Navi Mumbai Municipal Corporation

Navi Mumbai Municipal Corporation This is the official page of Navi Mumbai Municipal Corporation (NMMC). kms.
(217)

• Navi Mumbai Municipal Corporation is established - 1st January 1992.

• It is the first Corporation in the country where direct Conversion of

village Gram Panchayat into Municipal Corportion.

• Area : 108.63 sq. Population - More than 12 Lakhs

• NMMC has its own Morbe Dam having 450 MLD Capacity & supplying 24 x 7 Water Supply

• NMMC has developed best landfill sites in the country to h

andle solid waste in a scientific manner.

• NMMC has developed an Eco-Friendly basis ‘C' Tech 6 sewerage treatment plants totaling a capacity of 420 MLD to treat sewage to the extent that water obtained from it can be reused.

• Best educational Standard through primary & Secondary schools and Only Corporation in the country to start school for children with different abilities (etc).

• Establishment expenditure is only 10 % which is negligible as compared to other corporations.

• Has been appreciated for being the first corporation in the state for implementing policy of "Equal Work Equal Wages" for contract workers employed in various departments such as Sanitation, gardens etc.

• NMMC provide best amenities but taking low Property tax compared to other cities so people choose Navi Mumbai as a first choice for living.

• Having emerged as a well-planned city the ever increasing population, Asia's biggest industrial area, Asia's biggest agricultural produce market, modern IT parks, Educational institutions imparting quality technical and medical education, Proposed airport is making the city a place of strategic importance.

आजचा छोटा बदल, उद्याचा मोठा पर्यावरणीय आधार. 🌿एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांना नकार देऊन कापडी किंवा कागदी प...
06/08/2026

आजचा छोटा बदल, उद्याचा मोठा पर्यावरणीय आधार. 🌿

एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांना नकार देऊन कापडी किंवा कागदी पिशवीचा स्वीकार करूया. आपल्या या छोट्याशा सवयीमुळे प्लास्टिक प्रदूषण कमी होईल, पर्यावरणाचे संरक्षण होईल आणि भावी पिढ्यांसाठी अधिक स्वच्छ, सुंदर व हरित भविष्य घडेल.

✔️ प्लास्टिक पिशव्यांना नकार द्या.
✔️ कापडी किंवा कागदी पिशवीचा वापर करा.
✔️ पर्यावरणपूरक सवयी अंगीकारा.
✔️ स्वच्छ व हरित शहर घडविण्यात सहभागी व्हा.

स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारूया, प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संकल्प करूया.

(Plastic Free, Cloth Bag, Paper Bag, Plastic Waste Reduction, Sustainable Lifestyle, Environmental Conservation, Har Ghar Tiranga, Har Ghar Swachhata, Swachh Survekshan 2025–26, Swachh Bharat Mission, Mission LiFE, Urban Development, Navi Mumbai, NMMC)

PragatichaAgenda2026 Swachhata2026 SwachhBharatMission SBMUrban2 SwachhBharat SwachhMaharashtra SwachhMaharashtraMission ReduceReuseRecycle MissionLiFE MajhiVasundhara SwachhSurvekshan202526 JanSahabhag SustainableFuture SwachhataHiSeva SayNoToPlastic PlasticFree BeatPlasticPollution ClothBag PaperBag EcoFriendly GreenLifestyle NaviMumbai NMMC MaharashtraDGIPR

‘हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर          ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्...
06/08/2026

