Devendra Ganvir

Devendra Ganvir social work

05/02/2026
⸻🌟 खाकी वर्दीतला एक प्रामाणिक माणूस… 🌟खाकी वर्दीतला एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेलं नाव म्हणजे — ...
11/10/2025



🌟 खाकी वर्दीतला एक प्रामाणिक माणूस… 🌟

खाकी वर्दीतला एक प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेलं नाव म्हणजे — श्री. गजानन शिवलिंग राजमाने सर 🙏

मला अभिमान आहे की मला काही काळ गोंदिया जिल्ह्यातील देवरीसारख्या नक्षलग्रस्त भागात राजमाने सरांसोबत काम करण्याची संधी मिळाली.
त्या काळात सरांनी गुन्हेगारीला आळा घालत देवरी तालुक्याला एक नवी दिशा दिली. प्रामाणिकपणा, निष्पक्षता आणि निडरपणे न्याय देणं — हेच त्यांचं ब्रीद होतं.

मालेगाव असो, नागपूर असो — सर जिथं गेले तिथं गुन्हेगारांचा थरकाप उडायचा आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळायचा.
“खाकी म्हणजे केवळ वर्दी नाही, ती एक जबाबदारी आहे” हे त्यांनी आपल्या कामातून सिद्ध केलं आहे.

मला अभिमान आहे की मी पोलीस परिवारातील एक सदस्य आहे आणि अशा प्रामाणिक अधिकाऱ्यासोबत काम करण्याची संधी मला लाभली.

मनापासून सलाम त्या खऱ्या अर्थाने “खाकीतील हिरो”ला 👮‍♂️💫

📖 सरांनी लिहिलेलं “खाकीतले स्टार्स” हे प्रेरणादायी पुस्तक नक्की वाचा, मागवा आणि इतरांपर्यंत पोहोचवा.

जय महाराष्ट्र! 💐
आपलाच – देवेंद्र गणवीर, नागपूर



🔖 #खाकीतलेस्टार्स
🔖 #गजाननराजमानेसर
🔖 #खाकीतलाअभिमान
🔖 #महाराष्ट्रपोलिस
🔖 #प्रामाणिकअधिकारी
🔖
🔖
🔖

*अवनी ची कमाई*congratulation बेटा अवनी, एथलेटिक्स मध्ये 800 meter 1st Gold400 meter 1st Gold4*100 Relaly 2nd Silver Abhi...
16/02/2025

*अवनी ची कमाई*
congratulation बेटा अवनी,
एथलेटिक्स मध्ये 800 meter 1st Gold
400 meter 1st Gold
4*100 Relaly 2nd Silver
Abhinandan beta Keep it up 👍

15/02/2025

Thanks for giving Time

जीवाची मुंबईआज दुपारी १.१५ वाजता पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांची अंधेरी येथे भेट. भेटून खूप आनंद झाला. #जीवाची...
11/02/2025

जीवाची मुंबई
आज दुपारी १.१५ वाजता पद्मश्री, महाराष्ट्र भूषण अशोक सराफ यांची अंधेरी येथे भेट. भेटून खूप आनंद झाला.
#जीवाचीमुंबई #मुंबई

*जीवाची मुंबई - श्रमाची आनंदवारी* *घरेलू कामगार महिलांना आनंद देणारी वारी*पदरात पडलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत, आयुष्यभ...
10/02/2025

*जीवाची मुंबई - श्रमाची आनंदवारी*

*घरेलू कामगार महिलांना आनंद देणारी वारी*

पदरात पडलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत, आयुष्यभर काबाड कष्ट करून जीवनात समाधान शोधना-या घरेलू महिला कामगार. दररोज सकाळी उठून आठ - दहा घरची धूणी - भांडी करणे , झाडू - पोछा अशी कामे करणे. ज्या घरी काम करतात त्या घरचे शिल्लक शीळ अन्न विनातक्रार ग्रहन करणे. आयुष्यभर काबाड कष्ट करणाऱ्या या महिलांच्या जीवनात आनंद नसतोच. शिवाय घरात अठरा विश्व दारिद्र्य आणि घरातील पुरुषांचे व्यसनाचे प्रमाण या सर्व समस्यांना तोंड देत आपली स्वतःची कुचंबणा होत असताना या महिला जीवन जगत असतात. त्यांना आनंद देण्यासाठी आम्ही जीवाची मुंबई - श्रमाची आनंदवारी हा कार्यक्रम करित आहोत. *दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी 25 निवडक महिलांना घेऊन नागपूर ते मुंबई विमान प्रवास करणार आहोत.* आकाशात उडणार विमान त्यात कधी बसायला भेटेल याचा जीवनात कधीही विचार केलेला नसताना त्यामध्ये बसून जाऊन मुंबई सफर करणार आहोत. समुद्रकिनारी खेळणार, *मुंबईच्या ताज हॉटेल ला नेऊन वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणार.* *कुठल्यातरी फिल्म स्टार सोबत भेटून गप्पा करणार, कामगार कल्याण मंडळाच्या आयुक्त आणि मंत्र्यांना भेटणार आपल्या व्यथा मांडणार.* आपणही या श्रमाच्या आनंदवारीत सहभागीं होऊ शकता.
*उद्या सायंकाळी 5.00 वाजता धरमपेठ महिला बँक ऑफिस रामनगर नागपूर येथे आपण एकत्रित येणार आहोत* आपण त्यांच्याशी हितगुज करून श्रमिक महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकता.
चला तर मग या . ....
खऱ्या श्रमिकांना भेटायला. ...🙏

