महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना

  • Home
  • India
  • Solapur
  • महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना

महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना सहकार्यातून समृद्धीकडे

*राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत क...
15/07/2026

*राज्यातील साठ हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या(NGP-5825)च्या पाठपुराव्याला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांनी घेतली सकारात्मक भुमिका*..
सविस्तर वृत्तांत असे की महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या शिष्टमंडळाने आज दि. १४ जुलै २०२६ रोजी व गेली दोन महिन्यांमध्ये तीन ते चार वेळेस राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. श्री.जयकुमार गोरे साहेब यांची त्यांच्या निवास स्थानी व मंत्रालय येथे अनेक वेळा भेटी घेतल्या.तसेच *विधान परिषदेचे उपसभापती मा. सचिन भाऊ आहेर साहेब यांनी सुध्दा ग्राम विकास मंत्री व प्रधान सचिव मा.श्री.चंद्रकांत पुलकुंडवार साहेब यांच्याशी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर जवळपास एक ते दीड तास बैठक घेऊन यावर सखोल चर्चा करण्यात आली*.त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महत्त्वाच्या मागण्यावर निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे निष्पन झाले व
बैठकीत सर्वाधिक महत्त्वाचा विषय असलेल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत मंत्री महोदयांनी सकारात्मक भूमिका घेत संबंधित फाईल लवकरच मंजूर होणार असल्याची माहिती विधान परिषदेचे उपसभापती सचिन भाऊ आहेर यांना व ग्रामपंचायत कामगार सेनेच्या शिष्टमंडळात दिली. त्यामुळे राज्यभरातील कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
बैठकीत प्रामुख्याने 1)ERP लॉगिन या अनेक वर्षांपासून प्रलंबित विषयावरही मंत्री महोदयांनी स्पष्ट भूमिका मांडली. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन भविष्यात थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, अशी कार्यपद्धती राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
2)वयोमर्यादा वाढल्यामुळे शासकीय सेवेत संधी गमावणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही मोठा दिलासा देताना जिल्हा परिषदेचे १०% टक्के पदभरतीमध्ये अशा कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजूर करणार असल्याची माहिती मंत्री महोदयांनी दिली.
याशिवाय,3) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अडचणीचे कारण ठरत असलेल्या वसुलीची अट आज शिथील केली परंतु या निर्णयामुळे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फारसा फायदा होत नसल्याचे शिष्टमंडळाने ग्रामविकास मंत्री यांच्या निदर्शनात आणून दिले तरी वसुलीच्या अटीबरोबर उत्पन्नाची अटी कायम रद्द झाल्याशिवाय ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना फायदा होणार नाही अशी स्पष्ट भूमिका मांडली त्यावर ग्रामविकास मंत्री व प्रधान सचिव यांनी सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून,ही अट रद्द करण्याबाबत कार्यवाही करण्यात आल्याचे मंत्री महोदयांनी व सचिवानी सांगितले.
या सर्व विषयांवर तातडीने पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले 4) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे नवीन दरानुसार किमान वेतनातील लवकरात लवकर वाढ करण्यात यावी यावर सुद्धा चर्चा झाली माननीय मंत्री महोदय व ग्रामविकास विभागाचे सचिव यांनी कामगार विभाग यांच्याकडून नवीन दराचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाला सादर प्राप्त झाल्या बरोबर तात्काळ कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
बैठकीनंतर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना (NGP-5825) च्या वतीने सांगण्यात आले की, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ही बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली आहे.
राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर विविध संघटनांनी सातत्याने आश्वासने दिली; मात्र प्रत्यक्षात अपेक्षित तोडगा न निघाल्याने राज्यातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना (NGP-5825) ने हे सर्व प्रश्न शासन स्तरावर ठामपणे मांडत सातत्याने पाठपुरावा केला.
आज झालेल्या बैठकीत वेतनवाढ, ERP लॉगिन, १० टक्के पदभरती, तसेच वसुली व उत्पन्नाच्या अटीसारख्या महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या न्याय्य मागण्यांना दिशा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
संघटनेच्या मते, ही केवळ एका संघटनेची नव्हे, तर राज्यातील ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या एकजुटीची आणि सातत्यपूर्ण लढ्याची ताकद आहे.आगामी काळात या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊन प्रत्येक ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला न्याय मिळावा,हीच सर्व कर्मचाऱ्यांची अपेक्षा असल्याचे संघटनेने स्पष्ट केले.यावेळी राज्यातील सुमारे ६० हजार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री,मा. ना.श्री.सचिनभाऊ अहीर उपाध्यक्ष महाराष्ट्र विधानपरिषद, मा.ना.श्री. जयकुमार गोरे यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.*तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेण्यासाठी मा.आमदार प्रसाद भाऊ लाड साहेब व फिरोज भाई मासूलदार यांनी सुद्धा शासन स्तरावर वेळोवेळी पाठपुरावा केला आहे* या बैठकीच्या अनुषंगाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या असून,संघटनेने शासनाकडून लवकरच या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे
या वेळी
मा.श्री.विलासभाऊ कुमरवार राज्याध्यक्ष
श्री. दयानंदजी एरंडे सरचिटणीस
श्री.नवनाथजी नरवडे मराठवाडा विभागीय अध्यक्ष
श्री.कृष्णाजी होडे जिल्हा अध्यक्ष रत्नागिरी
श्री.सतीश भाऊ मस्के जिल्हाध्यक्ष लातूर
श्री.सुरेशजी हिंगे पुणे विभागीय अध्यक्ष
श्री. गणेशजी कोळसे राज्य प्रसिद्धी प्रमुख
श्री.मंगेश विलास चिंचोलकर अध्यक्ष तालुका कोरपना
श्री.गंगाराम भाऊ जुमनाके कोषाध्यक्ष तालुका कोरपना
श्री. नंदू पावडे वरोरा सचिव
श्री. दिपेश नारकर संपर्क प्रमुख
श्री. सुशेन जाधव
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना NGP - 5825 चे इतर पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते .

