01/06/2026
मराठी संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत!
'निंबोणीच्या झाडामागे...', 'जिथे सागरा धरणी मिळते', 'केतकीच्या बनी तेथे नाचला गं मोर' आणि 'घाल घाल पिंगा वाऱ्या माझ्या परसात' यांसारखी एकापेक्षा एक अजरामर गाणी ज्यांच्या सुमधुर आवाजाने सजली, त्या अजरामर पार्श्वगायिका, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने मराठी संगीत विश्वातील एका सुवर्णयुगाचा अंत झाला आहे.
मराठी भावगीत, भक्तीगीत आणि हिंदी चित्रपट संगीतात त्यांनी दिलेले अमूल्य योगदान कधीही विसरता येणार नाही. मराठी व हिंदीसोबतच बंगाली, उडिया, पंजाबी, राजस्थानी, कानडी आणि भोजपुरी अशा अनेक प्रादेशिक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली. गझल, ठुमरी आणि भक्तीगीते गाण्यात त्यांना विशेष गोडी होती.
ज्येष्ठ नागरिकांपासून ते आजच्या तरुणांपर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर आजही त्यांची गाणी तितक्याच प्रेमाने रेंगाळतात.
त्यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रातील एक अथांग आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले आहे. ही पोकळी कधीही भरून निघणार नाही.
भावपूर्ण श्रद्धांजली!