01/10/2018
छत्रपती शिवाजी महाराज तुमची या महाराष्ट्राला आज खुप गरज आहे.या तुमच्या "स्वराज्याला"योग्य दिशा देण्यासाठी तुम्ही पुन्हा जन्माला या. महाराज तुमच्या स्वराज्याची स्थिती आज फार वाईट होऊन गेली आहे.महाराज तुमच्या स्वराज्यातील गड-किल्ल्यांची स्थिती अतिशय वाईट झाली आहे.महाराज तुमच्या गड किल्ल्यांची जागा आता नालायक लोकांनी दारुचे अड्डे बनवुन टाकले आहेत .महाराज आज स्वराज्यातील गडांवर बाटल्यांच्या मोठ्या प्रमाणात ढीग पाहावयास मिळत आहे. महाराज तुमच्या गडावर एकेकाळी जे वैभव दिसत होतं ते वैभव आज बघायला मिळत नाही.बघायला मिळतं ते फक्त दारुच्या बाटल्या आणि खचलेलं गड! महाराज आज तुमच्या नावाचं फक्त राजकरण केलं जात आहे.महाराज निवडणुन जवळ आली कि तुमच्या नांवाची आठवण या राजकारणी लोकांना होते. इतर वेळेस महाराज तुमच्या नांवाचा विसर पडतो.महाराज आज या तुमच्या स्वराज्यात सामान्या लोकांची परिस्थिती खुपच अवघड होऊन गेली आहे शेतकरी आत्महात्या करत आहे. आज शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही असं दिसतं.महाराज आज स्वराज्यात अन्याय -अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.महाराज आज स्वराज्यात गरीबांना न्याय मिळत नाही.महाराज आज ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच न्याय मिळत आहे असं दिसत आहे. महाराज तुमची जी न्यायव्यवस्था होती ति आज पाहावयास मिळत नाही..महाराज आज महाराष्ट्रात मराठी भाषेवर चहु बाजुने हल्ले होतं आहे.आपल्याच घरात मराठी भाषा परकी असल्यागत दिसत आहे.पण आपल्याच राजकर्त्याना त्याच काही वाटत नाही.म्हणुन महाराज आज तुमची या महाराष्ट्राला खुपच गरज आहे.तुम्ही पुन्हा जन्माला या महाराज.