समन्वयक :
श्री.महेश पवार
*श्री.देवेंद्र गणवीर - 94203 62643*
प्रा.विलास तेलगोटे-98222 01150
स्नेहलताई चौधरी

 #गणवेशाच्या_आतही_असतो_माणुसकीचा_झरा. #पोलिसातील_माणूस_तुम्ही_जाणून_घ्या_हो_जरा.आजचा लोकमत वाचला आणि खूप प्रश्न पडले.   ...
21/08/2024

#गणवेशाच्या_आतही_असतो_माणुसकीचा_झरा.
#पोलिसातील_माणूस_तुम्ही_जाणून_घ्या_हो_जरा.
आजचा लोकमत वाचला आणि खूप प्रश्न पडले.
नेमके पोलिसांचे सण कोणते?कुठल्या दिवशी त्यांनी स्वतःच्या भावना मोकळे कराव्या?
कुठल्या सणांना त्यांनी बंदोबस्त सोडून घरामध्ये राहावं?
कुठल्या वेळेवर त्यांना घरी गेल पाहिजे?साहेब,
निलंबन केलं, आपले खूप खूप आभार. पण नक्कीच काही प्रश्नाचे उत्तर आपण द्यावे.
कायदा सुव्यवस्था राबवण्याचे काम पोलिसच करतात. एखाद्या घरात
एखादा दरोडा झाला, एखाद्याच्या घरात चोरी झाली, एखाद्याच्या घरी काही कौटुंबिक वाद असेल किंवा कुठे भर चौकात मारहाण होत असेल. एखादा अपघात झाला. एखादा मृतदेह रस्त्यावर पडला. एखादा गोंडस, निरागस बाळ, कुवारी माता जन्म देऊन रस्त्यावर फेकून देते, असे बरेच उदाहरणं आहेत की तिथे फक्त समोर येतो तो ‘’पोलीस’’. पोलिसांनी स्वतःच्या भावना कुठे आणि कशा व्यक्त कराव्या?
काही बाबींमध्ये पोलीस चुकत असेल पण जेव्हा आणीबाणीची वेळ येते तेव्हा समोर पोलिसाच येतो. आजही लोकांच्या मनात खाकीचा तेवढाच धाक आहे.
पण गणवेशाच्या आतही असतो माणुसकीचा झरा, पोलिसातील माणूस तुम्ही जाणून घ्या हो जरा,
कारण की त्या गणवेशाच्या आत कुणाचा बाप असतो,
कुणाची आई असते.
कुणाची बहीण असते
कुणाची पत्नी असते.
एखाद्या स्वतःच्या सणात म्हणजे जो देशाचा सर्वोच्च सण त्याला मानला जातो.
त्या दिवशी थोडासा रिलॅक्स म्हणून मानसिक त्रासातून मुक्त होण्याकरिता त्यांनी जर एखाद्या गाण्यावर नाचले. एवढा मोठा गंभीर परिणाम होतील अस एका कुठल्याही पोलिसाला नाही वाटलं असेल की अस काही होणार म्हणून.
एखादा पोलीस चुकत असेल त नक्की शिक्षा द्या तो निमुटपने सहन सुद्धा करतो.
अहो तुम्ही बडोत्री नका करू,
तुम्ही खूप पुरस्कारही नका देऊ ,
निदान
त्यांच्या भावनांची तरी कदर करायला हवी, त्यांच्या विचारांचा तरी थोडाफार आदर करायला हवा.
दिवस रात्र मेहनत करून ज्या माणसाला घरी जायची वेळ नसते, जो माणूस फक्त जनतेच्या आणि तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांच्या सेवेतच राहतो. त्यालाही स्वतःचा आयुष्य आहे. जगू द्या ना मनमोकळेपणाने त्यांनाही.
की फक्त तुमच्याच हमाल्या करावे त्यानी. आणि जर हा नियम बनवला आहे, तर मग हा सर्वांना लागू करा.
वर्दीत असले म्हणजे ते ड्युटीवर आहेत हे सगळे बंधन त्यानी पाळायचे आणि जे दहा ते पाच शासकीय कर्मचारी काम करतात त्यांनी कुठेही, कसंही वागलं तरी चालते.
मान्य करतो की पोलीस हे कर्तव्यनिष्ठ आणि त्यांना सार्वजनिक ठिकाणी बऱ्याचशा गोष्टीचे बंधन असतात . पण यांनी, स्वतःच्या घरात म्हणजे ज्या पोलीस स्टेशनमध्ये परिवारापेक्षा जास्त वेळ घालवतात. त्या घरात जर त्यांनी थोडसं आपलं भावना व्यक्त केल्या तर यात काय बिघडलं?
एखाद्या गाण्यावर नाचलं तर त्यांचं तडका फडकी निलंबन आपण केलात. त्याचा कायदा पण बनवला आहे मान्य करतो,

