07/08/2025
: संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान आठ महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची आर्थिक कुंचबणा होत आहे. अधिकाऱ्यांकडून तांत्रिक कारणे सांगितली जात आहेत. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज शहर काँग्रेसतर्फे निदर्शने करीत प्रांत कार्यालय, अपर तहसील कार्यालय व पुरवठा कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
अनुदान तातडीने वितरीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही
यावेळी दिला. उपाध्यक्ष बाबासाहेब कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले. आंदोलनात अजित मिणेकर, राजन मुठाणे, हारुण खलिफा, सुदाम साळुंखे, शेखर पाटील, युवराज शिंगाडे, डॉ. विलास खिलारे, सचिन साठे, ओंकार आवळकर, अरविंद धरणगुत्तीकर, दशरथ जावळे, रवी वासुदेव, साजिद मकानदार, तोसिफ लाटकर, योगेश कांबळे, मिलिंद कुरणे, रोहित जावळे, बिस्मील्ला गैबाव आदी सहभागी झाले होते.