02/06/2026
नारी शक्तीचा सन्मान हा आपल्या संस्कृतीचा आत्मा आहे!
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी NDTV मराठी मंच - नारी शक्ती महाराष्ट्राची या कार्यक्रमात नारी शक्तीचा आदर करताना अत्यंत प्रभावीपणे संदेश दिला की, म्हणजे महिलांचा सन्मान हा केवळ भाषणांपुरता किंवा कागदापुरता मर्यादित नसून तो आपल्या दैनंदिन वर्तनात आणि विचारांमध्ये दिसला पाहिजे.
राजमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांसारख्या महान स्त्रियांनी आपल्या इतिहासाला सामर्थ्य, संस्कार आणि संघर्षाची दिशा दिली. त्यांच्याच प्रेरणेने आजची नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात नवे शिखर गाठत आहे.
समाज बदलायचा असेल, तर पुरुषांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. कारण समृद्ध, सक्षम आणि ‘सुजलाम् सुफलाम्’ भारताचा मार्ग हा नारी शक्तीच्या समान सहभागातूनच जातो.
नारीचा सन्मान म्हणजे राष्ट्राचा अभिमान!