09/10/2023
*हिंदू कोड बील- आणि PES*
_"महिलांनी किती प्रगती साधली आहे यावरून मी समाजाची प्रगती मोजतो._ " - बी.आर. आंबेडकर
वरील वाक्याला अनुसरून महिलांच्या स्वातंत्र्यासाठी बाबासाहेबांनी, हिंदू कोड बिल 11 एप्रिल 1947 रोजी संविधान सभेत सादर केले. 9 एप्रिल 1948 रोजी निवड समितीने त्याचा संदर्भ दिला, 24 फेब्रुवारी 1949 रोजी ते संसदेत मांडले गेले. आणी 4 वर्षांच्या विचारविनिमयानंतरही ते अनिर्णित राहिले. बाबासाहेबांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, he "killed and died unused and unsung."
स्वतंत्र भारतीय संसदेत कोणत्याही एका विधेयकावरील ही बहुधा प्रदीर्घ चर्चा होती. काँग्रेस हिंदू कोड बिलावर स्पष्टीकरण देण्यास उत्सुक नव्हती आणि त्यामुळे आंबेडकरांनी 27 सप्टेंबर 1951 रोजी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.
मिलिंद महाविद्यालयाचा found stone ज्या तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते बाबासाहेबानी बसविला, त्यांनीच हिंदू कोड बिलावर, जरी ते लोकसभेत पारित झाले तरी त्यावर मी सही करणार नाही अशी भूमिका घेतली होती.
*1947 ते 1951 पर्यंत ची हिंदू कोड बिलाची chronology आपण समजून घ्यायला हवी* ..
एकीकडे हा विरोध होत असताना, बाबासाहेब दुसरीकडे बिलाच्या समर्थनात जनभूमिका बनविण्याचे प्रयत्न करत होते या कामी त्यांना,सोहनलाल शास्त्री यांनी खूप मोलाची मदत केली. त्यांच्यावर बाबासाहेबांनी सोपवलेली जबाबदारी त्यांनी उत्कृष्ट रित्या पार पाडली.
बाबासाहेबानी साल 1945 ला *PES* स्थापन करून , सिद्धार्थ महाविद्यालयाची 1946 ला स्थापना केली तेव्हा ते म्हणतात की, The People’s Education Society’s objective is not merely to give education but to give education in such a manner as to promote intellectual, moral and social democracy. This is what modern India needs and this is what all well wishers of India must promote.”
___Dr.B. R. Ambedkar.
यालाच अनुसरून,
सिद्धार्थ व मिलिंद महाविद्यालयाने आपली परंपरा कायम राखत,या बिलाच्या समर्थनात लोकांची मनोभुमिका बनविण्यासाठी आपले योगदान दिले. हिंदू कोड बिला संदर्भात ज्या चर्चा सिद्धार्थ आणि मिलिंद महाविद्यालयात झाल्या, त्या महत्वपूर्ण ठरतात, आणि माजी विद्यार्थी म्हणून आपणास त्या ठाऊक असायला हव्यात...
पहिली चर्चा आहे सिद्धार्थ महाविद्यालयातील,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुंबईत असल्याचा सुयोग साधून सिद्धार्थ कॉलेजच्या विद्यार्थी-पार्लमेंटने त्यांना हिंदू कोड बिलावर भाषण करण्याची विनंती केली. सिद्धार्थ कॉलेज हे डॉक्टरसाहेबांचेच अपत्य असल्याने, त्यांनी विद्यार्थ्यांच्या विनंतीस मान दिला आणि हिंदू कोड बिलावर भाषण करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रमाणे, ता. *११ जानेवारी १९५०* रोजी बुधवारी सकाळी ९.०० वाजता, त्यांचे भाषण सुंदराबाई हॉलमध्ये भरलेल्या विद्यार्थी पार्लमेंटच्या अधिवेशनात झाले,बुधवारी सकाळी ८.०० लाच सुंदराबाई हॉल विद्यार्थ्यांनी चिक्कार भरून गेला होता. विद्यार्थीनींची संख्या बरीच मोठी होती. श्रोते म्हणून बाहेरील प्रतिष्ठित मंडळीही हजर होती. तेव्हा या बिलावर बोलताना बाबासाहेब म्हणाले की,
"या *बिलाच्या कलमांची तपशीलवार अशी माहिती तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांना नसेल. कारण, तुम्ही तुमच्या नित्याच्या अभ्यासक्रमात आणि परीक्षेत गुरफटलेले असता तरीपण हे बिल आजच्या व भावी पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असल्याने व त्यामुळे आपल्या देशाचे कोणकोणते फायदे होणार आहेत हे नागरिक या नात्याने माहीत होणे जरूर असल्याने सदर बिलासंबंधीचे काही विशेष मी सांगणार आहे.
