23/09/2018
🙏🏿नमस्कार🙏🏿
आपल्या सर्व सेवकांना अनेक नवाने ओळखले जाते आणि आपली जातही वेगवेगळी आहे.
मात्र या मार्गावर आल्यावर आपण सेवक मोठ्या स्वाभिमानाने म्हनतो हा माझा सेवक भाऊ आहे आणि आम्ही बाबा जुमदेवजी यांच्या परमात्मा एक मार्गावरील सेवक आहोत मरनार तर सर्वच आहे पण या मार्गावय येणारे सेवक त्यांच्या जवळ तत्व, शब्द, नियम आहेत आणि जो या तत्व, शब्द, नियमांचे पालन करतात त्यांना मेल्यावर मुक्ती मिळते आणि ते भगवंतात विलीन होतात म्हणून ते भगवंता जवळ राहतात म्हणून ते फक्त आपल्या पासून दुर होतात मात्र कधीच भगवंता पासून दूर होत नाही असे मला वाटते
बाबांनी सांगितले जसे कर्म तसे फळ, कर्म भोगी नाही कर्म योगी बना आपले चांगले कर्म आपल्या नेहमी कामात येतील.
बाबांनी सकाळी विनंती आणि सायंकाळी प्राथना करायला सांगितली आणि कशी करायची तेही सांगीतली मग आपण रोज करतो, फक्त म्हणतो ती चांगल्या प्रकारे पाठही झाली त्या विनंती, मध्ये चार तत्व, तीन शब्द, पाच नियम जिवनात पाळीन असे सत्य वचन देतो आणि सांगतो याला जिवनात कधी विसरनार नाही. मग आपण वचन तर भगवंताना दिले दिवसभर मी घरुन भगवंताना वचन देऊन निघालो हे आपल्या लक्षात सुध्दा राहत नाही आपल्या बाबांनी कोणत्याही व्यक्तीला नाव पाहून, जात पाहून, मार्ग दिला नाही फक्त दुःखी मानवाला हा मार्ग दिला
काही या मार्गाचे सेवक मार्गदर्शन करतेवेळी सांगतात की मानवाने अनंत जन्म घेतले त्या जन्मात कसे कसे कर्म केले ते आपल्याला माहिती नाही म्हणून मार्गात राहून त्याचेवर दुःख आले मला माहिती नाही असे आहे का मला बाबाच्या मार्गदर्शनाने वाटते की या मार्गावर आल्यानंतर भगवंताना वचन दिल्यानंतर आपला कर्मभोग नष्ठ झाला म्हणून आपले दुःख नष्ठ झाले आता नव्याने आणि नियमांचे पालन करुण कर्मयोग कमवता येते मात्र नियमांचे पालन केले नाही तर कर्मभोग कमवता येते कर्मभोग दुःख येथील आणि कर्मयोगाने मानवी जीवन उज्वल होईल आणि आपला उध्दार होईल.
असे मला वाटते
चुकले तर सांगा शमा करा
धन्यवाद नमस्कार🙏🏿
आपला सेवक
अतुल Bhau