‘हर घर तिरंगा–हर घर स्वच्छता’ मोहीमांतून नवी मुंबईत स्वच्छतेसह आरोग्यावर भर

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या ‘हर घर तिरंगा’ मोहीमेच्या अनुषंगाने देशातील सुपर स्वच्छ शहरांमध्ये नामांकित असलेल्या नवी मुंबई शहरातही महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ अभियान व्यापक स्वरूपात राबविण्यात येत आहे.
या अंतर्गत विविध भागांतील दुर्लक्षित भागांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात असून त्यासोबतच सोसायट्या, वसाहती याठिकाणी कच-याचे 4 प्रकारे वर्गीकरण करण्याविषयी नागरिकांना माहिती देऊन त्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे.
या अंतर्गत घणसोली सेक्टर 30 येथील यशोदीप हाईट्स सोसायटी तसेच सेक्टर 8 येथील गामी रिजन सोसायटी याठिकाणी सोसायटीमधील रहिवाशी तसेच सोसायटीचे स्वच्छताकर्मी यांना कचरा वर्गीकरणाविषयी माहिती देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे सांगण्यात आले.
सेक्टर 6 समर्थनगर घणसोली भागात स्वच्छता मोहीमेप्रमाणेच आरोग्य विभागाच्या वतीने मलेरिया-डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीम राबविण्यात आली. यामध्ये स्वच्छताकर्मींनी परिसर स्वच्छ करतानाच पाणी साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असल्याने उघड्यावर पडलेले टायर्स व इतर साहित्य जमा करण्यात आले. अशाच प्रकारच्या स्वच्छता मोहीमा करावेगाव, आग्रोळीगाव, दिघा विभागातील व्यावसायिक क्षेत्र, सेक्टर 16 जय भवानी मार्केट ऐरोली, जुहूगाव, महापेगाव याठिकाणी राबविण्यात आल्या.
‘सफाई अपनाओ – बिमारी भगाओ’ अभियानांतर्गत महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने सखोल स्वच्छता मोहीमा तसेच आरोग्य विभागामार्फत मलेरिया, डेंग्यू प्रतिबंधात्मक मोहीमा तसेच मूषक नियंत्रण मोहीमा संयुक्तपणे राबविण्यात येत आहेत. अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.राजेश म्हात्रे व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे यांच्या नियंत्रणाखाली संयुक्तपणे या विशेष सखोल स्वच्छता मोहीमा राबविण्यात येत असून नागरिकांचाही या मोहीमांना चांगला प्रतिसाद लाभत आहे.
तरी नवी मुंबईकर नागरिकांनी पावसाळी कालावधीत साथरोगांची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन आपल्या घरात व घराभोवताली पाणी साचून राहिल्यास होणारी डासउत्पत्ती स्थाने होऊ न देण्याची काळजी घ्यावी व तापसदृश्य स्थिती असल्यास तत्परतेने वैद्यकीय सल्ला घ्यावा असे आवाहन महापौर श्रीम. सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Swachh Survekshan Swachh Bharat Mission - Urban Ministry of Housing and Urban Affairs MyGovIndia Urban Development Department Government of Maharashtra Maharashtra DGIPR Har Ghar Tiranga हर घर तिरंगा

'मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६' मोहिमेअंतर्गत आता गणनापत्र भरून देण्याच्या कालावधीस १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुद...
06/08/2026

'मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६' मोहिमेअंतर्गत आता गणनापत्र भरून देण्याच्या कालावधीस १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

जर तुमचे गणनापत्र अजूनही भरून दिले नसेल, तर आजच ते अचूक भरून तुमच्या परिसरातील BLO अधिकाऱ्यांकडे जमा करा.

लोकशाहीतील तुमचा सर्वात महत्वाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित करण्याची हीच योग्य वेळ आहे!

स्वच्छतेचा संकल्प… प्रत्येक परिसरापर्यंत! 🇮🇳‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत नवी मुंबईतील विविध भागांमध्ये व...
06/08/2026

स्वच्छतेचा संकल्प… प्रत्येक परिसरापर्यंत! 🇮🇳

‘हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ अभियानांतर्गत नवी मुंबईतील विविध भागांमध्ये विशेष स्वच्छता व जनजागृती उपक्रम उत्साहात राबविण्यात आले. नागरिकांच्या सक्रिय सहभागातून स्वच्छ, सुरक्षित आणि निरोगी परिसर घडविण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले.

या उपक्रमांतर्गत:

✔️ घणसोली (सेक्टर ८ – गामी रिजन सोसायटी), घणसोली गाव (समर्थ नगर), करावे गाव (बेलापूर) आणि ऐरोली (सेक्टर ५ – जय भवानी मार्केट) येथे विशेष स्वच्छता व जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.

✔️ कचऱ्याचे चार प्रकारे वर्गीकरण करण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

✔️ मलेरिया प्रतिबंधक जनजागृती व विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

✔️ विशेष स्वच्छता पंधरवडा अंतर्गत परिसराची सखोल स्वच्छता करण्यात आली.

