06/05/2026
पुस्तकांचं गाव, भिलार प्रकल्पाचा ९ वर्धापन दिन
वाचनसंस्कृतीची जोपासना करणारे, वाचन संस्कृतीची प्रेरणा देणारे महाबळेश्वर तालुक्यातील निर्सगाच्या कुशीत वसलेले भारतातील पहिले पुस्तकांचं गाव, भिलार. हा प्रकल्प आपला ९ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. महाराष्ट्र शासन, मराठी भाषा विभाग आणि राज्य मराठी विकास संस्थेने लावलेले वाचनसंस्कृतीचे रोपटे आता बहरु लागले आहे.
दि. ०४ मे २०१७ रोजी सुरु झालेला प्रकल्प आज ३५ ठिकाणी प्रकल्प कार्यरत आहे. ग्रामस्थांनी आपल्या घरातील जागा विनामोबदला प्रकल्पासाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामध्ये शाळा, मंदीरे, घरे, लॉजेस अशा ठिकाणांचा समावेश आहे. लवकरच आणखी ५ नवीन दालनांची वाढ होणार आहे. ‘शासनाचा पुढाकार आणि लोकांचा सहभाग’ हे एक उत्कृष्ट उदाहरण आहे.
दि. ०४ मे २०२६ रोजी वर्धापन दिनानिमित्त किसनवीर महाविद्यालय, वाई येथील मा. प्रा.डॉ. संग्राम थोरात यांचे ‘वाचनसंस्कती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. वाचक /पर्यटकांना आपली अविरत अखंड वाचनसेवा देणारे, ग्रामस्थांचा उत्साह, औदार्य आणि आदरातिथ्य यांची अनुभूती देणारे पुस्तकांचं गाव, भिलार दि. ०४ मे, २०२६ रोजी आपला ९ वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. वाचनसंस्कृतीला प्रेरणा देणाऱ्या या प्रकल्पाची दशकपूर्तीकडे वाटचाल सुरु आहे. शेकडो वाचक/पर्यटकांनी नावाजलेला, हजारो मान्यवरांच्या कौतुकास पात्र ठरलेला हा प्रकल्प... आपण सर्वांनी नक्की भेट द्या!...
प्रकल्पाच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा!...