08/07/2026
रूप पाहतां लोचनीं । सुख जालें वो साजणी ॥
तो हा विठ्ठल बरवा । तो हा माधव बरवा ॥
"ज्ञानोबा माऊली तुकाराम" या अखंड जयघोषात, भक्तीरंगी रंगलेले लाखो वारकरी पंढरीच्या वारीला निघाले आहेत. भक्ती, सेवा आणि मानवतेचा संदेश देणारी ही वारी आपल्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रतीक आहे.
कैवल्यचक्रवर्ती, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे आज श्री क्षेत्र आळंदी येथून भूवैकुंठ पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे. या पावन प्रस्थान सोहळ्यानिमित्त सर्व वारकरी बंधू-भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!