✔️ व्यावसायिक आस्थापना व बाजारपेठ परिसरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

स्वच्छ परिसर हीच प्रगत शहराची ओळख. चला, जनसहभागातून स्वच्छतेचा संकल्प अधिक दृढ करूया.

(हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, विशेष स्वच्छता मोहीम, जनजागृती, कचरा वर्गीकरण, बाजारपेठ स्वच्छता, मलेरिया प्रतिबंध, स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६, स्वच्छ भारत अभियान, मिशन LiFE, जनसहभाग, नवी मुंबई, नवी मुंबई महानगरपालिका)



PragatichaAgenda2026 Swachhata2026 SwachhBharatMission SBMUrban2 SwachhBharat SwachhMaharashtra SwachhMaharashtraMission ReduceReuseRecycle UrbanDevelopment MissionLiFE MajhiVasundhara SwachhSurvekshan202526 JanSahabhag SustainableFuture SwachhataHiSeva NaviMumbai NMMC MaharashtraDGIPR

नवी मुंबईकरांनो, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ अंतर्गत ऑनलाईन पद्धतीचा वापर करून आपली माहिती सहज अद्ययावत करा.तुम्हाला...
06/08/2026

नवी मुंबईकरांनो, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) २०२६ अंतर्गत ऑनलाईन पद्धतीचा वापर करून आपली माहिती सहज अद्ययावत करा.

तुम्हाला काय करायचं आहे?
- voters.eci.gov.in वर जा किंवा ECINET App डाऊनलोड करा.
- मागील SIR यादीत स्वतःचे नाव शोधा.
- तुमचे नाव आढळून न आल्यास आई, वडील, आजी किंवा आजोबांचे मागील SIR मधील तपशील शोधा.
- या सोप्या पर्यायांचा वापर करून तुमचा ऑनलाईन गणना अर्ज त्वरित भरा!

QR कोड स्कॅन करा आणि थेट पोर्टलवर जा!

’हर घर तिरंगा’ मोहीमेंतर्गत लोकसहभागातून होणार विविध उपक्रमांचे आयोजन          ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत कें...
05/08/2026

