11/06/2017
आज 527 वर्ष झाली आपलं नगर शहर इतिहासाची साक्ष देत उभं आहे. या इतक्या वर्षात काय नसेल पाहिलं या शहराने? मोठे मोठे युद्ध, राजकारणाचे डाव, समृद्धीची शिखरे. निजामापासून ते ब्रिटिशांपर्यंतचे सगळे शासक इथे होऊन गेले. म. गांधीं, जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, अहिल्याबाई होळकर, टिळक, सावरकर या सगळ्यांचे स्पर्श या भूमिनी पहिले. नंतरच्या काळात नवनीत भाई बार्शीकर यांनी या शहराला विकासाच्या दिशेनी गतिमान करण्याचा खूप महत्वाचा वाटा उचलला आणि त्यात त्यांना यश सुद्धा लाभले. अभिनय क्षेत्रात नटश्रेष्ठ शाहू मोडक, लीला गांधी, सदाशिव अमरापूरकर ते आजच्या पिढीतले हरीश दुधाडे, ओमप्रकाश शिंदे, संकेत पावसे यांनी नगरची कीर्ती केवळ मराठी नाही तर हिंदी मध्ये सुद्धा पसरवली. संगीतातील देव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या A.R.Rehman यांनी आपल्याच नगरची मुलगी अंजली गायकवाड हिला घेऊन एक गाणं रेकॉर्ड केलं आहे. पण राजकारण म्हणा किंवा काही म्हणा नगर विकासाच्या दृष्टीने मात्र खूप मागे पडलं. नगर मागून आलेली पुणे,नाशिक, औरंगाबाद हि शहरं वेगाने विकसित झाली आणि नगर आहे तिथंच राहिलं...!!!
तर चला नगरकरांनो जसं नगरचं रेल्वे स्टेशन भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा स्वच्छ स्टेशन झालं, तसंच आता शहरसुद्धा बनवूया