02/05/2026
🔰 सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे...
02/05/2026

🔰 सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रक्रियेबाबत महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.

न्यायालयाने विचारले आहे की, जेव्हा सरकारी योजना जसे रेशन, खत, पेन्शन किंवा इतर लाभांसाठी बायोमेट्रिक म्हणजेच फिंगरप्रिंट पडताळणी अनिवार्य केली जाते, तेव्हा मतदानाच्या वेळी हीच तंत्रज्ञान प्रणाली का वापरली जात नाही? या प्रश्नामुळे निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि बनावट मतदान रोखण्याबाबत नवी चर्चा सुरू झाली आहे.

हा मुद्दा निवडणूक व्यवस्थेवर लोकांचा विश्वास अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. जर मतदानावेळी बायोमेट्रिक प्रणाली वापरली गेली, तर मतदारांची अचूक ओळख पटवणे सोपे होऊ शकते आणि गैरप्रकारांवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

मात्र तज्ज्ञांचे मत आहे की, अशी प्रणाली लागू करण्यापूर्वी डेटा सुरक्षा, नागरिकांची गोपनीयता, तांत्रिक अडचणी आणि ग्रामीण भागातील सुविधा यावर सखोल विचार होणे आवश्यक आहे.

सध्या या प्रकरणावर अंतिम निर्णय न्यायालयीन सुनावणीनंतरच स्पष्ट होईल. त्यामुळे देशाचे लक्ष आता या महत्त्वाच्या सुनावणीकडे लागले आहे.



============================
पोस्ट लाईक, शेअर, कमेंट करा आणि कॉपी-पेस्ट करून वेगवेगळ्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये जास्तीत जास्त व्हायरल करा. तसेच, कायदेविषयक आणि इतर उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा.
============================
आरटीआय ह्यूमन राइट्स एक्टिविस्ट असोसिएशन
RTI Human Rights Activist Association

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या क्रूज दुर्घटनेत अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.या दुर्घटनेत एका आईने आपल्या लह...
01/05/2026

मध्य प्रदेशातील जबलपूर येथे घडलेल्या क्रूज दुर्घटनेत अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे.
या दुर्घटनेत एका आईने आपल्या लहान मुलाला शेवटच्या क्षणापर्यंत घट्ट मिठी मारून ठेवले होते. दोघांचेही मृतदेह एकमेकांना बिलगलेल्या अवस्थेत आढळले. घटनास्थळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्या महिलेनं लाइफ जॅकेट घातले होते, त्यामुळे ती स्वतःचा जीव वाचवू शकली असती.
पण आईने स्वतःचा जीव वाचवण्याऐवजी आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या क्षणापर्यंत तिने आपल्या मुलाचा हात सोडला नाही. आईच्या या निस्वार्थ प्रेमाने आणि त्यागाने सर्वांना हेलावून टाकले आहे.
ही घटना आईच्या मायेची, प्रेमाची आणि त्यागाची जिवंत साक्ष आहे. संकटाच्या क्षणीही आई आपल्या लेकरासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालते, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.
🙏 ही बातमी वाचून मन सुन्न होतं… आईसारखं प्रेम जगात दुसरं कुठेच नाही.
#आई #देवाचरुप #दुख

01/05/2026

I got over 300 reactions on one of my posts last week! Thanks everyone for your support! 🎉

30/04/2026

1 मे महाराष्ट्र दिन

नाकातून बोलणारांनी कितीही नकारात्मक लिखाण केले तरीही... हा चित्रपट चित्रपटगृहात येण्यापूर्वीच Blockbuster ठरला आहे.     ...
29/04/2026

नाकातून बोलणारांनी कितीही नकारात्मक लिखाण केले तरीही...
हा चित्रपट चित्रपटगृहात येण्यापूर्वीच Blockbuster ठरला आहे.




Address

Solapur
413006

Telephone

+917350591491

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना:

Shortcuts

Share

Category