’हर घर तिरंगा’ मोहीमेंतर्गत लोकसहभागातून होणार विविध उपक्रमांचे आयोजन

‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने सन 2022 पासून ‘हर घर तिरंगा’ ही अभिनव मोहीम सुरू करण्यात आलेला आहे. जनतेच्या हृदयात देशभक्तीची भावना जागृत करणे तसेच भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल जागरूकता वाढविणे ही या मोहीमेची मुख्य संकल्पना असून या मोहीमेला आता लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त होताना दिसत आहे.
या अनुषंगाने केंद्र व राज्य शासनाच्या सूचनेनुसार यावर्षीही ‘हर घर तिरंगा’ ही मोहीम 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत राबविण्यात येत असून यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका विविध उपक्रम राबवित सहभागी होत आहे. यावर्षी ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताला 150 वर्षे पूर्ण होत असल्याने या मोहीमेची संकल्पना या गीताशी जोडलेली आहे. त्याचप्रमाणे 14 ऑगस्ट 2026 रोजी ‘फाळणी भयावहता स्मृती दिन’ पाळण्यात येणार आहे.
याबाबत शासन आदेशानुसार महानगरपालिका स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी याविषयी विशेष बैठक घेत संबंधित विभागांना अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांच्या नियंत्रणाखाली शासकीय परिपत्रकानुसार विविध कार्यक्रम आयोजित करण्याचे निर्देश दिले.
या अंतर्गत शहरातील घरांवर, व्यवसाय / कार्यालयांच्या ठिकाणी दि. 9 ते 17 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकविणे अपेक्षित असून नागरिकांनी तिरंगा सेल्फीसह त्याची छायाचित्रे काढून ‘सेल्फी विथ तिरंगा’ उपक्रमात सहभागी व्हावे तसेच या हॅशटॅगसह सोशल मिडियावर छायाचित्रे अपलोड करावीत असे आवाहन करण्यात येत आहे.
याप्रमाणेच हर घर तिरंगाच्या वेबसाईटवर जाऊन स्वयंसेवक नोंदणी करावी आणि स्वयंसेवक प्रमाणपत्र डाऊनलोड करून घ्यावे असेही आवाहन करण्यात येत आहे.
नागरिकांना तिरंगा ध्वज सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी महानगरपालिकेच्या विभाग कार्यालयांमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात येत असून त्याठिकाणी सवलतीच्या दरात नागरिकांना ध्वज उपलब्ध होण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
याशिवाय सर्व शाळांमध्ये त्यांच्या परिसरात तिरंगा रॅली काढून जनजागृती करणे तसेच चित्रकला, निबंध अशा स्पर्धांचे आयोजन करून त्याचप्रमाणे अनुषांगिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करण्यात येणार आहे.
मुख्यालय स्तरावरूनही महापौर श्रीम.सुजाता पाटील व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत तिरंगा रॅली, तिरंगा सायकल रॅली असे जनजागृतीपर उपक्रम लोकसहभागातून राबविण्याचे नियोजन आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत या कालावधीत ‘हर घर तिरंगा – हर घर स्वच्छता’ हा स्वच्छताविषयक उपक्रम राबविण्यात येत असून यामध्ये लोकसहभागाला प्राधान्य देण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयासह प्रमुख वास्तूंना आकर्षक तिरंगी रोषणाई करण्यात येणार असून मुख्यालयात भव्यतम तिंरगी रांगोळीव्दारे राष्ट्रभक्तीचा संदेश प्रसारित केला जाणार आहे.
दि. 14 ऑगस्ट हा दिवस ‘फाळणी भयावहता स्मृतीदिन’ म्हणून पाळण्याचे सूचित करण्यात आले असून त्यानिमित्त शासनामार्फत तयार करण्यात आलेले फाळणीविषयक प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने तयार केलेले ‘हर घर तिरंगा’ प्रदर्शन आणि ‘वंदे मातरम्’ प्रदर्शन यांचेही आयोजन करण्यात येत आहे.
स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थी, नागरिक सहभागासह सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आलेले आहे.
अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांच्या माध्यमातून 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीत शासन आदेशानुसार ‘हर घर तिरंगा’ मोहीम नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने उत्साहाने राबविण्यात येत असून यामध्ये विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांसह सर्व घटकांच्या व्यापक सहभागावर भर देण्यात येत आहे.


Maharashtra DGIPR Urban Development Department Government of Maharashtra MyGovIndia MyGov Maharashtra

स्वच्छ बाजारपेठ म्हणजे केवळ स्वच्छ रस्ते नव्हेत… ती आपल्या शहराच्या संस्कृतीची आणि जबाबदारीची ओळख आहे. 🇮🇳हर घर तिरंगा, ह...
05/08/2026

स्वच्छ बाजारपेठ म्हणजे केवळ स्वच्छ रस्ते नव्हेत… ती आपल्या शहराच्या संस्कृतीची आणि जबाबदारीची ओळख आहे. 🇮🇳

हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता’ या अभियानांतर्गत स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी बाजारपेठ घडविण्यासाठी जनसहभागाला प्रोत्साहन देत स्वच्छतेचा संदेश प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प.

✔️ दुकानासमोर व परिसरात नियमित स्वच्छता राखा.
✔️ ओला व सुका कचरा वेगळा करून कचरापेटीतच टाका.
✔️ स्वच्छ बाजारपेठ म्हणजे निरोगी नागरिक आणि सक्षम अर्थव्यवस्था.
✔️ स्वच्छतेत सक्रिय सहभाग देऊन आपल्या शहराला अधिक सुंदर बनवा.

