01/10/2018
एक आठवडा झाला बघतोय नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांच्या मधील वाद ..आणि पूर्ण महाराष्ट्राच्या लोकांकडेहीं बघतोय ..लाज वाटतेय मला लाज ..त्या तनुश्रीच्या मागे जवळपास निम्मं bollywood उभं झाल , या महाराष्ट्रातल्या एकानं तरी होय मी नानांच्या बाजूने उभा आहे असं म्हटलं ?
का घाबरताय तुम्ही ? आणि कुणाला घाबरताय ? ज्या नानांनी आयुष्यंभराचा सगळा पैसा, सगळं सुख दुष्काळात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा विधवा स्त्रियांसाठी दान करून टाकला त्या स्त्रियांचे अश्रू पुसले त्या नानांवर असले घाणेरडे आरोप ? तरी सगळे शांत का ?ते कुठल्या पक्षाचे नेते नाहीत म्हणून काय ? प्रत्येक पक्षात नानांचे मित्र आहेत .
नानांनीही आता समजून घेतलं पाहिजे की हे राजकारणी आहेत फक्त राजकारणी यांना कधी कुठली खेळी करायची कळत पन कधी कुणाच्या मागे उभं राहायचं हे कळत नाही ..
त्या तनुश्री चा असा आरोप आहे की 10 वर्षांपूर्वी नानांनी एका film च्या shutting वेळी गैरवर्तन केलं ..तनुश्री जर कोन हे जर तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो की ' आशिक बनाया आपने ' सारख्या कौटुंबिक चित्रपटातील हिरोईन होती ती ..
बरं असं समजून जाऊ की नानांनी असभ्य वर्तन केलं मग 10 वर्ष मँडम तुम्ही गप्प का होता ? मी समजू शकतो की कुठलीही स्त्री कधीच उगाचच स्वताचं करेक्टर असं बदनाम नाही होऊ देणार .असं नाही की मी फक्त नानांच्याच़ बाजूने बोलतोय जर तिने केलेले हे आरोप जर सीध्ध झाले तर नानांवर पहिली टीका मीच करेन ..पन नाह्ही त्या माणसाकडे बघून असं वाटतच़ नाही की असलं काहीतरी तो करेल ... 10 वर्षांपूर्वीची झालेली एक गोष्ट आज का उकरून काढताय ?
नाम फौंडेशन च्या मार्फत हजारो आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात जाऊन ज्यानं त्या 20/23/25 वर्षांच्या विधवा मुलींचे अश्रू पुसले तो नाना पाटेकर असं करू शकेल ? स्वार्थ कुणाला नाहीं मित्रांनो ? सगळी स्वार्थाच्या पोटिच आहेत आपला फायदा होतोय ना मग बोंबलत जाऊदे सगळे या विचारांची माणसं आहेत मित्रांनो ..आपल्याला काय करायचं आहे ..असल्या माणासात आपल्या उत्पन्नाचा 90% भाग शेतकऱ्यांना दान करून टाकणारा नाना असं करूच शकत नाही ..
नानांचा स्वभाव सगळया महाराष्ट्राला माहीत आहे ते प्रेमानंहीं बोलतात रागानेहीं आणि चेष्टेणेसुध्धा ..एकदा त्या माणासाला फक्त बघा सगळ्यानि त्याचं रहानीमान त्यांचे विचार ज्या bollywood मधील superstar कुणाच्या घरी यायचं सोडा रस्त्यावर फिरत सुध्धा नाहीत तोच हा bollywood चा सर्वात टलेन्टेड हिरो सरळ शेतकऱ्यांच्या घरात जातो .टेलेंटेड यासाठी की आपल्या पेक्षा बहुतेकानाच़ माहीत असेल की नाना एखादा डायलॉग फक्त एकदाच बघतात परत तो आठवत बसत नाही 50 वेळा स्क्रिप्ट बघत नाहीत . खाली बसून जेवतो कुठलाही माज नाही गर्व नाही कमीपणा नाही ..पन आम्हाला काय ना ?होऊ देकी बदनामी आम्हाला काय ? आम्ही फक्त दुसऱ्याची मज्जा बघतो ..
राजकारण करून भावा भावाची डोकी फोडायला सांगा ते आम्हाला चांगलं जमत .. एकत्र घर फोडायला सांगा हे जमत इथं ..वेळ आली आहे आता प्रत्येक माणसानं निदान त्या विदर्भ मराठवाड्याच्या स्त्रियांनी तरी पुढे येऊन नानांच्या मागे उभं रहावं ..
कधी तुम्ही ह्या bollywood च्या हिरोँचि भाषा बघितली का ? माज असतो त्याच्यात .गर्व असतो .कशामुळे माहिती आहे ? चूक आमची आहे आपन डोक्यावर घेऊन बसलोय यांना ..500 कोटी 1000 कोटी एका फिल्म च़ प्रॉफिट झाल्यावर हा माज येणारच की यांना ..
आमची मराठी फिल्म इंडस्ट्री बरी की यांच्या पेक्षा अगदी स्वच्छ आणि प्रामाणिक भलेही फीम्ल च़ प्रॉफिट कमी असुदे पन आपल्या महाराष्ट्राला कधी मान खाली घालायला लावली नाही आपल्या मराठी इंडस्ट्रीन ...
बाकीच्यांचं माहीत नाही i support nana patekar ..मी काही कुठल्या आमदार खासदारांचा कार्यकर्ता नाही की कुठल्या भाड्काव नेत्यांचा , पक्षाचा कार्यकर्ताहीं नाही . मी एका सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे ..