर्व हिंदू समाजाला वेद खुले व्हावेत यासाठी शिवाजी वैदिक स्कूल चालू केले. त्यांनी सतत वेदांचा आग्रह धरला.

गोहत्या बंदीसाठी राजर्षींनी कायदा केला होता. पण हि गोष्ट आज मुद्दाम लपवून ठेवण्यात येते. राजर्षी शाहू महाराज हिंदू समाजातल्या रूढी परंपरांना विरोध करत असत, असे चित्र उभे केले जाते. पण महाराज पूर्णतः आस्तिक होते. त्यांचा पूजाअर्चा, होमहवनला पाठिंबा असल्याचे दिसते. मात्र त्याचवेळी 'घोड्याचे मास खाल्ल्याने आपला धर्म बुडतो,' अशी भिती वाटणाऱ्या युद्धात अडकलेल्या आपल्या मराठा सैनिकांना, "यावेळी जीवंत राहणे महत्त्वाचे असून तुम्हास कोणीही जातीबहिष्कृत करणार नाही. मी छत्रपती म्हणून तुमच्या सर्व घरच्या कार्यास उपस्थित राहीन," अशी प्रेमळ सादही घालतात.

शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या आपल्या मुलांवर तिथल्या संस्कृतीचा प्रभाव पडेल, त्यामुळे आपल्या प्रथा परंपरा त्यांना माहिती पाहिजेत, असा आग्रह राजर्षी धरतात. राजर्षींच्या काळात काही लोक धर्मसुधारणांना विरोध करणारे, समाजाला घातक असणाऱ्या अनिष्ट रुढी परंपरा पाळणारे होतेच आणि यालाच जर कोण ब्राम्हणी धर्म म्हणत असेल तर सुधारणावादी हिंदूंचा त्याला विरोध असण्याचे काहीच कारण नाही. परंतू राजर्षी छत्रपती शाहू महाराजच हिंदू व हिंदुत्वाच्या विरोधातच होते असा ज्यांचा आजपर्यंत दावा होता, तेच आज राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं हिंदुत्व मांडण्यास तयार झाले ही समाधानाची बाब आहे.

हिंदू धर्मामध्ये सुधारणा करण्यासाठी वाव आहे, म्हणूनच आजपर्यंत हा धर्म टिकून आहे. मतांच्या राजकारणासाठी हिंदू धर्माला, प्रथा - परंपरेला नाकारणाऱ्या व त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना कम्युनिस्ट ठरविणाऱ्या लोकांचे यानिमित्ताने पुन्हा आम्ही स्वागतच करतो. हिंदूपदपातशहा श्री शाहू छत्रपती महाराजांच्या रूपाने द्वेष व दोषविरहीत हिंदूत्व मिळत असेल तर, त्याचा जास्त आनंदच आहे.

अखेर राजर्षी छत्रपती महाराजांनीच सांगितले आहे... #सत्याला_मरण_नाही !

छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर हे पुरोगामी की हिंदुत्ववादी ?कोल्हापूरमध्ये नुकत्याच निघालेल्या हिंदू आक्रोश मोर्चाच्य...
04/01/2023

छत्रपती शाहू महाराजांचं कोल्हापूर हे पुरोगामी की हिंदुत्ववादी ?

कोल्हापूरमध्ये नुकत्याच निघालेल्या हिंदू आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर युवराज संभाजीराजे छत्रपती यांना कोल्हापूरातीलच एका हुश्शार पत्रकाराने वरील प्रश्न विचारला. मुळात हा प्रश्नच किती निरर्थक व निर्बुद्ध आहे, हे जाणत्या लोकांच्या निश्चितच लक्षात येईल. कहर म्हणजे सर्व माध्यमांवर या मोर्चाबाबत अशा दृष्टिकोनातूनच चर्चा सुरू आहे.

छत्रपती शाहू महाराजांचे कोल्हापूर एकतर पुरोगामी म्हणून ओळखले जाते, मग ते हिंदुत्ववादी कसे झाले ? असा मूर्खप्रश्न या फुरोगाम्यांना पडला आहे. यावरून फुरोगाम्यांना "पुरोगामी" या शब्दाची व्याख्याच नीट माहीत नाही, हे स्पष्ट दिसते.

या लेखनप्रपंचाचा उद्देश हा मोर्चा किंवा मोर्चामधील मागण्या नसून या मोर्चामुळे फुरोगाम्यांना उठलेला पोटशूळ शमवणे व धर्मनिष्ठ शिवशाहू भक्त कोल्हापूरकरांचा संभ्रम दूर करणे, हा आहे !

तर या हुश्शार पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ असा निघतो की राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे पुरोगामी होते पण हिंदुत्ववादी नव्हते, किंबहुना पुरोगामीत्व आणि हिंदुत्व या दोन विरूद्धार्थी संकल्पना आहेत ! पण युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी या प्रश्नाला दिलेल्या उत्तरातूनच फुरोगाम्यांचा पक्षपातीपणा व हिंदूधर्म द्वेष उघड होण्यास सुरूवात होते. युवराजांनी उत्तरात सांगितले की, "छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूरात शिवाजी महाराजांच्या नावाने वैदिक शिक्षण देणारी शाळा सुरू केलेली होती, ती का केली असेल त्याचे कारण शोधा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल !"

