19/05/2026
थेरगावमधील पाणी समस्येबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा.
गणेशनगर, थेरगाव परिसरात पाणी पुरवठा नियमित नसल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याचा पुरवठा वेळेवर होत नाही आणि पाणी आले तरी त्याचा दाब खूप कमी असतो, अशा तक्रारी नागरिकांनी मांडल्या होत्या.
नागरिकांची हीच अडचण सोडवण्यासाठी आज समर्थ कॉलनी येथील रहिवाशांसह सहशहर अभियंता अजय सुर्यवंशी यांची भेट घेतली आणि सर्व समस्या थेट त्यांच्यासमोर मांडल्या.
परिसरातील सर्व पाईपलाईन चेक करून घेऊन, जिथे खराब असेल तिथे सर्व दुरुस्ती करून पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत करून दिला जाईल, अशी सकारात्मक भूमिका अजय सुर्यवंशी साहेब यांनी यावेळी घेतली. जोपर्यंत नागरिकांचा हा प्रश्न पूर्णपणे सुटत नाही, तोपर्यंत आमचा पाठपुरावा सातत्याने सुरू राहील.
यावेळी कार्यकारी अभियंता महेश बरीदे, उपअभियंता प्रविण धुमाळ, साकेत पावरा, कनिष्ठ अभियंता अंकुश सईजराव, नम्रता ढवन, समीक्षा मालपूरे आणि समर्थ कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.