"शिवसेना" हे नाव शिवसेनाप्रमुखांचे वडील थोर समाजसुधारक प्रबोधनकार तथा श्री.केशवजी ठाकरे ह्यांनी दिलेले नाव आहे.
शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतिर्थ, दादर येथे झाला. लाखोंच्या संख्येने मराठी माणूस प्रथमच एकत्र आला.शिवसेना व शिवसेना अंगीकृत स्थानीय लोकाधिकार समिती-भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर "स्थानिक मराठी माणसाच्या-भूमिपुत्राच्या" भरतीस त्या त्या प्रशा
सनास भाग पाडले जावू लागले.विमानतळ,सेल्स tax कार्यालय,आयकर विभाग,आयुर्विमा मंडळ,पंचतारांकित हॉटेले येथे आज जो मराठी माणूस दिसतो ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळेच. व हे काम आजही अव्याहतपणे सुरु आहे.
मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य भूमिकांवर शिवसेना काम करते.
१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.
१९९५ साली महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला.
१९९९ साली एनडीए सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती.
शिवसेना नेते श्री. मनोहर जोशीसर यांनी लोकसभा सभापती हे मानाचे पद भूषविले आहे.
२००३ शिवसेनेचे कार्याध्यक्षपदावर माननीय श्री. उद्धवसाहेबांची नियुक्ती झाली.
२०१० शिवसेना-युवा सेनेची स्थापना.श्री.आदित्य ठाकरे संस्थापक-अध्यक्ष.
कोट्यावधी मराठी माणसाला एकत्र आण्यासाठी त्यांच्यापर्यंत ,शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी,फेसबुक वरील चिंतातूर जंतुना उत्तर देण्यासाठी उद्धवजीनच्या संकल्पनेतून आकारास आलेले आहे.तरी अधिकाधिक मराठी माणसाने ह्या पेजशी जोडले जावे.हि झाली राजकीय बाब.परंतु ,
८०% समाजकारण व २०% राजकारण ह्या सूत्रावर शिवसेना ठाम आहे व ह्यावर मार्गक्रमण करीत आहे. येथे वेळोवेळी जी नोकरभरती विषयक,शैक्षिणिक,व्यवसाय विषयक जी माहिती मार्दर्शन केले जाते त्याचा लाभ घ्यावा.