हिंदू धर्माविषयी प्रेम नसणारा कोणता राजा वेदांचे शिक्षण देणारी शाळा सुरू करेल ? राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे स्वर्धमाभिमानी होते. आपल्या हिंदू धर्माविषयी त्यांना प्रचंड आस्था, आदर व अभिमान होता. आपल्या दैवतांविषयी त्यांच्या मनात पूज्यभाव होता. धर्मातील अनिष्ट प्रथा व देवपूजेची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी केलेले कार्य हे सनातन्यांनी हिंदू धर्मावर चढविलेली अनिष्ट पुटे पुसून टाकून हिंदुत्वाला उज्ज्वल बनविण्यासाठीच होते, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात अनेक मंदिरे उभारली, पुरातन मंदिरांचे जीर्णोद्धार केले, अनेक मंदिरांना त्यांनी शेकडो एकर जमिनी दान दिल्या. स्वतः महाराज नित्यनेमाने अंबाबाई व भवानी मातेच्या दर्शनास जायचे. ते महादेवाचे निस्सीम भक्त होते, याचे ऐतिहासिक संदर्भ मिळतात. महाराज भल्या पहाटे पंचगंगेमध्ये कार्तिक स्नानासाठी जायचे. वेदोक्त प्रकरण हे कार्तिक स्नानावेळीच उद्भवले होते, हे दुर्लक्षून चालणार नाही. वेदोक्त प्रकरण घडले म्हणून महाराजांनी कार्तिक स्नानाची धार्मिक परंपरा किंवा हिंदू धर्म सोडला नाही, तर वैदिक शाळेची स्थापना करून धर्मात सुधारणा घडवून आणली, हे लक्षात घेतले पाहिजे.

छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यात गोहत्या बंदीचा कायदा केला होता. धर्मपरिवर्तन झालेल्या अनेक हिंदूंना त्यांनी स्वधर्मात परत घेतले ; श्री शाहू दयानंद हायस्कूल मध्ये यासाठी नित्य यज्ञच सुरू असायचा. डाव्या विचासरणीच्या पक्षपाती इतिहासकारांनी हा सर्व इतिहास नेहमीच अंधारात ठेवला आणि हिंदू धर्माचा अभिमान बाळगणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांना चक्क निधर्मी "कम्युनिस्ट" करून टाकले !

म्हणूनच आजच्या उसण्या अवसानाच्या "घरभेदी" पत्रकारांना, पक्षपाती फुरोगाम्यांना महाराजांचं कोल्हापूर पुरोगामी की हिंदुत्ववादी, असे बाष्कळ प्रश्न पडतात.

स्वत:च्या धर्मातील अनिष्ट प्रथा परंपरांना चिटकून न राहता वेळोवेळी धर्मात सुधारणा घडविणारा, धर्मग्रंथातील पुरातन नियमांपेक्षा संविधानातील कायद्यांना अधिक मानणारा, सुधारणावादी, विज्ञानवादी, सहिष्णू, संस्कृती जपून आधुनिकतेची आस धरणारा असा राष्ट्रप्रेमी पुरातन हिंदू धर्मच खऱ्या अर्थाने पुरोगामी आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा उज्ज्वल वारसा जपणारे, आपल्या राजमुद्रेची सुरूवात श्री महादेव व श्री तुळजाभवानीच्या अभिवादनाने करणारे आणि आपल्या नावापुढे हिंदूंचे सार्वभौम महाराज - "हिंदूपदपातशहा" हे बिरूद अभिमानाने लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे खरे हिंदूत्व जपणारे "पुरोगामी हिंदुत्ववादी" होते.

आपल्या धर्माविषयी अभिमान बाळगणे, धार्मिक कर्तव्ये पार पाडणे, दैवतांप्रती पूज्यभाव ठेवून धर्मोद्धाराचे आचरण करणे हे छत्रपतींनीच आपल्या कार्यातून शिकविले आहे. यामध्ये गैर काहीच नाही. इतर धर्मियांनी या बाबी केल्या तर फुरोगाम्यांना काहीच अडचण नसते. पण हिंदू धर्मियांनी स्वधर्माचे नाव जरी उच्चारले तरी ते "सनातनी, प्रतिगामी" ठरविले जातात. दुर्दैव म्हणजे खुद्द छत्रपतींनाच त्यांना यासाठी वापरावे लागते. पण आपण आता यांच्या कोणत्याही कथनावर अवलंबून न राहता स्वतः छत्रपतींचा हा सत्य इतिहास वाचणे, त्याचे आकलन करणे व प्रसार करणे हेच उचित आहे.

दो तरफ निगहा फरमाके,
06/10/2022

दो तरफ निगहा फरमाके,

आज ललित पंचमी निमित्त श्री त्र्यंबोलीदेवी टेकडीवर पारंपरिक पध्दतीने कोहळा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी श्री...
30/09/2022

आज ललित पंचमी निमित्त श्री त्र्यंबोलीदेवी टेकडीवर पारंपरिक पध्दतीने कोहळा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी श्रीमंत युवराज संभाजी छत्रपती महाराज,श्रीमंत महाराजकुमार मालोजीराजे छत्रपती, श्रीमंत युवराजकुमार शहाजी छत्रपती, आणि सर्व मानकरी उपस्थित होते.

परंपरा वैभवाची...महाराष्ट्राच्या अस्मितेची.
26/09/2022

परंपरा वैभवाची...
महाराष्ट्राच्या अस्मितेची.

Address

Kolhapur

Alerts

Be the first to know and let us send you an email when Karvir Riyasat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Karvir Riyasat:

Share