28/08/2026
भारतीय सैन्य आपल्या टॅक्सवर नाही,
तर भारतीय सैन्याच्या शौर्यामुळे आपण आज सुरक्षितपणे श्वास घेत आहोत..!
रक्षाबंधन… नात्यांचा धागा, कृतज्ञतेची भावना..!
छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून, श्रीमानयोगी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यक्ष दुष्यंत भाऊ मोहोळ यांच्या नेतृत्वाखाली यंदाचे रक्षाबंधन एका वेगळ्या आणि भावपूर्ण पद्धतीने साजरे करण्यात आले.
आळंदी रोड येथील बॉम्बे सॅपर्सच्या श्रीराम मंदिरात भारतीय सैन्य दलातील शूर जवानांसोबत रक्षाबंधन साजरे करून त्यांच्या मनगटावर राखी बांधली.
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांमुळेच आपण आपल्या घरात, आपल्या कुटुंबासोबत आणि आपल्या समाजात सुरक्षितपणे श्वास घेऊ शकतो. आपली सुरक्षितता ही केवळ व्यवस्थेची जबाबदारी नसून, त्यामागे असंख्य जवानांचे शौर्य, त्याग आणि बलिदान उभे आहे. त्यांच्या त्यागाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा छोटासा प्रयत्न…
यानंतर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन आपल्या पुणे शहर पोलीस दलातील कर्तव्यनिष्ठ पोलीस बांधव आणि भगिनींसोबतही रक्षाबंधन साजरे केले.
सीमेवर जवान देशाचे रक्षण करतात, तर आपल्या शहरात पोलीस बांधव दिवस-रात्र कायदा आणि सुव्यवस्था राखत आपल्या सुरक्षिततेसाठी कार्यरत असतात.
राखीचा हा धागा केवळ मनगटावर बांधलेला धागा नाही…
तो आहे विश्वासाचा, सन्मानाचा आणि कृतज्ञतेचा बंध!
देशासाठी अहोरात्र झटणाऱ्या भारतीय सैन्य दलातील जवानांना आणि पुणे शहर पोलीस दलातील सर्व बांधव-भगिनींना मनःपूर्वक नमन!
सामाजिक बांधिलकी जपत, नात्यांचा सन्मान करत…
यंदाचे रक्षाबंधन खऱ्या अर्थाने मनापासून साजरे केले.