हिंदू कोड बिलामागे मुख्यतः दोन उद्दिष्टे आहेत. हिंदू कायदा सर्व देशभर सुसूत्र करणे हे पहिले उद्दिष्ट आहे. यालाच इंग्रजी भाषेत ' *कोडीफिकेशन* म्हणतात आणि हिंदू कायद्याच्या काही शाखांची सुधारणा घडविणे हे दुसरे उद्दिष्ट आहे. या दुसऱ्या उद्दिष्टावरच सर्व वादविवाद केंद्रित झाला आहे. ..
या भाषणात त्यांनी सविस्तर अशी चर्चा या बिलावर, विध्यार्थ्यांना करून दिली.
दुसरे उदाहरण या बाबतीत मिलिंद महाविद्यालयाचे आहे जिथे *1951* च्या डिसेंबर मध्ये हिंदू कोड बिलावर वादविवाद स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि बाबासाहेब स्वतः प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
याबद्दल *महासूर्याच्या सानिध्यात* *ज्ञानभूमीतील पंचाहत्तर दिवस* या पुस्तकात मिलिंद चे माजी विद्यार्थी, लेखक टी.एन. गायकवाड, त्या debate बद्दल सांगतात,
The subject of debate is “The women have no rights in their ancestors' properties".
कसा वाटला विषय? सगळ्यांनी एकदम टाळ्यांचा कडकडाट केला. नोटीसने कॉलेजीयन्सना भाग घेण्याची सूचना केली. विद्यार्थी भाग घेण्यास तयार पण झाले. प्रोफेसर वानखेडे मिस नायडू -सेकंड इयर ह्या विद्यार्थीनीची तयारी करून घेत होते. वादविवाद स्पर्धेच्या तयारीत बहुतेक ब्राम्हण मुले, हक्क नसावा या बाजूचे तर ब्राम्हणेत्तर हक्क हवा अशी होती यादी.!
ठरलेल्या दिवशी डॉ. बाबासाहेब आले. सोबत माईसाहेब होत्या. मुक्काम होता स्टेट होटेलमध्ये. त्याला औरंगाबाद होटेल सुध्दा म्हणत. पुढे-पुढे त्याचे नाव अशोक होटेल असे झाले.ठरल्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब, सौ. माईसाहेब कॉलेजमध्ये आले. ६ नंबरच्या हॉलमध्ये व्यवस्था केली होती. प्रेसिडेन्ट प्रो. रेगे होते. त्यांनी डिबेटींग विषय सुचवला, "दी विमन्स हॅव नो * राईटस् इन देअर अॅनसिस्टर्स प्रॉपर्टीज". ऐकताच बाबासाहेब आश्चर्याने म्हणाले, "व्हॉट?" रेगॅनी सब्जेक्ट रिपीट केला. तेंव्हाचे उद्गार मात्र आश्चर्याचे होते. डॉ. बाबासाहेबांचे. "ओ माय गॉड! पार्टी ऑफ ए हिन्दू कोड बील, कॅरी ऑन यूवर डिबेट.
