03/07/2026
पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काच्या पाण्यासाठी महत्त्वाचे पाऊल !
📍विधानभवन, मंत्रीमंडळ सभागृह
पिंपरी-चिंचवडकरांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, भविष्यातील सुरक्षित आणि शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी प्रलंबित 'पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प' वेळेत पूर्ण होणे अत्यंत गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.
नदीद्वारे येणाऱ्या पाण्यात होणारी गळती, चोरी आणि प्रदूषण रोखण्यासाठी हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडसाठी दीर्घकालीन जलसुरक्षेचा पाया ठरणार आहे. या बैठकीत मावळ भागातील शेतकरी व स्थानिक नागरिकांच्या भावना आणि अपेक्षांचा आदर राखून, सर्वांना न्याय देत हा प्रकल्प कालबद्ध आणि तातडीने पूर्ण करावा, अशी आग्रही मागणी यावेळी मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे केली आहे.
पिंपरी-चिंचवडकरांना अखंड आणि शुद्ध पाणी मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न अविरत सुरू राहतील!
पवना थेट जलवाहिनी प्रकल्पाबाबत मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या बैठकीतील निर्देश
1. प्रकल्प होणे गरजेचे आहे अन्यथा भविष्य आपल्याला माफ करणार नाही
2. आंदोलनात जखमी झालेल्या १२ शेतकऱ्यांना PCMC मध्ये नोकरी द्या.
3. शेतकऱ्यांच्या न्याय्य बाबी मान्य कराव्या लागतील.
4. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आणि राज्य शासन एकत्रित प्रकल्प करेल. त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करणार.
5. मावळमधील शेतकरी व संघटनांचे प्रतिनिधी यांची बैठक घेणार.
6. बाधित शेतकऱ्यांच्या पुनर्वसनचा प्रश्न मार्गी लावणार.
7. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक
#पिंपरीचिंचवड #पवनाजलवाहिनी #जलसुरक्षा #देवेंद्रफडणवीस #रवींद्रचव्हाण #भाजपमहाराष्ट्र #मावळ #शेतकरीन्याय