28/02/2026
अनेक दिवसांच्या धावपळी नंतर…
आंदोलनं, सभा, दौरे, बैठकांची लगबग… या सगळ्या चळवळीच्या वादळात कधी कधी स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ द्यायचा राहूनच जातो.
मी,
खूप दिवसांपासून एका क्षणाची वाट पाहत होतो. साहेब, आई आणि समृद्धी… आपण सगळे एकत्र निवांत वेळ घालवावा, गप्पा माराव्यात, जुन्या आठवणी काढाव्यात, हसावं, थोडं मन मोकळं करावं… आणि आज तो क्षण अखेर आला.
कर्नाटक–महाराष्ट्र सीमाभागातील आमचे कुलदैवत दरगोबा (दर्याप्पा) मंदिर येथे आज सहपरिवार दर्शन घेऊन आशिर्वाद घेतले. देवासमोर उभं राहिल्यावर एक वेगळीच शांतता लाभते. साहेबांची सर्वसामान्य जनतेसाठी केलेली चळवळ, संघर्ष, जनतेच्या प्रश्नांतून जाताना जी धावपळ होते, ती जणू काही त्या पवित्र स्थळी क्षणभर थांबली…
साहेबांच्या चेहऱ्यावरही आज वेगळंच समाधान दिसत होतं. संघर्षात कणखर असलेले साहेब, पण कुटुंबासोबत असताना अगदी साधे, हसरे, मोकळे… हा क्षण माझ्यासाठी अनमोल होता.
त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जत तालुका अध्यक्ष व आधुनिक द्राक्ष शेती करणारे मा. चिक्कू माळी यांच्या घरी भेट दिली. शेतकरी, शेती, नवनवीन प्रयोग, बाजारभाव, भविष्यातील योजना. या सगळ्यावर मनमोकळ्या गप्पा झाल्या. चळवळ ही फक्त रस्त्यावरची घोषणा नसते, तर ती शेतातल्या प्रत्येक वेलीशी, प्रत्येक घामाच्या थेंबाशी जोडलेली असते याची पुन्हा जाणीव झाली.
आजचा दिवस मला एक गोष्ट शिकवून गेला. संघर्ष कितीही मोठा असो, जबाबदाऱ्या कितीही असोत… पण कुटुंब, संस्कार आणि कुलदैवताचा आशीर्वाद हीच खरी ऊर्जा आहे.
चळवळ सुरूच राहील…
संघर्षही सुरूच राहील…
पण अशा क्षणांतूनच पुढच्या लढाईची ताकद मिळत राहील.
Sourabh Shetti