19/06/2026
*वयाच्या ५ - ६ वर्षांनंतर मुलांना शाळेत प्रवेश दिला जातो.कारण या वयापर्यंत मुलाच्या बुद्धीचा विकास इतका विकास झालेला असतो की तो वर्ग शिक्षकांनी सांगितलेलं आणि शिकवलेलं समजू शकतो.*
*पुढील १० वर्षे म्हणजे इयत्ता दहावी पर्यंत अर्थात मुलांच्या वयाच्या १५ - १६ पर्यंत बुद्धीविकासात वृद्धि होत होत तो आपले भलेबुरे कशात आहे याविषयी तर्क लावू शकतो, स्वतःचे निर्णय स्वतः घेवू शकतो.म्हणुन वयाच्या १५ - १६ वर्षानंतर किंवा इयत्ता दहावी उत्तीर्ण झाल्या नंतर त्याला महाविद्यालयात प्रवेश दिला जातो.*
*या दोन्ही टप्प्यात (० ते ५ - ६ वर्षापर्यंतचा पहिला टप्पा आणि ५ - ६ ते १५ - १६ पर्यंतचा दुसरा टप्पा.) त्यांच्यावर आई वडिलांचे नियंत्रण असते आणि दुसऱ्या टप्प्यात आई वडीलां बरोबरच गुरूजनांचे नियंत्रण असते.त्यामुळे या वयातील मुलांना आई वडील आणि शिक्षकांकडुन सुसंस्कार दिले जातात.*
*महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना या मुलांवर कसलेही नियंत्रण आणि बंधनं नसतात. त्यामुळे महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये शिस्त,नम्रता, आदरभाव आणि महत्त्वाचे म्हणजे आपल्या भविष्यातील प्रगती विषयी निश्चित असे लक्ष (टार्गेट) नसते.त्या मुळे महाविद्यालयीन शिक्षण घेऊन लाखो बेरोजगारांची फौज दरवर्षी बाहेर पडते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.*
*यावर एकच उपाय आहे तो म्हणजे फार मोठ्या प्रमाणात रोजगार, स्वयंरोजगार आणि रोजगारा बरोबरच स्वयंरोजगार संधी उपलब्ध करून देणारे व्यवसाय शिक्षण अर्थात टेक्निकल एज्युकेशन आजच्या काळाची गरज आहे.*
*व्यवसाय शिक्षणामध्ये माध्यमिक शिक्षणात तंत्र शिक्षण (टेक्निकल), इयत्ता दहावी नंतर आय.टी.आय., अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रम (इंजिनिअरिंग डिप्लोमा) आणि अभियांत्रिकी पदवी (इंजिनिअरिंग डिग्री) यांचा समावेश होतो.*
*आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात वरील अभ्यासक्रमांपैकी आय.टी.आय.च्या प्रशिक्षणाला अतिशय महत्व आणि फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे.कारण कृत्रिम बुद्धिमत्ताजे करु शकत नाही ते प्रत्यक्षात करणे आवश्यक आहे असे कौशल्यपूर्ण काम आय.टी.आय. मध्ये प्रशिक्षीत विद्यार्थीच करु शकतो.*
*आय.टी.आय.चे यशस्वी प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थीना खाजगी , निमसरकारी तसेच सरकारी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. तो लहान मध्यम मोठा उद्योग सुरू करु शकतो.*
*जगातील जपान जर्मनी,आखाती देश,ऑस्ट्रेलिया, न्युझीलंड आणि अनेक युरोपीयन. देशानां कौशल्ययुक्त मनुष्यबळाची फार आवश्यकता आहे तेथेही आय. टी. आय.चे विद्यार्थी आपले करीअर घडवू शकतात.*
*वरील सर्व बाबींचा विचार करता आजच्या आधुनिक युगात आय.टी.आय.च्या प्रशिक्षणाला पर्याय नाही.*
*प्रगतीचा खरा एकच मार्ग,*
*ITI चे कौशल्य प्रशिक्षण वर्ग.*