31/01/2021
FOR all social workers-JOIN the mission
जगातील प्रत्येक व्यक्ती समाजाशी बांधील असते . व्यक्तीचा उदय आणि विकास समाजामध्येच होत असतो."जी व्यक्ती समाजाशिवाय राहते ती एकतर पशु असते किंवा देव असू शकते". ग्रीक तत्वज्ञ अरीस्टाटलने इसवी सन पूर्व ३२० मध्ये लिहिलेले हे वाक्य आजच्या काळात हि तंतोतंत लागू ठरते. मग समाजाशी बांधील असणे म्हणजे नेमके तरी काय ? रात्रंदिवस समाजासाठी कार्य करीत राहायचं? घरदार सोडून समाजकार्य करीत फिरायचं? म्हणजे सामाजिक बांधिलकी म्हणता येयील ? असे अनेक प्रश्न उपस्थित होतात. पण सामाजिक बांधिलकीची व्याख्या थोडक्या शब्दात सांगावीशी वाटते ती हि कि, कुटुंबात राहून ज्याप्रमाणे समाधान प्राप्तीसाठी परमेश्वराची आपण भक्ती करतो, आराधना करतो. नित्यनेमाने दर दिवशी देवपूजा करतो. व एक प्रकारे मानसिक समाधान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे समाजाचे आपल्यावर असलेले प्रचंड ॠण लक्षात घेऊन नित्यनेमाने दर दिवशी आपल्याला जमेल त्या स्वरुपात सामाजिक कार्य करणे हे होय.
आज समाजाची अवस्था खूप गंभीर झाल्याचे चित्र दिसत आहे. शिक्षण , आरोग्य , भूक , बेरोजगारी , लोकसंख्या , रस्ते, वीज , पाणी आदी अनेक समस्या उग्र रूप धारण करू लागल्या आहेत.त्यातील एक समस्या जी बहुतेक वेळा दुर्लक्षित केले जाते.मासिक पाळी स्वच्छता.
मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे स्त्रिला मातृत्वाचा अनुभव घेता येतो. मात्र आपल्याकडे याबाबत पूर्वीपासून अनेक गैरसमज पसरले आहे.
समाजातील मासिक पाळीबाबत गैरसमज दूर व्हावेत, या दृष्टीने परमार्थ डेस्टीटूड़ फाऊंडेशन PARMARTH DESTITUTE FOUNDATION या संस्थेने एक अभियान राबवले आहे. # WECAREHER NOMORETEAR LIVE YOUR DREAM या अभियानाला सोशल मीडियावर जोरदार पाठिंबा मिळत आहे.
मासिक पाळी हा चार चौघात न बोलण्याचा विषय… त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चा होत नाही. मेडिकलमध्ये सॅनिटरी नॅपकिनही दबक्या आवाजात मागितलं जातं. मेडिकलमध्ये काम करणारे कर्मचारीही अगदी सोनं दिल्याप्रमाणे ते अगदी कागदात गुंडाळून देतात. कशाला हवी एवढी लपवा-छपवी…मासिक पाळी ही स्त्रियांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यामुळे प्रत्येक स्त्री परिपूर्ण होते. मात्र शहरात तसेच खेडेगावात मासिक पाळीबाबत अनेक गैरसमज पसरले आहे. सामाजिक स्तरावर हे गैरसमज दूर करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले जातात. मात्र या प्रयत्नांना शक्य तितकं यश आलेलं नाही.
खेडगावात किंवा ग्रामीण भागात महिला मासिक पाळीदरम्यान खराब कापड, प्लास्टिक, भुसा किंवा चक्क राखेचा वापर करतात. मासिक पाळीदरम्यान सॅनिटरी नॅपकिन वापरावे, यामुळे संसर्ग रोखता येतो असे अनेकदा सांगितले जाते. मात्र तरीही देशातील केवळ 30 टक्के महिला सॅनिटरी नॅपकिनचा वापर करतात.
मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर व्हावेत या दृष्टीने PARMARTH DESTITUTE FOUNDATION ने एक अभियान राबवलं आहे. या अभियानात सहभागी होण्यासाठी तुम्हाला कुठलीच रक्कम,देणगी द्यायची नाही फ़क्त तुमची समाजाला मदत करण्याची इच्छा-सेणिटरी नेपकींस तुम्हाला PARMARTH DESTITUTE FOUNDATION तर्फे दिला जाणार.तूम्हाला ते तुम्च्या जवळच्या शाळेला द्यायचे आहे . हे करताना हा टॅग वापरायचा आहे. मासिक पाळीबद्दल गैरसमज दूर व्हावेत यासाठी PARMARTH DESTITUTE FOUNDATION च एक प्रयत्न म्हणावा लागेल.
कोणताही एकटा व्यक्ती समाज परिवर्तन करू शकत नाही . समाज परिवर्तनासाठी सर्व सामाजिक घटकांची आवश्यकता असते. संस्था सुरु करण्या अगोदर सामाजिक कार्यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या. पण संस्था सुरु झाली . संस्थेची उदिष्ट्ये निश्चित करण्यात आली . आणि अनेकांचा हातभार लागला . त्यामुळे सामाजिक कार्याचे शिवधनुष्य पेलण्याची ताकद आली . संस्थेमध्ये असलेल्या सर्वांच्या सहकार्याने हे शक्य झाले आणि आपल्यासारख्या असंख्य हितचिंतकांच्या पाठींब्यामुळे सुलभ होत आहे. अजूनही संस्थेला अनेक उपक्रम राबवायचे आहेत. फक्त आपला आशीर्वाद , मार्गदर्शन आणि लोभ संस्थेवर आणि आमच्यावर कायम राहावा हीच अपेक्षा .
धन्यवाद .
संस्था अध्यक्षा
कविता राजगड़कर
मो.न.7021587234