16/08/2026
काल जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरटीचामळा पाडेगाव या ठिकाणी कुमारी श्रद्धा युवराज अडसूळ या चौथी इयत्तेमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करून पास झालेल्या विद्यार्थिनीच्या व तिच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला तसेंच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये शिक्षणाविषयीची रुची आणि स्पर्धा निर्माण व्हावी या दूरदृष्टीकोनातून यावर्षीपासून आपण तरडगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शाळांमध्ये गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याच्या सूचना शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या माध्यमातून सर्व मुख्याध्यापकांना दिल्या होत्या. ज्याचं बहुतांशी शाळांमध्ये काटेकोर पालन झालेलं दिसलं परंतु ज्या शाळांमध्ये झालं नाही त्याची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.
ज्या शाळेत मी घडलो वाढलो त्या शाळेत म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरटीचामळा येथे आज ध्वजारोहणासाठी प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहत असताना मन भरून आले होते. देशाविषयी असणार प्रेम आणि समाजाच्या सर्वांगीण सार्वभौम विकासासाठी असलेली कटिबद्धता यावेळी माझ्या कडून व्यक्त केली . विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहाराबरोबरच त्यांच्या आरोग्यावरती इथून पुढे जिल्हा परिषद सदस्य व शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीचा अध्यक्ष या नात्याने माझं विशेष लक्ष असणार आहे.
विद्यार्थी व पालकांमध्ये त्याचबरोबर शिक्षकांमध्ये व पालकांमध्ये योग्य समन्वय साधून आपल्या जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी फक्त शासनाच्या स्पर्धा परीक्षा मध्येच नव्हे तर सर्व खाजगी स्पर्धा परीक्षांमध्ये देखील नेत्रदीपक यश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून इथून पुढे माझ्याकडून उचित कृतिशील प्रयत्न होणार आहेत.
आजच्या ध्वजारोहण कार्यक्रमांमध्ये मी पालकांना बिस्कीट चॉकलेट एक वेळ कमी दिले तरी चालतील परंतु पौष्टिक आहाराला अनुकूल असणारे पदार्थ जसे की राजगिऱ्याचे लाडू, शेंगदाणा चिक्की, गुळाच्या छोट्या वड्या, खारीक अशा गोष्टी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून देण्याचा आवाहन केलं व याची सुरुवात मी माझ्यापासून केली.
विद्यार्थ्यांचा कला, क्रीडा, योगा व शैक्षणिक विकास होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी विद्यार्थी,शिक्षक व पालकांना देण्यात आली. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने शैक्षणिक गुणवत्ता विकास समितीच्या माध्यमातून आपण मागच्या महिन्यात सर्व मुख्याध्यापकांना सुचित केलं होतं की प्रत्ये