मग ते पण कायदे बनवा की
सणांच्या दिवशी बऱ्याचश्या सगळ्या लोकांना सुट्टी मिळेल.
त्यांच्या हक्काच्या रजा त्यांना बरोबर वेळेवर मिळतील.
एक की दीड महिन्याच्या त्यांच्या El सुट्ट्या असतात त्या त्यांना वेळेवर बरोबर त्यांनी उपभोगायला पाहिजे.
एखाद्या ठिकाणी
ड्युटीच्या वेळेपेक्षा जर जास्त वेळ जर ड्युटी केली, तर बाकीच्या डिपार्टमेंटला ओव्हरटाईम नावाचा प्रकार असतो तो पण यांना ओव्हरटाईम आपण लागू करायला पाहिजे.
सणांच्या दिवसात विकली ऑफ असलं तर जे पोलीस ड्युटी करतात त्यांना त्या दिवसाचं तीन पट पगार आपण डब्ल्यूसीएल
प्रमाणे आपण दिलं पाहिजे.
यांचं बाकीच्या शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे आपण सुट्ट्या देत नसेल तर महसूल विभागाप्रमाणे पोलिसांच्या वेतनामध्ये मध्ये जी तफावत आहे ती लवकर मिटवून त्यांचा पगार महसूल डिपार्टमेंट प्रमाणे आपण करायला पाहिजे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे
एखाद्या मंत्र्याचा दौरा असलं मंत्री साहेब महोदय संध्याकाळी पाच वाजता येतील पण त्या त्यांच्या सुरक्षेची काळजी राबवणारे पोलीस जेव्हा सकाळपासून बंदोबस्तात उभे असतात. त्यांच्या नाश्तापाण्याची त्यांच्या जेवनाची व्यवस्थित सोय आपण वेळेवर केली पाहिजे.
आपण फक्त पोलिसांकडून अपेक्षा कराव्यात की त्यांनी त्याचे कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे करावे पण त्या पोलिसांच्या काही गरजा असतात त्यांच्या काही भावना
त्यांनी केव्हा त्या भावना मोकळे करावे?

बऱ्याच डिपार्टमेंटला एलटीसी नावाचा प्रकार असतो की जे परिवारासोबत छान पद्धतीने फिरायला जाऊन रिलॅक्स होतात. किती पोलिसांना फिरण्यासाठी एलटीसी मिळतो याची पण आपण शहनीचा केली पाहिजे.
आरोग्याच्या बाबतीत 36 आजार पोलिसांना महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेमध्ये दिले आहे मग हा प्रश्न आहे की पोलिसांना 36 आजार होतात काय. पोलिसांना तुमच्या नियमानुसार 36 आजार हे कॅशलेसमध्ये होतील बाकीचे आजार हे तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने उपचार करा असं का बरं??? याच्यात पण काही बदल व्हायला पाहिजे आणि हे केव्हा होणार??
बऱ्याच ठिकाणी ड्युटीच्या तणावातून पोलीस आत्महत्या करतो. कधी कधी स्वतःजवळची बंदूक स्वतःलाच मारून आपलं जीवन संपवतो, कोणी गळफास घेतो अशी वेळ दुसऱ्या डिपार्टमेंट वर कधीच येत नाही. मग ही वेळ पोलिसांवरच का येतं?? याचं निष्कर्ष काढणे फार गरजेचा आहे. तणावात असलेल्या पोलिसांना तणाव मुक्त करण्यासाठी आपल्या काय योजना आहेत ??? हे आपण आपण मानायला हव्या.
ज्या नेत्यांना संविधानिक पद्धतीने जनता निवडून देते, जनतेचे प्रतिनिधित्व करतात ते राजकीय मंडळी कुठल्याही स्टेजवर कसे पण परफॉर्म करू शकतात. काही पण बोलू शकतात. बऱ्याचशा राजकीय पुढाऱ्यावर क्रिमिनल केसेस आहेत. सध्याच्या घडीला तर बलात्काराचा आरोप असणार ही लोक मंत्री होतात. त्यांचे दुष्कर्म चालून जातं पण प्रामाणिकपणे आपली सेवा करताना
स्वतःच्या मनोरंजनासाठी स्वतःला थोडं मोकळं करण्यासाठी झालेली घटना त्याची एवढी गंभीर दखल शासन घेऊ शकते हे खूप चांगलं उदाहरण समाजापुढे आहे काय. ???
ज्या पोलिसांना निलंबित केलं त्यांच्या परिवाराला काय वाटत असेल???
याचा विचार आपण कधी केलात का?
की माझी आई, माझी बहीण, माझा नवरा , माझी बायको, ज्या डिपार्टमेंट साठी दिवस-रात्र राबते, तो डिपार्टमेंट
आम्हाला काय देतो ???
तर निलंबन निलंबन आणि निलंबन.
असं जर निलंबन होत राहिलं तर खरंच पोलीस प्रामाणिकपणे आपली सेवा बजावतील का??? सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो.

