02/10/2024
आपल्या कार्यकर्त्यांवर कुटुंबाएवढाच जीव लावणारा लोकनेता - Sadabhau Khot
काल विदर्भामध्ये बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्याचा दौरा झाला. दोन जिल्हे एकाच दिवशी असल्यामुळे सकाळी सात वाजल्यापासून प्रचंड मोठी लगबग होते. आदरणीय भाऊंनी सकाळी व्यायाम करून ०९.०० वाजता जो गाडी पाय ठेवला तो रात्री नऊ पर्यंत कुठेच थांबला नाही. प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ताच्या गाठीभेटी, ग्रामस्थांशी संवाद, तिथल्या अडीअडचणी त्यानंतर प्रशासनाशी संपर्क, लोकप्रतिनिधींशी संवाद, महायुतीमधील नेत्यांच्या गाठीभेटी, त्याचप्रमाणे विधानसभेतील आढावा घेत नियोजित कार्यक्रम चालू होता. संध्याकाळी ०७.०० वाजता नंधाना तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे भव्य असा शेतकरी मेळावा होता. मुसळधार पावसात देखील आदरणीय भाऊंच्या सभेला तोबा गर्दी पाहायला मिळाली. कारण जेव्हा जेव्हा आदरणीय सदाभाऊ खोत यांची सभा असते त्यावेळी गावागावात कुठेही दवंडी पिठायची गरज लागत नाही. भाऊंची सभा म्हटलं की लोकांची पावलं आपोआप सभेकडे वळतात. अगदी सर्व पक्ष लोक भाऊंच भाषण टक लावून ऐकत असतात. हे आम्ही अनेकदा पाहिला आहे.
कार्यक्रम संपल्यानंतर आम्हाला ०९.०० वाजता अकोल्यावरून ट्रेन होती. परंतु कार्यक्रम उशिरा संपल्याकारणाने ट्रेन सापडेल याची अजिबात अपेक्षा नव्हती. ०८.०० वाजता आम्ही आमच्या संग्रामपूरचे गणेशभाऊ पाटील यांच्या गाडीमध्ये बसलो. ७० किलोमीटर अंतर कापायचं होतं. दुसऱ्या दिवशी मंत्रालयात अनेक काम असल्या कारणाने आमचं पोहोचणे देखील तितकच गरजेचं होत, हे गणेश भाऊंनी ऐकलं होतं. त्यामुळे गणेशरावांनी गाडीचा वेग वाढवला होता परंतु भाऊ गाडीत असल्यामुळे ते सुरक्षित गाडी चालवत होते. दिवसभर गाडी चालवून हैराण झालेले गणेशराव गाडी सापडेल की नाही या द्विधा मनस्थितीत होते. अस असतानाच ट्रेन निघायच्या अगोदरच दहा मिनिट आम्हाला अकोला रेल्वे स्टेशनला सोडले. त्यावर भाऊंनी गणेशरावांचं तोंड भरून कौतुक देखील केलं. आम्हाला सोडायला दोन-चार कार्यकर्त्यांच्या गाडी देखील मागे होत्या.
ट्रेन निघायची वेळ झाली तेव्हा कार्यकर्ते ट्रेनच्या खिडकीमधून हात दाखवत होते. त्यावेळी भाऊ भावनिक होऊन म्हटले, थांबा मीच त्यांना बाहेर पुन्हा भेटून येतो म्हणून ते ट्रेन मधून उतरून बाहेर गेले पुन्हा त्यांची भेट घेतली, सर्वांनी व्यवस्थित आपापल्या घरी जावा आणि मला फोन करा असं बोलले आणि आपल्या सीटवर आले.
खरंतर आपल्या कार्यकर्त्यांवर आपल्या कुटुंबावरच प्रेम करणारे नेते आजकाल खूप कमी आहे. त्यातीलच एक म्हणजे महाराष्ट्राची मुलुख मैदान तोफ आदरणीय सदाभाऊ खोत. भाऊ कायम म्हणतात आजकाल संघटनेमध्ये काम करणारे कार्यकर्ते मिळत नाहीत कारण त्यांना घरची चटणी भाकर खाऊन संघटना चालवायची असते, आंदोलन करायचे असतात. इतर पक्षांसारखं नसतं ज्यामधून कार्यकर्त्याला आर्थिक पाठबळ मिळेल आणि तो सक्षम होईल.
त्यामुळे आदरणीय भाऊ कधीच कुठल्या कार्यकर्त्याला डावलत नाहीत. मग तो किती गरीब असो वा श्रीमंत, प्रत्येकाला न्याय द्यायचा ते प्रामाणिक प्रयत्न करत असतात. कोणत्याही शेतकरी संघटनेतील कार्यकर्त्यांनी सांगितलेलं काम हे पहिलं करायचं, असा कानमंत्रच भाऊंनी मला दिला आहे. कारण हे गोरगरीब कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत म्हणूनच आपण येथे आहोत हे आपण कधीच विसरायचं नाही, असे ते कायम सांगतात.
त्यामुळे मी हा टाकलेला फोटो अत्यंत भावूक करणारा आहे. म्हणून सलाम त्या कार्यकर्त्यांना ज्यांनी आपल्या बापासमान जपलं आपल्या नेत्याला आणि सलाम त्या नेत्याला ज्यांनी आपल्या लेकरासमान जपलं कार्यकर्त्यांना...!!!
आपला नम्र
आदिनाथ कपाळे
(स्वीय सहाय्यक - आमदार सदाभाऊ खोत)
दि. १ ऑक्टोबर २०२४