12/10/2024
राज्यातील हजारो संगणक परिचालकांना महायुती सरकारचा दिलासा..!!
मुख्यमंत्री मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील संगणक परिचालकांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला. या अंतर्गत सर्व संगणक परिचालकांना नियमित स्वरूपात मानधन मिळावे यासाठी वार्षिक ३३६ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे राज्यातील आता २० हजारांहून अधिक संगणक परिचालकांना ग्रामपंचायत स्तरावरून १० हजार रुपये मासिक मानधन मिळणार आहे. यामुळे त्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
गेल्या १३ वर्षांपासून ग्रामपंचायत स्तरावर काम करणाऱ्या संगणक परिचालकांना जे मानधन मिळत आहे ते विहित वेळेत मिळावे अशी त्यांची मागणी होती. त्यांचे मानधन मिळण्यात काही अंशी दिरंगाई होत होती. तसेच त्यांच्या इतर काही प्रमुख मागण्या ही शासन दरबारी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले होते. याच मागण्यांसह राज्यस्तरीय संगणक परिचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझी शिवसेना जनसंवाद दौऱ्या दरम्यान नुकतीच जालना येथे भेट घेतली होती. यावेळी त्यांच्या सर्व मागण्या समजून घेत त्याबाबत शासन स्तरावर लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन त्यांना यावेळी दिले होते. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री महोदयांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दर्शवत त्यांच्या मानधनासाठी भरीव निधीची तरतूद करून राज्य मंत्री मंडळ बैठकीत निर्णय जाहीर केला. त्यांच्या इतर ही मागण्यांबाबत शासनाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असा विश्वास आहे. तर या भरीव आर्थिक तरतुदीसाठी मुख्यमंत्री महोदयांसह उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा पवार साहेबांचे खूप खूप आभार..!!