मी आदरणीय #गृहमंत्री_देवेंद्रजी_फडणवीस यांना नम्र निवेदन करतो की,
आपण ह्या चारही पोलिसांचे निलंबन मागे घेऊन आणि हे जे कुठलेही आदेश आहेत. गणवेशात असताना नक्कीच त्याचा सन्मान झाल्या पाहिजे पण कधी कधी विठ्ठलाच्या वारी मध्ये चालताना एखाद्या पोलिसाचे पाय थिरक्कले, गणपती विसर्जनात पोलिसाचे पाय थिरकले. जयंतीच्या कार्यक्रमात त्याचे पाय थिरकले. तर त्यांना कृपा करून निलंबन करू नका. शेवटी ते पण माणूस आहे. आपण पण एक माणूस आहात. आपली सेवा करण्यासाठी हे पोलीस आहेत. तर कृपया त्यांना पण व्यक्त होऊ द्या. मोकळे होऊ द्या आणि आपणही त्यांचं निलंबन मागे घेऊन एक माणुसकीची
साद आपण इतरांना द्या, एक संवेदनशील नेतृत्व म्हणून आपण पुढाकार घेऊन नक्कीच या कारवाईचा आपण कुठेतरी विचार करावा, ही एक पोलीस परिवार म्हणून विनंती करतो. ह्या एका पोलीस परिवाराच्या भावना आहेत.
नक्कीच आपण समजून घ्याल ही विनंती करतो.
आणि थांबतो धन्यवाद.
आपला
#देवेंद्र_गणवीर
पोलीस परिवार सदस्य.
9420362643.



*आपल्या मदतीमुळे 17 कैंसर रुग्णांचे झाले यशस्वी शस्त्रक्रिया*                  आपण ठेवलेल्या स्टेटस आणि मेसेजला दिलेल्या...
17/05/2024

*आपल्या मदतीमुळे 17 कैंसर रुग्णांचे झाले यशस्वी शस्त्रक्रिया*
आपण ठेवलेल्या स्टेटस आणि मेसेजला दिलेल्या रिस्पॉन्समुळे 17 कॅन्सरग्रस्त रुग्णांचे ऑपरेशन झाले. आपले मनापासून आभार.
भविष्यात आपल्याला कुठल्याही आजाराचे रुग्ण असल्यास *(हृदय, कॅन्सर, स्पाईन, ऑर्थो, किडनी)* संपर्क करा.
निश्चितच माणुसकीच्या नात्याने मदत करण्याचा प्रयत्न नक्की करू.
आपला
*देवेंद्र गणवीर*
*9420362643*

"मैंने अपनी ख़ुश्क आँखों से लहू छलका दिया...इक समुंदर कह रहा था मुझ को पानी चाहिए !"पाणी.  ना पिण्या मिळाल. पण त्याच संघ...
20/03/2024

"मैंने अपनी ख़ुश्क आँखों से लहू छलका दिया...
इक समुंदर कह रहा था मुझ को पानी चाहिए !"

पाणी.
ना पिण्या मिळाल.
पण त्याच संघर्षां नी तो पेटला आणि उठला.
गरजला आणि महाडचे चवदार तळे सर्वासाठी खुले केले.

'तहानलेल्याला पाणी देणं' ही साधी माणुसकी नसलेलं हे जगातलं एकमेव आणि लाजीरवाणं उदाहरण आहे आपल्या परंपरेतलं ! त्या परंपरेला लाथाडून, झुगारून देऊन या देशातलं 'पाणी' नितळ करणारा दिवस, 'चवदार तळे सत्याग्रह दिवस.'

Address

Nagpur
440001

Telephone

+919420362643

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Devendra Ganvir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Devendra Ganvir:

Share

Category