स्वच्छतेची सवय हीच देशप्रेमाची खरी ओळख. चला, तिरंग्याच्या अभिमानासोबत स्वच्छतेचाही संकल्प करूया! 🇮🇳

(हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता, स्वच्छ बाजारपेठ, स्वच्छता जनजागृती, कचरा व्यवस्थापन, ओला व सुका कचरा, जनसहभाग, स्वच्छ सर्वेक्षण 2025–26, स्वच्छ भारत अभियान, मिशन LiFE, शाश्वत विकास, सार्वजनिक आरोग्य, नवी मुंबई, नवी मुंबई महानगरपालिका)


PragatichaAgenda2026 Swachhata2026 SwachhBharatMission SBMUrban2 SwachhBharat SwachhMaharashtra SwachhMaharashtraMission ReduceReuseRecycle UrbanDevelopment MissionLiFE MajhiVasundhara SwachhSurvekshan202526 JanSahabhag SustainableFuture SwachhataHiSeva CleanMarket WasteSegregation PublicHealth NaviMumbai NMMC MaharashtraDGIPR

मतदारयाद्यांच्या सुधारित एसआयआर कार्यक्रमांतर्गत आता 17 ऑगस्टपर्यंत दाखल करता येतील अर्ज          • मतदार याद्यांचा विशे...
05/08/2026

मतदारयाद्यांच्या सुधारित एसआयआर कार्यक्रमांतर्गत आता 17 ऑगस्टपर्यंत दाखल करता येतील अर्ज

• मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR - Special Intensive Revision) 30 जूनपासून सुरू असून त्या अंतर्गत गणनाअर्ज दाखल करण्याची मुदत 8 ऑगस्टपर्यंत होती. त्यास भारत निवडणूक आयोगाच्या वतीने मुदतवाढ जाहीर करण्यात आलेली असून आता मतदार 17 ऑगस्ट 2026 पर्यंत आपले गणनाअर्ज संबंधित मतदार यादी भाग क्रमांकाच्या मतदान केंद्र अधिकारी (BLO) यांचेकडे जमा करू शकतात.
• दि. 1 ऑक्टोबर 2026 या पात्रता दिनांकाच्या अनुषंगाने मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम सुरू असून 30 जूनपासून बीएलओंमार्फत गणनाप्रपत्रे वितरण, संकलन आणि डिजीटलायझेशनचे काम सुरू आहे. या कामास नवीन सुधारणा परिपत्रकान्वये आता 17 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून मतदान केंद्रांचे पुनर्रचनाकरण आणि पुनर्व्यवस्थापन कामही 17 ऑगस्टपर्यंत पूर्ण करावयाचे आहे. महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्यामार्फत एसआयआर कामावर बारकाईने लक्ष दिले जात आहे.
• सुधारित वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार यादीचे प्रकाशन 24 ऑगस्ट 2026 पर्यंत करावयाचे असून याबाबत दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी 24 ऑगस्ट ते 23 सप्टेंबर 2026 असणार आहे तसेच तसेच प्राप्त दावे व हरकतींची नोटीस प्रक्रिया आणि निकाली काढणे कालावधी 24 ऑगस्ट ते 22 ऑक्टोबर 2026 हा असणार आहे. अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबर 2026 रोजी प्रकाशित करण्यात येणार आहे.
• आजपर्यंत 150 ऐरोली विधानसभा मतदारसंघात 4,97,380 मतदारांपैकी 4,59,153 गणनाप्रपत्रांचे वितरण झालेले असून 2,23,808 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे माहिती भरून जमा करण्यात आलेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे.
• त्याचप्रमाणे, 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघातील 4,22,317 मतदारांपैकी 4,10,863 गणनाप्रपत्रांचे वितरण झालेले असून 2,18,028 गणनाप्रपत्रे मतदारांकडून बीएलओंकडे आवश्यक माहिती भरून जमा झालेली आहेत व त्यांचे डिजिटलायझेशन पूर्ण झालेले आहे.
• यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे नागरिकांना गणनापत्रे दाखल करण्यासाठी आता 17 ऑगस्ट 2026 पर्यंतचा कालावधी असून आपली गणनापत्रे बीएलओंकडे माहिती भरून जमा केली नाही तर त्या नागरिकाचे नाव प्रारूप मतदार यादीतून वगळले जाणार आहे.
• त्यामुळे नागरिकांनी सन 2002 च्या यादीत आपला वा आपल्या पालकांच्या नावाचा तपशील सापडला नाही तरीही फक्त गणनापत्राच्या कॉलम 3 मध्ये आपली सध्याची माहिती भरून व स्वाक्षरी करून त्यासोबत आयोगाने जाहीर केलेल्या कागदपत्रांपैकी एक कागदपत्र जोडून आपले गणनाप्रपत्र (Enumeration Form) आपल्या भागातील बीएलओ यांच्याकडे जमा करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा आपले नाव प्रारूप यादीतून वगळण्यात येईल व पुन्हा मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी फॉर्म 6 सोबत आवश्यक कागदपत्रे सादर करून नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे, याची नोंद घ्यावी.
• नागरिकांच्या सोयीसाठी आपल्या मतदार यादी भाग क्रमांकाचे बीएलओ कोण आहेत याची माहिती -
150 ऐरोली करिता https://www.facebook.com/share/p/1DWA4rSkHv/ या लिंकवर
तसेच 151 बेलापूर करिता https://www.facebook.com/share/p/19FVzXaDvf/ या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
• तरी आपला मतदानाचा घटनेने दिलेला अधिकार अबाधित राखण्यासाठी गणनाप्रपत्रे गणनापत्र (Enumeration Form) भरून बीएलओंकडे देणे व त्याचे डिजीटलायझेशन होणे आवश्यक असल्याचे लक्षात घेत 17 ऑगस्टपर्यंत न थांबता गणनाप्रपत्र आजच दाखल करावे असे आवाहन अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी तथा नमुंमपा अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार यांनी केले आहे.