यादी प्रमाणे विद्यार्थी पुकारलेल्या नावा प्रमाणे येत, विचार मांडत. दोघा-दोघां प्रतिस्पर्ध्याची भाषणे झाली. मध्येच बाबासाहेब म्हणाले, "नो लेडी स्टूडन्ट पार्टिसिपेटींग इन द डिबेटींग? दे हॅव टू फाईट देअर सेम राईट."
अन् तेव्हढ्यांत प्रो. रेगेंनी मिस नायडू सेकंड इयर विल स्पिक नाऊ ऑन दी सब्जेक्ट. असे अनाऊन्स केले.
"व्हेरी गुड! बी बोल्ड माय गर्ल'. म्हणत बाबासाहेबांनी प्रथम टाळी वाजविली. सभागृहांत पण टाळ्यांचा कडकडाट झाला. प्रेसिडेन्टच्या इशाऱ्याने बंद झाल्या. मिस नायडू आपल्या भाषांत अगोदरच्या वक्त्याच्या भाषणाचा धागा धरून त्याचे मुद्दे खोडत होती. एकाने असा मुद्दा मांडला होता. मुलीचे हात पिवळे करण्यास मुलीच्या बापाला प्रसंगी शेती विकायचा प्रसंग येतो. हा मुद्दा खोडताना त्या म्हणाल्या, समविचारी, शिक्षीत, सुशिल अशा जातीविरहीत मुलांबरोबर कोर्ट मॅरेज केले तर शेती विकावी लागणार नाही. आंतरजातीय विवाह करण्यास आई वडिलांनी स्वखुशीने परवानगी दिल्यास बापास कर्ज होणार नाही. माझ्या या बंधूला भिक सुध्दा मागावी लागणार नाही. हायर एजुकेशन घेतात आणि विचार लोअर.
"Shame! Shame! To my poor brother!"
हे वाक्य ऐकून बाबासाहेब "हिअर! हिअर" म्हणून टाळी वाजविली. दुसरा मुद्दा खोडण्याचा प्रयत्न केला. माझा बंधू म्हणतो, "मुली कपड्यावर, गंध, पावडर, तेल साबण यावर फुजूल खर्च करतात. मिस नायडूंनी हळूच मार्मिक पणे चिमटा काढला. होय! मुली सौंदर्य प्रसाधने वापरतात ही गोष्ट जगजाहीर आहे. आम्ही दोघी-चौघी सौंदर्य प्रसाधने खरेदीसाठी दुकानात गेलो. व्हरायटीचा डिमांड केला. बाईसाब अभी अभी यह व्हरायटीज् बाबासाहब के कॉलेजके बच्चोंने खरीद ली. मै आपको कल मँगवा दूंगा! आप कल आना! हे वाक्य ऐकताच हॉलमध्ये हास्याचे फव्वारे उडाले. लगेच धागा धरून मिस नायडू म्हणाली. मला माझ्या बंधूकडून कबुलीची पावती मिळाली बस्स! मुलांना कशाला सौंदर्य प्रसाधने ? लग्नाच्या वेळी, मुलीला पहायला जातात ना? हाच रिवाज चालू चोहिकडे. “मुलगी पाहणे!” मग नटवू नये का मुलीला ? पण कुठे आहेत दुकानात सौदर्य प्रसाधन साहित्य?....
आमच्या साड्यांचा खर्च. कपडे तर वापरावीच लागणार ना! मग खर्च हा होणारच. याची मित्रांची चर्चा. चार पँट, चार शर्ट, दोन सूट काय-काय सांगतात. अंग झाकायल एक ड्रेस पुरे; पण नाही, काहींना रोज-रोज ड्रेस बदलावा लागतो. काही महाभाग आमच्या कॉलेजमध्ये सकाळ-दुपार तासा-तासाला ड्रेस बदलणारे. कोण बघतयं हो ह्यांना? सगळीकडे बुलंद हास्य...
