22/07/2026
💐🎂 लोककल्याणकारी राज्यासाठी दूरदृष्टी असलेले लोकनेते सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐🎂
या शुभेच्छा देताना माझ्या डोळ्यांसमोर मी प्रशासनात असताना विविध कारणानं त्यांच्यासोबतचे ते क्षण उभे होतात. त्यातील प्रत्येक क्षण अविस्मरणीय आहे. विकासाची स्पष्ट दूरदृष्टी, निश्चित दिशा आणि कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न बाळगता अविरत काम करत राहण्याचा स्वभाव ही या लोकनेत्याची कुशलता आहे.🙏
भारताच्या 'पाच ट्रिलियन' अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र 'एक ट्रिलियन' अर्थव्यवस्थेचा सिंहाचा वाटा उचलेल, हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे विधान महाराष्ट्र-विकसित महाराष्ट्राच्या दिशेने आश्वासक व निर्णायक पाऊल टाकतो आहे याची खात्री पटवून देते. ते एवढ्यावरच थांबत नाहीत, तर यासाठी अल्प, मध्यम व दीर्घकालीन उद्दिष्ट समोर ठेवून विविध पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांचा आराखडा तयार करतात. अंमलबजावणी यंत्रणांचा पाठपुरावा आणि वास्तवाचा आढावा घेतात. त्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र लोकाभिमुख होतानाच अधिक विकसित होतो आहे. "विकसित भारताच्या स्वप्नासाठी महाराष्ट्राचा सहभाग महत्त्वाचा आहे," हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मत देवेंद्रजींच्या विकसित महाराष्ट्राचा रोड मॅप किती अचूक आणि प्रबळ आहे याचेच मूल्यमापन करणारे आहे.
नुकतेच देवेंद्र फडणवीस यांनी विलासराव देशमुख (२,२१० दिवस) यांना मागे टाकले आहे. ते शरद पवार (२,४८९ दिवस) यांनाही मागे टाकून महाराष्ट्राच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री (सुमारे २,६७० दिवस) झाले आहेत. त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन करावेसे वाटते.
विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा मुंबई-नागपूर असा कोणताही भेद न करता संपूर्ण महाराष्ट्राचा त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रचा चौफेर विकास केला. कर्करोगामुळे त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे कर्करोगाच्या रुग्णांची सेवा करण्यासाठी त्यांनी भव्य असे नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट त्यांनी उभे केले. यातून देवेंद्रजी यांच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडते.मनमिळावू, नम्र, सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्तिमत्त्व म्हणून देवेंद्रजिंकडे बघितले जाते. त्याचवेळी प्रशासनाच्या बाबतीत अत्यंत कठोर भूमिका घेऊन केवळ महाराष्ट्राच्या विकासाचे ध्येय डोळ्यापुढे ठेवणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. त्यांच्यासारखा कर्तबगार आणि निष्ठावान नेता हा महाराष्ट्रासाठी अमूल्य ठेवा आहे. त्यांचे भविष्यातील राजकीय आणि सामाजिक योगदान आणखी समृद्ध होवो, हीच त्यांच्या जन्मदिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा.💐🎂🙏