Maharashtra DGIPR Urban Development Department Government of Maharashtra MyGov Maharashtra Maharashtra SEC

05/08/2026

When young minds speak for nature, the future listens. 🌱💧

Under Majhi Vasundhara Abhiyan 7.0, an Elocution Competition was organized at Tilak Junior College, Nerul, encouraging young minds to become champions of environmental conservation and sustainable living. With enthusiastic participation from over 100 students, the programme also featured an insightful session on the Catch the Rain Campaign, highlighting the importance of rainwater harvesting, water conservation, and responsible water management.

✔️ Encouraging youth participation in environmental conservation.
✔️ Promoting rainwater harvesting and water conservation.
✔️ Raising awareness on groundwater recharge and sustainable water management.
✔️ Inspiring responsible action for a water-secure and sustainable future.

The programme concluded with the Majhi Vasundhara Pledge, reaffirming the collective commitment towards conserving every drop of water and building a greener, more resilient future.

(Catch the Rain Campaign, Rainwater Harvesting, Water Conservation, Groundwater Recharge, Water Security, Sustainable Water Management, Jal Sanvardhan, Monsoon Awareness, Environmental Conservation, Climate Action, Youth for Environment, Elocution Competition, Majhi Vasundhara Abhiyan 7.0, Mission LiFE, Navi Mumbai, NMMC)

JalSanvardhan MonsoonAwareness SustainableWaterManagement EnvironmentalConservation ClimateAction ClimateChange YouthForEnvironment VoiceForNature GreenFuture Sustainability ElocutionCompetition MajhiVasundhara MissionLiFE SwachhSurvekshan SwachhBharatUrban SwachhBharatMaharashtraMissionUrban NaviMumbai NMMC MaharashtraDGIPR Ollu Sukku Ghaatku IndiaVsGarbage

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) - २०२६!आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी आणि मतदार यादीतील माहिती अद्यया...
05/08/2026

मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) - २०२६!

आपला मतदानाचा हक्क सुरक्षित करण्यासाठी आणि मतदार यादीतील माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करा.

एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव नोंदवणे कायद्याने गुन्हा आहे. सध्या जिथे राहता तिथेच नोंदणी करा.

मागील यादीत नाव नसल्यास १८०० २२ १९५० या हेल्पलाइनवर संपर्क साधा किंवा ECINET App वापरून शोध घ्या.

प्रारुप यादीनंतर नवीन मतदारांसाठी फॉर्म ६ तर चुकीच्या नोंदींसाठी फॉर्म ७ चा वापर करा.

Address

Sector 15A, Plot No 1, Palm Beach Road, CBD Belapur
Navi Mumbai (New Mumbai)
400706

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm

Telephone

+912227567070

Alerts

Be the first to know and let us send you an email when Navi Mumbai Municipal Corporation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Navi Mumbai Municipal Corporation:

Shortcuts

Share