22/04/2026
कोण म्हणतय या देशात क्रांती घडू शकत नाही?
कमीत-कमी ५ हजार हेतुपुरस्कृत गोळा केलेल्या लोकांचा मोर्चा होता तो. विशेषतः सत्ताधार्यांच्या पाठबळाने निघाला होता. तगडा पोलीस बंदोबस्त होता. राज्याचे मंत्री, खासदार, आमदार, महापौरांसह कित्येक महत्वाचे भाजपाचे (बिनडोक) पदाधिकारी पण मोर्चात सामील होते.
पण झाल काय?
एक सुशिक्षीत महीला या हजारोंच्या झुंडीला पुरून उरली. तीने पोलीस यंत्रणेला आपल्या कर्तव्याची जाणीव योग्य पद्धतीने करुन दिली. तीने अगदीच योग्य भाषेत मंत्र्याची लायकी काढली. तीचे रौद्ररुप बघून बड्या महारथींनी अक्षरशः तोंड लपवून पळ काढला. तीचा राग-संताप, आक्रमक देहबोली, बोलण्यातली निर्भीडता दहा हजारांच्या गर्दीवर भारी पडली. एका बलाढ्य राजसत्तेचे तीने गर्वहरण केले.
कोण होती ती?
या १४० कोटी लोकसंख्येच्या देशातील एक मताचा अधिकार असलेली सर्वसामान्य महीला. या देशाचा इतिहास आहे, इथली प्रत्येक क्रांती ही एका छोट्या ठिणगीमधून घडली आहे. ती ठिणगी कशी असते हे काल उभ्या महाराष्र्टाने पाहिले. अशा नारी शक्तीला वंदन करण्यासाठी कोणत्याही कायद्याची गरज नाही. कारण ही वाघिण तुमच्या हजारोंच्या टोळीला एकटीने भिडलीय. सत्ता आणि राजकारणामध्ये विवेक सोडून जगणार्यांना 'इथून चालते व्हा' म्हणत हाकलून लावण्याची ताकत एका मतामध्ये आहे. एक सर्वसामान्य महिला आज अमर्याद उन्मादी राजसत्तेला रस्त्यावर उभी राहून शिव्या देत असेल, तर कोण म्हणतय या देशात क्रांती घडू शकत नाही?
#वरळी_भंगार_मोर्चा