ह्यांनाच कपड्यांचा शौक, हौस, वर म्हणायच साड्यांचा खर्च. शेवटचा मुद्दा सांगून मी माझे भाषण आटोपते घेते. कपडे-गंध पावडर, यांचा खर्च फुजूल खर्च, कपडे वर्षाकाठी किंवा सणावाराला खरेदी, गंध- पावडर तीन चार महिन्यात खरेदी. तरीही मुली उधळ माधळ, वारेमाप खर्चीक असतात. माझे बांधव हायर एज्यकेशन घ्यायला आलेत. वडिल पैसे पुरवतात. खर्च जपून करावा, आपलं शिक्षण पूर्ण करावं. म्हणतात, "काखेत कळसा अन् गावाला वळसा. अगदी तस्सेच. चार-पाच मित्र जमायचे रात्री "ड्रिंक-डिनर" किती पैसे खर्च झाले. त्या अवस्थेत भान नसते. म्हणे आम्ही मुलीच जादा खर्च करतो. स्वतःच्या डोळ्यांतल मुसळ दिसत नाही, मात्र दुसऱ्याच्या डोळ्यांतले कुसळ मात्र चटकन दिसते.
या एवढ्यावरून जर समजून घेतील की, एका आई-बापाची लेकरं भाऊ-बहीण. *पण बहिणीला हक्क देणार नाही, हा हेका सोडून देऊन विद्यासंपन्न बनून नविन विचार धारा समजून विपत्ती काळांतच बहिणीस मदत करावी, ही उदात्त भावना ठेऊन समान हक्क देण्यास तयार होवो.* *शिक्षणाने त्यांना ही सुबुद्धी सुचो. थँक यू ऑफ ऑल.*
मिस नायडू मुद्दे खोडत असतांना बाबासाहेबांची चुळबुळ चालू होती. माईसाहेब त्यांच्याकडे पाहून खाणाखुणा करीत होत्या. पण कशाच काय? मिस नायडूचे भाषण संपल अन् लगेच बाबांनी अध्यक्षांना बोलण्याची संधी मिळावी अशी विचारणा केली.
प्रो. रेगेंनी, “वाय ऑल मिन्स? यू कॅन !" थैंकस! माईसाहेबांनी दामूकडं पाहिलं. रंगित सरबत ग्लास आणला. आईसाहेबांनी औषधी मात्रा कॅपसूल बाबासाहेबांना दिला. या वेळेस थोडे नाराजीने पण कॅपसूल घेऊन पाणी पिऊन उभा राहिले..
My Dear President and Students,
You Have Listened to Some Speech. No rights and some of them demand rights. Demand and capture are different things. Rights Not Gots Far Demanding. Demand is some kind of begging.
Rights Must Be Captured By Struggle.
In That Hindu Religion.The Manuusmriti has returned no rights to women and Shudras. It is the main thing they are following religion laws but saying in other words, that expenditure real and wasted, you know man has to need
That's Why Spending Is Necessary. (कोटाच्या खिशातून सोनेरी साखळी असलेले घड्याळ काढून दाखवित म्हणाले) हाऊ मेनी ऑफ द डझन यू नो. (खिशातून पेन काढून दाखवित म्हणाले) हाऊ मेनी आय हॅव द पेनस् ? यू नो मोर दॅन डझन. You are supposing it is wasted but these are my needs. Need and spend depend upon individuality, personally how to spend. Pens, Watch, Clothes are the need of person. Nobody Can Suggest How To Spend. Income and spend must be in margin I know! As Well As A Know How To Live In A Society.
I don't like this philosophy. The man wore a loincloth and the woman nothing. There may be some manners to behave in the society so for that. There Must be spend something.
You all are getting higher education, be clever, keep some manners of society. You have to live old thinkings. Imagine Yourself Only.
I am living smoothly my life and my sister is handicapped. At in this position your sisters have no right. Her ancestors Properties. You Both Brother And Sisters The Same Children Of Your Same Parents Don't Give To The Sympathy. Give the right to her in the properties.
Thank you of all.