04/06/2026
मंजूर बंधारा हा माझ्या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय, काम क्वालिटीतच झालं पाहिजे - आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे
कोपरगाव मतदारसंघातील ८ ते १० गावांतील शेतकऱ्यांच्या शेती सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या मंजूर येथील गोदावरी नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सध्या ४१ कोटी रुपयांच्या निधीतून युद्धपातळीवर सुरू असून, या कामाची आज आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाचा दर्जा, गती आणि नियोजनाचा आढावा घेत बंधाऱ्याचे काम गुणवत्तेत करुन ह्या पावसाळ्यात बंधाऱ्यात पाणी अडले पाहिजे अशा पद्धतीने काम करा अशा सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
मंजूर बंधारा हा परिसरातील ८ ते १० गावांच्या शेती सिंचनाचा प्रमुख आधार असून, बंधारा वाहून गेल्यामुळे मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांना पाण्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ४१ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. त्यामुळे लाभार्थी गावांतील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर हजारो एकर शेतीला सिंचनाचा लाभ मिळणार असून परिसरातील शेती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
यावेळी परमपूज्य श्री शिवानंदगिरीजी महाराज, जलसंपदा विभागाचे अधिकारी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन, संचालक मंडळ, संलग्न संस्थांचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, मंजूर, कारवाडी, हंडेवाडी, चासनळी, धामोरी, मोर्विस, वडगाव, बक्तरपूर, मायगाव देवी, सुरेगाव, वेळापूर, सांगवी भुसार आदी गावांतील शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.
#मंजूर_बंधारा #गोदावरी_नदी