17/12/2025
महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) याच्या नावात बदल करण्यासाठी सरकार विधेयक आणत असून, या निर्णयाच्या निषेधार्थ इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीच्या वतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ तीव्र निदर्शने करण्यात आली.
मनरेगासारखी गरिबांना थेट, हमखास रोजगार देणारी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारी प्रभावी योजना दुर्बल करण्याच्या दिशेने सरकारची वाटचाल सुरू असल्याचे स्पष्ट दिसत आहे. एकीकडे या योजनेच्या निधीत सातत्याने कपात केली जात आहे, तर दुसरीकडे महात्मा गांधींचे नाव काढून टाकण्याचा प्रयत्न करून ही योजना जाणीवपूर्वक संपवण्याचा घाट घातला जात आहे.
लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या मनरेगाऐवजी केवळ नाव आकर्षक असलेल्या, पण प्रत्यक्षात सर्वसामान्यांना कोणताही ठोस लाभ न देणाऱ्या फसव्या योजना पुढे आणल्या जात आहेत. गरिबांच्या हक्कावर गदा आणणारा आणि महात्मा गांधींच्या विचारांचा अपमान करणारा हा निर्णय पूर्णतः निषेधार्ह असून, तो तात्काळ मागे घ्यावा, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.
यावेळी आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, माजी आमदार ऋतुराज पाटील, शिवसेना उपनेते संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजयराव देवणे, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, राजेश लाटकर, राष्ट्रवादीचे व्ही. बी. पाटील, उदय नारकर, चंद्रकांत यादव, रघुनाथ यादव, बबनराव रानगे, ॲड. तौफिक मुलाणी, कॉ. दिलीप पवार, भारतीताई पवार, दुर्वास कदम, रविंद्र आवळे, प्रवीण सोनवणे, ऋषिकेश पाटील, ॲड. अभिषेक मिठारी, दिपक थोरात, उदय पोवार यांच्यासह इंडिया आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
#मनरेगा #महात्मागांधी #ग्रामीण_रोजगार #कोल्हापूर